शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
3
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
4
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
5
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
6
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
7
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
8
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
9
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
10
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
11
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
12
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
13
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
14
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
15
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
16
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
17
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
18
Maharashtra HSC Result 2025: बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
19
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
20
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण

आठ जिल्ह्यांच्या निर्मिती प्रक्रियेला वेग

By admin | Updated: January 3, 2016 00:47 IST

ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर लाखो वैदर्भीयांना नव्या जिल्हा निर्मितीचे वेध लागले आहे.

अपेक्षांना पालवी फुटली : अंजनगाव सुर्जी तालुक्याचा अचलपुरात समावेश ! अंजनगाव सुर्जी सुदेश मोरे ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून नवा पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर लाखो वैदर्भीयांना नव्या जिल्हा निर्मितीचे वेध लागले आहे. यासाठी मंत्रिगट समिती कार्यान्वित झाल्याने अपेक्षांना पालवी फुटली आहे. विदर्भात नव्याने आठ जिल्ह्यांची निर्मिती प्रस्तावित आहे. विशाल जिल्हा क्षेत्रामुळे मुख्यालयापासून दूरवरच्या गावकऱ्यांना कामकाजात अडचणीत येतात व एकाच दिवशी ते काम करून घरी जाऊ शकत नाहीत. आणि यंत्रणासुद्धा जिल्ह्याच्या आवाक्यामुळे प्रशासनावर प्रभावी नियंत्रण ठेवू शकत नाही. ही अडचण लक्षात घेऊन विदर्भात नवीन आठ जिल्हे निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मंत्रालयातील अतिरिक्त महसुली सचिवांच्या अध्यक्षतेत एका समितीने याबाबतचा अहवाल नुकताच मुख्यमंत्र्यांना सादर केला. यात नवे जिल्हे निर्मितीची शिफारस अपेक्षित आहे. नागपूरमधून काटोल, चंद्रपूरमधून चिमूर व ब्रह्मपुरी, यवतमाळमधून पुसद, बुलडाण्यातून खामगाव, गडचिरोलीतून अहेरी, वर्धामधून आष्टी व अमरावतीतन अचलपूर असे आठ जिल्हे फडणवीस शासनाने वेगळे करण्याचे ठरविले. राजकीय गणिते बदलण्याची शक्यता जिल्हा हे कार्यक्षेत्र मानून नेत्यांनी आपली कामकाजाची दिशा निश्चित केली आहे. पण नव्या जिल्ह्याच्या निर्मितीमुळे अशा नेत्यांना आपल्या कामाचीही दिशा बदलावी लागेल. सोबतच त्यांचे विशिष्ट कार्यशैलीमुळे जिल्हाभर लाभलेल्या कार्यकर्त्यांपासून वंचित राहावे लागेल. राजकारणात अनेक वर्षांपासून मेहनतीने बांधलेल्या आराखड्यांना मुकावे लागेल. संकुचित झालेल्या जिल्हा क्षेत्रामुळे अनेक नेत्यांची राजकीय गणितेसुद्धा बिघडण्याची शक्यता आहे. नव्या जिल्ह्यांसोबत ७० नवे तालुके विदर्भातील आठ जिल्ह्यांसह राज्यात एकूण बावीस जिल्ह्यांच्या निर्मितीमुळे एकूण सत्तर नव्या तहसिली निर्माण होतील. यामुळे नवे रोजगार व नोकरीच्या नव्या संधीसुद्धा निर्माण होतील. सर्वात महत्त्वाचे हे की, जनतेला आपल्या मुख्यालयी पोहोचणे सहज सुलभ होईल. अधिक सोयीसुविधा आणि विकासकामांनासुद्धा चालना मिळेल.