शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन उगवलेच नाही, तक्रारींची दखल

By admin | Updated: August 7, 2014 23:42 IST

खरेदी केलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी याप्रकरणाची रितसर तक्रार कृषी विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकाऱ्यांसह इतर

पूर्णानगर : खरेदी केलेले सोयाबीन बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी याप्रकरणाची रितसर तक्रार कृषी विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांनी येथील कृषी केंद्राची चौकशी केली व येथून ३३५ जातींचे सोयाबीन विकल्याची माहिती मिळाली. पूर्णानगर येथील यश कृषी केंद्रामधून खरेदी केलेले महाबीज कंपनीचे ३३५ जातींचे सोयाबीन व यश कृषी केंद्रामधून खरेदी केलेले 'सिध्द' या जातीचे बियाणे न उगवल्याने शेतकऱ्यांनी याप्रकरणाची तक्रार भातकुुली पंचायत समिती कृषी विभागाकडे केली होती. याची दखल घेऊन अमरावती विभागाचे तालुका कृषी अधिकारी मस्के, महाबीजचे व्यवस्थापक देशमुख, पंंचायत समिती अधिकारी वानखडे, उपविभागीय अधिकारी खर्चान यांनी पूर्णानगर येथील कृषी केंद्राची चौकशी केली. या केंद्रातून ३३५ जातींचे सोयाबीन विकल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी किशोर कामुने, कृषी विकास अधिकारी काठोडे, उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे, मस्के, महाबीज मंडळाचे देशमुख, जिल्हा नियोजन समिती सदस्य विनोद जायलवाल, पूर्णानगरचे सरपंच सुधीर बोबडे यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी कृषी केंद्र विक्रेता प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कृषी केंद्रांची सखोल चौकशी करून कारवाईचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कामुने यांनी नदीकाठच्या खरडून गेलेल्या शेतीची पाहणी करून पुनर्सर्वेक्षणाचे आदेश दिले. कृषी विभागाचा पाहणी अहवालपूर्णानगर येथील शेतकरी पवन श्रीराम दिनोदे यांचा पाहणी अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्येक्ष त्यांच्या शेताला भेट दिली असता बियाणे निघण्याचे प्रमाण अत्यंत अल्प असल्याचे दिसून आले. तूर मात्र चांगली दिसून येत आहे. एक चौरस मीटर क्षेत्रातील सोेयाबीनची झाडे मोेजली असता त्याची सरासरी ४ रोपे दिसून येत आहे. यावरून उगवणीची टक्केवारी ४ टक्के दिसून येते, असे कृषी विभागाच्या पाहणी अहवालात म्हटले आहे. शेतकरी ग्राहक मंचाकडे घेणार धावमहाबीज मंडळाचे ३३५ जातीचे सोयाबीन व सिध्द उत्पादक कंपनीचे सोयाबीन बियाणे उगवलेच नसल्याने शेतकऱ्यांना लाखो रूपयांचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.य सोयाबीन हे महत्त्वाचे पीक असल्याने बियाणेच बोगस निघल्याने शतकरी पुरता खचून गेला आहे. यासंदर्भात नुकसान भरपाई, पेरणी खर्च, शेतकऱ्यांची फसवणूक, होणारा मानसिक त्रास यासंदर्भात शेतकरी वर्ग ग्राहकमंचाकडे धाव घेणार आहे.