शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ट्रम्प यांचा खरा थयथयाट होणार...! देतबसले टॅरिफची धमकी, इकडे भारत-रशियानं मिळवला हात, केले अनेक करार! बघा लिस्ट
2
“फडणवीसांचा फोन आला होता, पण आम्ही रेड्डी यांना पाठिंबा दिला आहे”; संजय राऊतांनी केले स्पष्ट
3
मुंबई मनपा निवडणुकीसाठी DCM एकनाथ शिंदे तयारीला लागले; आनंदराज आंबेडकरांसोबत बैठक, काय ठरले?
4
तुमचा ITR रिफंड अडकला आहे? कधीपर्यंत मिळणार? प्राप्तीकर विभागाकडून मोठी अपडेट
5
१०००, २०००, ३०००, ४०००...स्मार्टफोनच्या विक्रीतून दुकानदार किती कमाई करतात? जाणून घ्या
6
माय-लेकीने मिळून घरच्या कर्त्या पुरुषाला संपवलं अन् पोलिसांसमोर रचला बनाव! कसा उघड झाला गुन्हा?
7
'माझ्या बॉयफ्रेंडशी लई गुलूगुलू बोलते' रागातून होमगार्ड महिलेची हत्या, मृतदेह नाल्यात फेकला
8
'ट्रेडिंग गुरू' अवधूत साठे सेबीच्या रडारवर; कर्जतच्या क्लासवर मोठी कारवाई; काय आहे प्रकरण?
9
"मी वेगळा रस्ता निवडतोय...", टीव्ही अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ, घटस्फोट की आणखी काही?
10
Matthew Breetzke World Record : हा भाऊ काय ऐकत नाय! फिफ्टी प्लसचा 'चौकार' अन् आणखी एक विश्व विक्रमी डाव
11
"हा ट्रम्प यांच्या नोबेल पुरस्कार जिंकण्याच्या प्रयत्नाचा एक भाग," अमेरिकेच्या माजी NSA नं भारतावरील टॅरिफवरुन केली जोरदार टीका
12
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
13
आलिया भटचे होणारे भाऊजी कोण? शाहीनने शेअर केले बॉयफ्रेंडसोबतचे फोटो; कोण आहे तो?
14
SC on Stray Dogs: श्वानांना सार्वजनिक ठिकाणी खायला घालण्यास बंदी; पकडण्यापासून रोखल्यास २ लाखांचा दंड; सुप्रीम कोर्टाचा निर्णय
15
'मी प्रेमाने तिच्या जवळ गेलो पण...'; पहिल्या रात्रीच पत्नीचा खरा चेहरा समोर आला, घाबरलेला पती पोलिसांकडे गेला!
16
मुकेश अंबानी यांच्या आई कोकिला बेन यांची प्रकृती बिघडली; एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल
17
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
18
सावध व्हा, तुमच्यासोबतही असं घडू शकतं! अधिकारी असल्याची बतावणी करून २.३ कोटी रुपये पळवले
19
Asia Cup आधी रिंकू सिंहचा शतकी धमाका; ८ उत्तुंग षटकारासह २२५ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा
20
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?

सोयाबीन उगवलेच नाही, तक्रारींची दखल

By admin | Updated: August 7, 2014 23:42 IST

खरेदी केलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी याप्रकरणाची रितसर तक्रार कृषी विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकाऱ्यांसह इतर

पूर्णानगर : खरेदी केलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी याप्रकरणाची रितसर तक्रार कृषी विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी येथील कृषी केंद्राची चौकशी केली व येथून ३३५ जातींचे सोयाबीन विकल्याची माहिती मिळाली. पूर्णानगर येथील यश कृषी केंद्रामधून खरेदी केलेले महाबीज कंपनीचे ३३५ जातींचे सोयाबीन व यश कृषी केंद्रामधून खरेदी केलेले 'सिध्द' या जातीचे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी याप्रकरणाची तक्रार भातकुुली पंचायत समिती कृषी विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकारी मस्के, महाबीजचे व्यवस्थापक देशमुख, पंंचायत समिती अधिकारी वानखडे, उपविभागीय अधिकारी खर्चान यांनी पूर्णानगर येथील कृषी केंद्राची चौकशी केली. या केंद्रातून ३३५ जातींचे सोयाबीन विकल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी किशोर कामुने, कृषी विकास अधिकारी काठोडे, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, मस्के, महाबीज मंडळाचे देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनोद जायलवाल, पूर्णानगरचे सरपंच सुधीर बोबडे यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी कृषी केंद्र विक्रेता प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कृषी केंद्रांची सखोल चौकशी करून कारवाईचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कामुने यांनी नदीकाठच्या खरडून गेलेल्या शेतीची पाहणी करून पुनर्सर्वेक्षणाचे आदेश दिले. कृषी विभागाचा पाहणी अहवालपूर्णानगर येथील शेतकरी पवन श्रीराम दिनोदे यांचा पाहणी अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्येक्ष त्यांच्या शेताला भेट दिली असता बियाणे निघण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे दिसून आले. तूर मात्र चांगली दिसून येत आहे. एक चौरस मीटर क्षेत्रातील सोेयाबीनची झाडे मोेजली असता त्याची सरासरी ४ रोपे दिसून येत आहे. यावरून उगवणीची टक्केवारी ४ टक्के दिसून येते, असे कृषी विभागाच्या पाहणी अहवालात म्हटले आहे. शेतकरी ग्राहक मंचाकडे घेणार धावमहाबीज मंडळाचे ३३५ जातीचे सोयाबीन व सिध्द उत्पादक कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.य सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असल्याने बियाणेच बोगस निघल्याने शतकरी पुरता खचून गेला आहे. यासंदर्भात नुकसान भरपाई, पेरणी खर्च, शेतकऱ्यांची फसवणूक, होणारा मानसिक त्रास यासंदर्भात शेतकरी वर्ग ग्राहकमंचाकडे धाव घेणार आहे.