शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन आले काढणीला, पावसाचा धोका पिकाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:13 IST

फोटो - ओ २५ राजुरा (दोन कॉलम घेणे) फोटो कॅप्शन - ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनची गंजी वाळवण्याऐवजी शेतकरी बांधून ठेवत ...

फोटो - ओ २५ राजुरा (दोन कॉलम घेणे)

फोटो कॅप्शन - ढगाळ वातावरणामुळे सोयाबीनची गंजी वाळवण्याऐवजी शेतकरी बांधून ठेवत आहेत. (छाया - सतीश बहुरूपी, राजुरा बाजार)

काढलेल्या सोयाबीनला कोंब फुटण्याची शक्यता, काही ठिकाणी सोंगणीलाही प्रारंभ झालेला नाही

अमरावती : जिल्हाभरात कुठे मुसळधार, तर कुठे रिमझिम पाऊस सातत्याने कोसळत आहे. ऑक्टोबर जवळ येत असतानाही पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही. आता तर विजांच्या कडकडाटासह तो कोसळत आहे. त्यामुळे कापणीला आलेले सोयाबीन काढायचे कसे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे.

१० हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याने हर्षभरित झालेल्या शेतकऱ्यांना सोयाबीन काढणीची प्रतीक्षा लागली होती. शेंगाचे दाणे भरून हे पीक काढणीला आलेले असताना आता कापणी करून घेतल्यास हे पीक पावसाच्या माराने कुजणार किंवा शेतात तसेच उभे ठेवल्यास दाण्यांना कोंब फुटतील, अशी कुचंबणा शेतकऱ्यांपुढे आहे. या कालावधीत १० हजारांवर गेलेले दर चार हजारांवर स्थिरावले आहेत.

दरम्यान, रविवारी जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचलपूर तालुक्यात शुक्रवारी दुपारपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अचलपूर नगरपालिका क्षेत्रातही धो-धो पाऊस कोसळला. मल्हारा, गौरखेडा धोतरखेडा, पथरोट, जवलापूर, भिलोनासह तालुक्यातील अन्य ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अनेकांचे. सोयाबीन भिजले. सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे कपाशीची बोंड सडायला सुरुवात झाली आहे. संत्रा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. दर्यापूर तालुक्यात गुरुवारी व शुक्रवारीदेखील सुमारे दोन तास पाऊस कोसळला. याशिवाय तिवस्यात अर्धा तास, अचलपूर तालुक्यात दीड तास, अंजनगाव सुर्जी तालुक्यात तासभर पाऊस कोसळला. वरूड तालुक्यात राजुरा बाजारसह परिसरात अचानक काळेकुट्ट ढग दाटून १०-१५ मिनिटे जोरदार सरी कोसळल्या. धामणगाव रेल्वे तालुक्यात विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाने हजेरी लावली. तळेगाव दशासर, कावली वसाड व अंजनसिंगी परिसरातही पाऊस कोसळला. चांदूर बाजार तालुक्यातही अर्धा तास पाऊस झाला. चांदूर रेल्वे तालुक्यात ढगाळ वातावरण होेते. मुसळधार पाऊस कोसळेल, अशी स्थिती निर्माण झाली होती. मात्र, तुरळक सरी कोसळून पाऊस बंद झाला. धारणी तालुक्यातही पावसाचे वातावरण कायम आहे. सोयाबीन सवंगणीची कामे सुरू असताना पाऊस व्यत्यय आणत आहे. शेतजमीन ओली झाल्याने मजुरांना सवंगणी अर्ध्यावर टाकून परतावे लागत आहे. त्यासोबतच उघड्यावर टाकलेल्या सोयाबीनच्या गंजी गोळा करून ती झाकण्याची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.