शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

सोयाबीन उत्पादन घटले; ‘वेअर हाऊस’ रिकामेच !

By admin | Updated: October 31, 2015 01:00 IST

सततच्या नापिकीने गारद झालेल्या बळीराजाला यंदाही निसर्गाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे.

सततच्या नापिकीचा परिणाम : सुरक्षित ठेवण्यास माल आणायचा कोठून?अमरावती : सततच्या नापिकीने गारद झालेल्या बळीराजाला यंदाही निसर्गाने हुलकावणी दिली आहे. खरीप हंगामातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनच्या उत्पादनात कमालीची घट आली आहे. त्यामुळे शेतमाल भाड्याने सुरक्षित ठेवण्यासाठी निर्माण केलेले ‘वेअर हाऊस’ रिकामेच पडले आहेत.शेतकऱ्यांकडून त्यांच्या मालासाठी प्रतिक्विंटलनुसार भाडे आकारून ‘वेअर हाऊस’मध्ये सुरक्षित ठेवले जाते. शेतीमालासाठी प्रतिक्विंटल ८ ते १० रुपये दराने महिन्याकाठी भाडे आकारले जाते. वेअर हाऊसमध्ये माल ठेवून नंतर तो योग्यवेळी बाहेर काढला जातो. परंतु हल्ली शहरासह जिल्ह्यातही शेतमाल ठेवण्यासाठी बांधण्यात आलेले ‘वेअर हाऊस’ ओस पडले आहेत. शेतकऱ्यांच्या घरीच शेतीमाल नाही तर ‘वेअर हाऊस’मध्ये ठेवणार कसा? हा प्रश्न आहे. बळीराजा सततच्या नापिकीने त्रस्त झाला आहे. त्यामुळे बळीराजावर अवलंबून असलेली आर्थिक यंत्रणासुध्दा कोलमडली आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादनात प्रचंड घट झाली आहे. प्रती एकर एक ते दीड क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या हाती आले. यातून उत्पादन खर्चही निघू शकत नाही. शेतकरी हवालदिल झाले आहेत. वेळेवर पाऊस न आल्याने सोयाबीनची ही अवस्था झाली आहे. - सुरेश मोलके, शेतकरी, बडनेरा.दरवर्षी सोयाबीनचे पीक आले की, शेतकरी ते गोदामात प्रतिक्विंटल आठ रुपये दराने भाड्याने ठेवतात. मात्र, यंदा क्विंटलभर सोयाबीनदेखील गोदामात ठेवण्यात आलेले नाही. यावरून बळीराजा किती मेटाकुटीस आला आहे, हे स्पष्ट होते.- प्रेमकुमार आहुजा, संचालक, वेअर हाऊस.