शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

मिनीमंत्रालयात बदली झालेले कर्मचारी ठाण मांडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:14 IST

अमरावती : बदली झाल्यानंतरही संबंधित विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांकडून कार्यमुक्त न केल्याने मुख्य कार्यकारी ...

अमरावती : बदली झाल्यानंतरही संबंधित विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेच्या विभागप्रमुखांकडून कार्यमुक्त न केल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चार दिवसात खुलासा सादर करण्याचे सुचविले असून, खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाईचासुद्धा इशारा दिला आहे.

जिल्हा परिषदेतील विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि विनंती बदली प्रक्रियाही जुलै २०२१ मध्ये राबविण्यात आली. यात बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना १७ ऑगस्टपर्यंत कार्यमुक्त होऊन स्थानांतरणाच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशाला केराची टोपली दाखवत काही विभागप्रमुखांकडून कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे सर्वसाधारण कर्मचारी आदिवासी भागात रूजू झाल्याशिवाय आदिवासी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त करता येत नाही. परिणामी या कर्मचाऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत असल्याची बाब जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याची दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विभागप्रमुखांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आहे. याबाबत बुधवारपर्यंत खुलासा मागविण्यात आला होता. खुलासा असमाधानकारक असल्यास कारवाईचा इशारा सीईओ अविश्यांत पंडा यांनी नोटिशीत दिला आहे.