शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

मिनीमंत्रालयात बदली झालेले कर्मचारी ठाण मांडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:14 IST

अमरावती : बदली झाल्यानंतरही संबंधित विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांकडून कार्यमुक्त न केल्याने मुख्य कार्यकारी ...

अमरावती : बदली झाल्यानंतरही संबंधित विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांकडून कार्यमुक्त न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार दिवसात खुलासा सादर करण्याचे सुचविले असून, खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाईचासुद्धा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि विनंती बदली प्रक्रियाही जुलै २०२१ मध्ये राबविण्यात आली. यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना १७ ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त होऊन स्थानांतरणाच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाला केराची टोपली दाखवत काही विभागप्रमुखांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे सर्वसाधारण कर्मचारी आदिवासी भागात रूजू झाल्याशिवाय आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करता येत नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत असल्याची बाब जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. याबाबत बुधवारपर्यंत खुलासा मागविण्यात आला होता. खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाईचा इशारा सीईओ अविश्यांत पंडा यांनी नोटिशीत दिला आहे.