शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

मिनीमंत्रालयात बदली झालेले कर्मचारी ठाण मांडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:14 IST

अमरावती : बदली झाल्यानंतरही संबंधित विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांकडून कार्यमुक्त न केल्याने मुख्य कार्यकारी ...

अमरावती : बदली झाल्यानंतरही संबंधित विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांकडून कार्यमुक्त न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार दिवसात खुलासा सादर करण्याचे सुचविले असून, खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाईचासुद्धा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि विनंती बदली प्रक्रियाही जुलै २०२१ मध्ये राबविण्यात आली. यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना १७ ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त होऊन स्थानांतरणाच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाला केराची टोपली दाखवत काही विभागप्रमुखांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे सर्वसाधारण कर्मचारी आदिवासी भागात रूजू झाल्याशिवाय आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करता येत नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत असल्याची बाब जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. याबाबत बुधवारपर्यंत खुलासा मागविण्यात आला होता. खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाईचा इशारा सीईओ अविश्यांत पंडा यांनी नोटिशीत दिला आहे.