शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

जिल्हा परिषदेत सोमवारपासून कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत ३१ मेपर्यंत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र, ...

अमरावती : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत ३१ मेपर्यंत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश होते. दरम्यान ९ जुलै रोजी नव्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदली प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सोमवार, २६ जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये तीन दिवसात दीड हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ११ विभाग मिळून १०,७१७ कर्मचारी आहेत. त्यापैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे दीड हजार कर्मचाऱ्यांना आपले यापूर्वीचे काम सोडून नवी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. २६ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, कृषी, वित्त आणि महिला व बालविकास या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. दुसऱ्या दिवशी २७ जुलै रोजी शिक्षक संवर्ग वगळून शिक्षण, पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागातील, तर २८ जुलैला केवळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. एकूण तीन दिवसात ही बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात केली आहे.

बॉक्स

असे आहेत संवर्गनिहाय कर्मचारी

अराजपत्रित गट ब सरळसेवा ४४०. पदोन्नती ४९० एकूण ९३०

गट क सरळसेवा ७७८८ पदोन्नती ७२५ एकूण ८५१३

गट क सरळसेवा १२३६ पदोन्नती ३८ एकूण १२७४

एकूण सरळ सेवा ९४६ पदोन्नती १२५३ एकूण १०७१७

बॉक्स

गत वर्षी १० टक्के बदल्या प्रशासकीय कारणावरून तर ५ टक्के बदला विनंतीनुसार करण्यात आल्या होत्या. तेच सूत्र यावषीर्ही वापरले जाईल. बदली करताना शासनाचे सर्व नियम, नियुक्ती, पदोन्नती, आरक्षण, बिंदुनामावली अशा अनेक बाबी पार पाडावे लागते. त्यामुळे पुन्हा कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोरोनाची भीती कायम असल्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी सांगितले.