शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत सोमवारपासून कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत ३१ मेपर्यंत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र, ...

अमरावती : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत ३१ मेपर्यंत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश होते. दरम्यान ९ जुलै रोजी नव्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदली प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सोमवार, २६ जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये तीन दिवसात दीड हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ११ विभाग मिळून १०,७१७ कर्मचारी आहेत. त्यापैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे दीड हजार कर्मचाऱ्यांना आपले यापूर्वीचे काम सोडून नवी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. २६ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, कृषी, वित्त आणि महिला व बालविकास या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. दुसऱ्या दिवशी २७ जुलै रोजी शिक्षक संवर्ग वगळून शिक्षण, पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागातील, तर २८ जुलैला केवळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. एकूण तीन दिवसात ही बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात केली आहे.

बॉक्स

असे आहेत संवर्गनिहाय कर्मचारी

अराजपत्रित गट ब सरळसेवा ४४०. पदोन्नती ४९० एकूण ९३०

गट क सरळसेवा ७७८८ पदोन्नती ७२५ एकूण ८५१३

गट क सरळसेवा १२३६ पदोन्नती ३८ एकूण १२७४

एकूण सरळ सेवा ९४६ पदोन्नती १२५३ एकूण १०७१७

बॉक्स

गत वर्षी १० टक्के बदल्या प्रशासकीय कारणावरून तर ५ टक्के बदला विनंतीनुसार करण्यात आल्या होत्या. तेच सूत्र यावषीर्ही वापरले जाईल. बदली करताना शासनाचे सर्व नियम, नियुक्ती, पदोन्नती, आरक्षण, बिंदुनामावली अशा अनेक बाबी पार पाडावे लागते. त्यामुळे पुन्हा कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोरोनाची भीती कायम असल्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी सांगितले.