शहरं
Join us  
Trending Stories
1
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
2
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
3
मुख्यमंत्र नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
4
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
5
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
6
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
7
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
8
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
9
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
10
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
11
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
12
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
13
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
14
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
15
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक
16
'सैय्यारा'से आशिकी हो गयी है मुझे! 'आशिकी गर्ल' श्रद्धा कपूरने सिनेमा पाहून दिली प्रतिक्रिया
17
हुंडा मागतो, दारू पिऊन नवरा मारतो...; हरियाणाच्या डान्सर सपनाचा सासरच्यांवर गंभीर आरोप
18
जगदीप धनखड यांनी ११ दिवसांपूर्वी निवृत्तीवर भाष्य केले; आता अचानक राजीनामा का दिला..?
19
Deep Amavasya 2025: दीप अमावस्येला एक दिवा पितरांसाठी ठेवायला विसरू नका, कारण...
20
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यामागचं कोडं उलगडेना; विरोधी पक्ष हैराण पण भाजपाही संभ्रमात?

एसटी खडयात;आठ गावांच्या फेऱ्या बंद; अनेक मार्ग बदलले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:17 IST

ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण : एसटीच्या सुट्या भागांचे होतेय नुकसान अमरावती : पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा ...

ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण : एसटीच्या सुट्या भागांचे होतेय नुकसान

अमरावती : पावसामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची प्रचंड दुर्दशा झालेली आहे. याचा फटका एसटी महामंडळालाही बसत आहे. परिणामी, महामंडळाने दुर्लक्षित रस्त्यांमुळे अनेक गावांची वाहतूक बंद केली आहे. अनेक ठिकाणी इतर मार्गाने वळविली आहे. यात एसटीचा देखभाल दुरुस्तीचा खर्च वाढला आहे.

दीड वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षी तब्बल पाच महिने एसटीची बसेस बंद होत्या. यावर्षीही मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केल्याने ४५ दिवस लॉकडाऊनमुळे एसटीची चाके थांबली होती. या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील या कालावधीत एसटीचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडाले. अनलॉकनंतर एसटीची वाहतूक पूर्णक्षमतेने सुरू झाली आहे. जिल्ह्यात अमरावती, दर्यापूर, परतवाडा, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, चांदूर रेल्वे, बडनेरा असे ८ आगार असून एकूण ३५० हून अधिक बसेस आहेत. यापैकी २५० बस धावत आहेत. मात्र, पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळण झाली आहे. या रस्त्यावरून एसटी धावत असताना स्प्रिंग पट्टे व इतर सुट्या भागांचे नुकसान होत असल्याने दुरुस्तीवर महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ८ ते १० मार्गावरील फेऱ्या बंद, तर अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू असल्याने त्या मार्गावरील वाहतूक वळविण्यात आली आहे.

बॉक्स

एसटीचा खर्च वाढला

पावसाळ्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था होते. त्यामुळे एसटीच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. स्प्रिंग पट्टे तुटणे, क्लच प्लेट्स निकामी होणे या अन्य कारणांवरून एसटी मधेच नादुरुस्त होत असल्याने मेंटेनन्सवर महामंडळाचा लाखो रुपयांचा खर्च होत आहे. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला अधिकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

बॉक्स

हे मार्ग वळविले

अमरावती यवतमाळ मार्ग नेर, दर्यापूर, अकोट मार्गे येवदा, परतवाडा- भांडुम मार्ग खामला, कोकरू, अमरावती दर्यापूर मार्गे भातकुली - आमला या ग्रामीण भागात जाणाऱ्या एसटीचेही मार्ग वळविण्यात आले आहेत.

बॉक्स

या मार्गावरील फेऱ्या बंद

चिखलदरा तालुक्यातील भांंडूम, सेमाडोह, रायपुर, मार्गे हतरू, रूईपठार या फेऱ्या रस्ते खराब असल्याने बंद आहेत.

बॉक्स

आगार आणि सुरू बसेस संख्या

अमरावती- ५०

बडनेरा -३५

परतवाडा -४६

वरूड-३८

चांदूर रेल्वे-३०

दर्यापूर-४०

चांदूर बाजार-३२

कोट

पावसाळ्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची दुर्दशा होते. यात एसटीच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. एसटी मधेच नादुरुस्त झाल्यास प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. एसटीच्या सुट्या भागाचे नुकसान झाल्यास अपघाताचीही शक्यता असते. याकरिता पावसाळ्यात नादुरूस्त मार्गावरील फेऱ्या तात्पुरत्या स्वरूपात बंद केल्या जातात.

- श्रीकांत गभणे,

विभाग नियंत्रक, अमरावती