शहरं
Join us  
Trending Stories
1
CM फडणवीस-राज ठाकरेंमध्ये ५५ मिनिटे केवळ रस्ते-पार्किंगवर चर्चा? दया कुछ तो ‘राज’ की बात है...
2
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
3
गणेशभक्तांसाठी राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक १५ किलोमीटरवर सुविधा केंद्र
4
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
5
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
6
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
7
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
8
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
9
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
10
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
11
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
12
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
13
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
14
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
15
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
16
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
17
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
18
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
19
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
20
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?

सोयाबीनचे बोगस बियाणे उगवले नाही

By admin | Updated: July 28, 2014 23:17 IST

येथील सुमित कृषी केंद्रामधून परिसरातील पूर्णानगरसह मार्की, रामा, येलकी, सावळापूर, वातोंडा, निरुळ, अंचलवाडी चिंचखेडा येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले.

वरिष्ठांकडे तक्रार : नुकसान भरपाई देण्याची मागणी पूर्णानगर : येथील सुमित कृषी केंद्रामधून परिसरातील पूर्णानगरसह मार्की, रामा, येलकी, सावळापूर, वातोंडा, निरुळ, अंचलवाडी चिंचखेडा येथील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र पेरणी केली असता ते सोयाबीन निघालेच नसल्याने हे शेतकरी झाले आहेत. या प्रकरणाचा तत्काळ तपास करुन बियाणे व पेरणी खर्च मिळवून द्यावा, अशी मागणी पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावर्षी मृग नक्षत्र पूर्णत: कोरडे गेले. त्यानंतर झालेल्या तुरळक पावसात पूर्णानगर परिसरातील शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. यावेळी त्यांनी पूर्णानगर येथील सुमित कृषी केंद्रातून महाबीज कंपनीचे ३३५ जातीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले. १० दिवस उलटून गेल्यावरही बियाणे उगवलेच नसल्याने शेतकरी वर्ग पार खचून गेला आहे. आधीच पावसामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी कर्जबाजारी होऊन पेरणी केली. परंतु बियाणे न उगवल्याने शेतकरी वर्ग धास्तावला आहे. या प्रकरणाची तक्रार काही शेतकऱ्यांनी कृषीविभाग, पंचायत समिती भातकुली, कृषी मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, भातकुली तहसीलदार यांच्याकडे केली आहे. शनिवारी अमरावती येथे झालेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीमध्ये बोगस बियाणे कंपनीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेशदेखील देण्यात आले आहे. वरील तक्रारीची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकारी म्हस्के, महाबीज व्यवस्थापक देशमुख पं.स. अधिकारी वानखडे, उपविभागीय अधिकारी खर्चान यांनी सुमित कृषी केंद्र पूर्णानगरमधून ५३३ बॅगांची विक्री झाली असून त्यापैकी १४६ शेतकऱ्यांनी बियाणे परत आणली आहेत. यावेळी त्यांनी काही शेतांची पाहणी केली असून याबाबतचा अहवाल आम्ही पाठविणार आहो, असे सांगून शेतकऱ्यांना टोलवाटोलवीचे उत्तर दिले. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये असंतोष पसरला आहे. मागील दीड महिन्यानंतर पावसाने हजेरी लावली असून शेतकऱ्यांसमोर बोगस बियाण्यांचे नवे संकट उभे ठाकले आहे. सोयाबीन हे रोखीचे पीक असल्याने शेतकऱ्यांनी या पिकाला पसंती दिली. मात्र सोयाबीनचे बियाणेच बोगस निघाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे. गावागावतून तक्रारींचा पाऊस सुरु असून हजारो शेतकऱ्यांसमोर दुबार, तिबार पेरणीशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करीत आहे. तरी संबंधित कंपनीवर तत्काळ कारवाई करण्यात यावी व बियाणे तसेच पेरणीचा खर्च तत्काळ द्यावा अन्यथा पीडित शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा संबंधितांनी दिला आहे. याची सर्वस्वी जबाबदारी कंपनी व शासनाची राहील, असेही निवेदनातून कळविले आहे. सदर प्रकरणाचा तत्काळ तपास लावून नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी, अशी एकमुखी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)