शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

एसटी खडयात;आठ गावांच्या फेऱ्या बंद; अनेक मार्ग बदलले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण : एसटीच्या सुट्या भागांचे होतेय नुकसान अमरावती : पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा ...

ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण : एसटीच्या सुट्या भागांचे होतेय नुकसान

अमरावती : पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली आहे. याचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहे. परिणामी, महामंडळाने दुर्लक्षित रस्त्यांमुळे अनेक गावांची वाहतूक बंद केली आहे. अनेक ठिकाणी इतर मार्गाने वळविली आहे. यात एसटीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला आहे.

दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी तब्बल पाच महिने एसटीची बसेस बंद होत्या. यावर्षीही मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केल्याने ४५ दिवस लॉकडाऊनमुळे एसटीची चाके थांबली होती. या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील या कालावधीत एसटीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. अनलॉकनंतर एसटीची वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाली आहे. जिल्ह्यात अमरावती, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, बडनेरा असे ८ आगार असून एकूण ३५० हून अधिक बसेस आहेत. यापैकी २५० बस धावत आहेत. मात्र, पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून एसटी धावत असताना स्प्रिंग पट्टे व इतर सुट्या भागांचे नुकसान होत असल्याने दुरुस्तीवर महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८ ते १० मार्गावरील फेऱ्या बंद, तर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने त्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

बॉक्स

एसटीचा खर्च वाढला

पावसाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे एसटीच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. स्प्रिंग पट्टे तुटणे, क्लच प्लेट्स निकामी होणे या अन्य कारणांवरून एसटी मधेच नादुरुस्त होत असल्याने मेंटेनन्सवर महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

बॉक्स

हे मार्ग वळविले

अमरावती यवतमाळ मार्ग नेर, दर्यापूर, अकोट मार्गे येवदा, परतवाडा- भांडुम मार्ग खामला, कोकरू, अमरावती दर्यापूर मार्गे भातकुली - आमला या ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीचेही मार्ग वळविण्यात आले आहेत.

बॉक्स

या मार्गावरील फेऱ्या बंद

चिखलदरा तालुक्यातील भांंडूम, सेमाडोह, रायपुर, मार्गे हतरू, रूईपठार या फेऱ्या रस्ते खराब असल्याने बंद आहेत.

बॉक्स

आगार आणि सुरू बसेस संख्या

अमरावती- ५०

बडनेरा -३५

परतवाडा -४६

वरूड-३८

चांदूर रेल्वे-३०

दर्यापूर-४०

चांदूर बाजार-३२

कोट

पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा होते. यात एसटीच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. एसटी मधेच नादुरुस्त झाल्यास प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. एसटीच्या सुट्या भागाचे नुकसान झाल्यास अपघाताचीही शक्यता असते. याकरिता पावसाळ्यात नादुरूस्त मार्गावरील फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या जातात.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक, अमरावती