शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
4
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
5
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
6
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
7
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
8
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
9
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
10
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
11
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
12
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
13
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
14
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
15
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
16
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
17
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
18
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
19
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
20
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश

जिल्हा परिषदेत सोमवारपासून कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:12 IST

अमरावती : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत ३१ मेपर्यंत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र, ...

अमरावती : ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार दरवर्षी जिल्हा परिषदेमार्फत ३१ मेपर्यंत कर्मचाऱ्यांची सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाते. मात्र, कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नये, असे शासनाचे निर्देश होते. दरम्यान ९ जुलै रोजी नव्या शासन निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे सर्वसाधारण बदली प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने बदलीपात्र कर्मचाऱ्यांचा जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सोमवार, २६ जुलैपासून सुरू होणार आहे. यामध्ये तीन दिवसात दीड हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहे. यासाठी प्रशासनाची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे.

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील ११ विभाग मिळून १०,७१७ कर्मचारी आहेत. त्यापैकी १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे दीड हजार कर्मचाऱ्यांना आपले यापूर्वीचे काम सोडून नवी जबाबदारी स्वीकारावी लागणार आहे. २६ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन, सिंचन, ग्रामीण पाणीपुरवठा, बांधकाम, कृषी, वित्त आणि महिला व बालविकास या विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. दुसऱ्या दिवशी २७ जुलै रोजी शिक्षक संवर्ग वगळून शिक्षण, पंचायत आणि सामान्य प्रशासन विभागातील, तर २८ जुलैला केवळ आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाणार आहेत. एकूण तीन दिवसात ही बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याची तयारी प्रशासनाने मुख्यकार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या मार्गदर्शनात केली आहे.

बॉक्स

असे आहेत संवर्गनिहाय कर्मचारी

अराजपत्रित गट ब सरळसेवा ४४०. पदोन्नती ४९० एकूण ९३०

गट क सरळसेवा ७७८८ पदोन्नती ७२५ एकूण ८५१३

गट क सरळसेवा १२३६ पदोन्नती ३८ एकूण १२७४

एकूण सरळ सेवा ९४६ पदोन्नती १२५३ एकूण १०७१७

बॉक्स

गत वर्षी १० टक्के बदल्या प्रशासकीय कारणावरून तर ५ टक्के बदला विनंतीनुसार करण्यात आल्या होत्या. तेच सूत्र यावषीर्ही वापरले जाईल. बदली करताना शासनाचे सर्व नियम, नियुक्ती, पदोन्नती, आरक्षण, बिंदुनामावली अशा अनेक बाबी पार पाडावे लागते. त्यामुळे पुन्हा कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. कोरोनाची भीती कायम असल्यामुळे संपूर्ण बदली प्रक्रिया ऑनलाइन राबविली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे यांनी सांगितले.