शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन लागवड तंत्रज्ञान महत्त्वाचे

By admin | Updated: June 25, 2017 00:10 IST

जिल्ह्यात यंदा सरासरी क्षेत्राच्या ४० टक्के म्हणजेच दोन लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होणार आहे.

कृषीतज्ज्ञांचा सल्ला : बियाण्यांची काळजी हवी, पट्टापेर पद्धती योग्यलोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : जिल्ह्यात यंदा सरासरी क्षेत्राच्या ४० टक्के म्हणजेच दोन लाख ८० हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीनची पेरणी होणार आहे. बियाणे बाजारातील असो किंवा घरचे, पेरणी करण्यापूर्वी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बियाणे अधिक खोल पडणे, पाणी साचलेल्या जमिनीत पेरणी किंवा पेरणीनंतर पावसाचा खंड, योग्य निचरा न होणारी जमीन आदी कारणांमुळे बियाण्यांची उगवणशक्ती कमी होऊ शकते. यासाठी पेरणी करताना काळजी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.सोयाबीनसाठी मध्यम ते भारी व पाण्याचा चांगला निचरा होणारी तसेच जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ असलेल्या जमिनीची निवड करावी. हलक्या, उथळ व क्षारयुक्त जमिनीत सोयाबीनची पेरणी करू नये. सलग १० वर्षांपासुूा एकाच क्षेत्रात व एकाच वाणाचा उपयोग केल्यामुळे कीड व रोगांचा प्रकोप वाढतो व सोयाबीन पिकाची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.सोयाबीनसह मूग, उडीद या पिकांची बैलजोडीने पेरणी करावयाची झाल्यास तीनदाती तिफन अथवा काकरीने पेरणी करावी. प्रत्येक वेळी परत येताना चौथी ओळ रिकामी ठेवावी व या ओळीत डवरणीच्या वेळी किंवा डवरणी झाल्यावर लगेच गाळ पाडून घ्यावा. प्रत्येक तीन ओळीमधून पीक गादीवाफ्यावर करून घ्यावे. टॅक्टरद्वारे पेरणी करावयाची झाल्यास सात दात्यांच्या पेरणी यंत्राने पट्टापेर पद्धतीने पेरणी करावी. मात्र, पेरणी यंत्राच्या बियाण्यांच्या कप्प्यातील चवथे छिद्र बंद करावे. प्रत्येक वेळी ट्रॅक्टर पलटून येताना एक ओळ रिकामी ठेवावी (आठवी ओळ) प्रत्येक चौथ्या ओळीवर डवरणीच्या वेळी किंवा डवरणी आटोपल्यानंतर एका डवराच्या सहाय्याने गाळ ओढून पट्टापेर पद्धतीने पीक गादी वाफ्यावर घ्यावे.पेरणीसाठी आणलेल्या बियाण्यांची पिशवी खालून फोडावी व टॅग जपून ठेवावे. साधारणपणे ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यावर पेरणी करावी. जमिनीत योग्य ओलावा आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता शेतातील मातीचा गोळा करावा तो घट्ट होतो किंवा नाही हे पाहावे व लगेच दूर फेकावा, गोळा फुटल्यास जमीन पेरणीयोग्य नाही, असे समजावे, असा सल्ला कृषी विद्यापीठाने दिला आहे.पट्टापेरचे तोटेही : प्रत्येक चौथी ओळ खाली ठेवल्याने २५ टक्के ओळीचे प्रमाण कमी होते. म्हणजेच २५ टक्के झाडांची संख्या कमी होते. खाली ठेवलेल्या चौथ्या ओळीच्या ठिकाणी गाळ न पाडल्यास त्या ठिकाणी तणांचा प्रादुर्भाव वाढतो.पट्टापेर पद्धतीचे फायदेबियाण्यांचे प्रमाण कमी लागते. बियाणे खर्चात बचत होते. पेरणी लवकर व सोईची होते. शेतात वेळोवेळी फेरफटका मारणे सोईचे होते.किडी रोगाची निगराणी व निरीक्षण शक्य होते. प्रत्येक पट्ट्यात फवारणीयोग्य रितीने करता येते. शेतात हवा खेळती राहते. सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा कमी होते. सरींच्याव्दारे ओलीत करता येते. तुषार सिंचन करणे सोईचे होते. काठावरील ओळींना बॉर्डर ईफेक्ट मिळतो. पावसाच्या पाण्याचे मूळस्थानी संर्वधन शक्य होते. प्रत्येक पट्ट्यात पिकाचे काटेकोर व्यवस्थापन करता येते. पिकाची एकसमान वाढ होते. पीक गादीवाफ्यावर असल्यामुळे पावसाचे पाणी व पीक याचा सरळ संबंध टाळता येतो. अशी करावी बीज प्रक्रियापेरणीपूर्वी बियाण्यास २ ते ३ ग्रम कार्बोक्सिन ३७.५ व थायरम ३७.५ टक्के मिश्र घटक या प्रमाणात लावावे. बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केल्यानंतर रायझोबियम जपोनिकम स्फूरद विरघळणारे जिवाणू पीएसबी २५ ग्रम प्रतिकिलो बियाण्यास पेरणीपूर्वी लावावे व नंतर पेरणी करावी.पेरणी सरत्याने करावी दोन ओळीतील किंवा दोन रोपातील अंतर ४५ बाय ५ सेमी ठेवावे.अधीक उत्पादनासाठी हेक्टरी झाडांची संख्या ४ ते ४.५ लाखापर्यत ठेवावी. पेरणी उताराला आडवी तसेच पूर्व पश्चिम करावी.