शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

एसटी खडयात;आठ गावांच्या फेऱ्या बंद; अनेक मार्ग बदलले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण : एसटीच्या सुट्या भागांचे होतेय नुकसान अमरावती : पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा ...

ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण : एसटीच्या सुट्या भागांचे होतेय नुकसान

अमरावती : पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली आहे. याचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहे. परिणामी, महामंडळाने दुर्लक्षित रस्त्यांमुळे अनेक गावांची वाहतूक बंद केली आहे. अनेक ठिकाणी इतर मार्गाने वळविली आहे. यात एसटीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला आहे.

दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी तब्बल पाच महिने एसटीची बसेस बंद होत्या. यावर्षीही मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केल्याने ४५ दिवस लॉकडाऊनमुळे एसटीची चाके थांबली होती. या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील या कालावधीत एसटीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. अनलॉकनंतर एसटीची वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाली आहे. जिल्ह्यात अमरावती, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, बडनेरा असे ८ आगार असून एकूण ३५० हून अधिक बसेस आहेत. यापैकी २५० बस धावत आहेत. मात्र, पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून एसटी धावत असताना स्प्रिंग पट्टे व इतर सुट्या भागांचे नुकसान होत असल्याने दुरुस्तीवर महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८ ते १० मार्गावरील फेऱ्या बंद, तर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने त्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

बॉक्स

एसटीचा खर्च वाढला

पावसाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे एसटीच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. स्प्रिंग पट्टे तुटणे, क्लच प्लेट्स निकामी होणे या अन्य कारणांवरून एसटी मधेच नादुरुस्त होत असल्याने मेंटेनन्सवर महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

बॉक्स

हे मार्ग वळविले

अमरावती यवतमाळ मार्ग नेर, दर्यापूर, अकोट मार्गे येवदा, परतवाडा- भांडुम मार्ग खामला, कोकरू, अमरावती दर्यापूर मार्गे भातकुली - आमला या ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीचेही मार्ग वळविण्यात आले आहेत.

बॉक्स

या मार्गावरील फेऱ्या बंद

चिखलदरा तालुक्यातील भांंडूम, सेमाडोह, रायपुर, मार्गे हतरू, रूईपठार या फेऱ्या रस्ते खराब असल्याने बंद आहेत.

बॉक्स

आगार आणि सुरू बसेस संख्या

अमरावती- ५०

बडनेरा -३५

परतवाडा -४६

वरूड-३८

चांदूर रेल्वे-३०

दर्यापूर-४०

चांदूर बाजार-३२

कोट

पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा होते. यात एसटीच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. एसटी मधेच नादुरुस्त झाल्यास प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. एसटीच्या सुट्या भागाचे नुकसान झाल्यास अपघाताचीही शक्यता असते. याकरिता पावसाळ्यात नादुरूस्त मार्गावरील फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या जातात.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक, अमरावती