शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
वॉशिंग मशिन वापरताना ‘ही’ किरकोळ चूक जीवावर बेतली; तरुणाचा मृत्यू; करायला गेला एक आणि..
8
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
9
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
10
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
11
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
12
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
13
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
14
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
15
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
16
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
17
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
18
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
19
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
20
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...

आठ जिल्ह्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग

By admin | Updated: January 3, 2016 00:47 IST

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर लाखो वैदर्भीयांना नव्या जिल्हा निर्मितीचे वेध लागले आहे.

अपेक्षांना पालवी फुटली : अंजनगाव सुर्जी तालुक्याचा अचलपुरात समावेश ! अंजनगाव सुर्जी सुदेश मोरे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर लाखो वैदर्भीयांना नव्या जिल्हा निर्मितीचे वेध लागले आहे. यासाठी मंत्रिगट समिती कार्यान्वित झाल्याने अपेक्षांना पालवी फुटली आहे. विदर्भात नव्याने आठ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे. विशाल जिल्हा क्षेत्रामुळे मुख्यालयापासून दूरवरच्या गावकऱ्यांना कामकाजात अडचणीत येतात व एकाच दिवशी ते काम करून घरी जाऊ शकत नाहीत. आणि यंत्रणासुद्धा जिल्ह्याच्या आवाक्यामुळे प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन विदर्भात नवीन आठ जिल्हे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंत्रालयातील अतिरिक्त महसुली सचिवांच्या अध्यक्षतेत एका समितीने याबाबतचा अहवाल नुकताच मुख्यमंत्र्यांना सादर केला. यात नवे जिल्हे निर्मितीची शिफारस अपेक्षित आहे. नागपूरमधून काटोल, चंद्रपूरमधून चिमूर व ब्रह्मपुरी, यवतमाळमधून पुसद, बुलडाण्यातून खामगाव, गडचिरोलीतून अहेरी, वर्धामधून आष्टी व अमरावतीतन अचलपूर असे आठ जिल्हे फडणवीस शासनाने वेगळे करण्याचे ठरविले. राजकीय गणिते बदलण्याची शक्यता जिल्हा हे कार्यक्षेत्र मानून नेत्यांनी आपली कामकाजाची दिशा निश्चित केली आहे. पण नव्या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे अशा नेत्यांना आपल्या कामाचीही दिशा बदलावी लागेल. सोबतच त्यांचे विशिष्ट कार्यशैलीमुळे जिल्हाभर लाभलेल्या कार्यकर्त्यांपासून वंचित राहावे लागेल. राजकारणात अनेक वर्षांपासून मेहनतीने बांधलेल्या आराखड्यांना मुकावे लागेल. संकुचित झालेल्या जिल्हा क्षेत्रामुळे अनेक नेत्यांची राजकीय गणितेसुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. नव्या जिल्ह्यांसोबत ७० नवे तालुके विदर्भातील आठ जिल्ह्यांसह राज्यात एकूण बावीस जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे एकूण सत्तर नव्या तहसिली निर्माण होतील. यामुळे नवे रोजगार व नोकरीच्या नव्या संधीसुद्धा निर्माण होतील. सर्वात महत्त्वाचे हे की, जनतेला आपल्या मुख्यालयी पोहोचणे सहज सुलभ होईल. अधिक सोयीसुविधा आणि विकासकामांनासुद्धा चालना मिळेल.