शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला! खोड माशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:17 IST

अमरावती/ संदीप मानकर सोयाबीनला १० हजारांचा भाव काय मिळाला, त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र, आता पिकांवर वेगवेगळ्या ...

अमरावती/ संदीप मानकर

सोयाबीनला १० हजारांचा भाव काय मिळाला, त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीन पिकाचा पेरा वाढला. मात्र, आता पिकांवर वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव होत असून, भाव वाढल्याने सोयाबीनचा पेरा वाढला. मात्र, खोड माशी, चक्रीभुंगा व पाने खाणारी अळी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच जुलै ते ऑगस्टमध्ये पावसाचा खंड पडल्याने यंदा सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असल्याचे मत कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

यंदा सोयाबीनला १० हजारांपर्यंत प्रति क्विंटलचा भाव मिळाला. त्यामुळे २०२१-२२ च्या नियोजनानुसार २ लाख ६२ हजार ८८३ हेक्टरमध्ये सोयाबीनचा पेरा करण्यात आला आहे. काही तालुक्यांत काही ठिकाणी खोड माशी, चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव व पाने खाणाऱ्या अळीमुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा होण्याची शक्यता आहे.

सोयाबीनचा पेरा (हेक्टरमध्ये) मिळालेला भाव (रुपयात)

वर्ष

२०१६-१७ - २,९१,२४७

२०१७- १८- २,८७,०७३

२०१८- १९- २,९१,६४२

२०१९-२०- २,३८,७२६

२०२०-२१ - २,७९,६५९

२०२१-२२ - २,६२,८८३ १०,०००

बॉक्स :

खोड माशीचा खोड

जिल्ह्यात मिलीबगचा प्रादुर्भाव नसल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. मात्र, काही तालुक्यांत सोयाबीनवर खोड माशी, चक्रीभुंगा व पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आहे.

बॉक्स :

जुलै, ऑगस्टमध्ये पावसाची दडी

पूर्वी जुुलै व ऑगस्ट महिन्यात पावसाने दडी मारल्याने खंड पडला. त्यानंतर शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करून काळजी घेतली. मात्र, आता जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. पावसाच्या खंडामुळे फुले गळणे, बारीक शेंगा गळणे यामुळे त्याचा सोयाबीन पिकावर परिणाम झाला.

कोट

यंदा सोयाबीनचा पेरा चांगला आहे. मात्र, जुलै व ऑगस्ट पावसाचा खंड पडला. त्यामुळे पिकाच्या उत्पन्नावर परिणाम होईलच. मात्र, आता काही तालुक्यांत खोडमाशी, चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव आहे. शेतकऱ्यांनी योग्य वेळी फवारणी करून काळजी घेतली आहे.

अनिल खर्चान, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती

कोट

बाजारव्यवस्थेप्रमाणे यंदा सोयबीनला रास्त भाव मिळेल. पेरणी केलेल्या सोयबीनला चांगला भाव मिळू शकतो. यंदा उत्पादन खर्चसुद्धा निघेल अशी स्थिती असल्याने तालुक्यात पेरा वाढला.

अरविंद नळकांडे, शेतकरी, दर्यापूर