शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
2
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
3
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
राज ठाकरे यांच्या मविआमधील समावेशाबाबत काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचं मोठं विधान, म्हणाले... 
6
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
7
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
8
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
9
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
10
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
11
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
12
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
13
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
14
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
15
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
16
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
17
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
18
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
19
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
20
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?

सात लाख हेक्टरमध्ये पेरणी

By admin | Updated: June 15, 2015 00:11 IST

आठ तारखेपासून सुरु झालेल्या मृग नक्षत्रात शनिवारी मान्सूनने सार्वत्रिक हजेरी लावताच पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

गजानन मोहोड अमरावतीआठ तारखेपासून सुरु झालेल्या मृग नक्षत्रात शनिवारी मान्सूनने सार्वत्रिक हजेरी लावताच पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. यंदाच्या खरिपाच्या हंगामात ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर पेरणीक्षेत्राचे नियोजन आहे. पूर्वमान्सून व संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या क्षेत्रात अद्याप एक टक्काही पेरणी झालेली नाही. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे किमान ६० ते ७० मि.मी. पाऊ स झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत एकूण ८८ मि.मी. पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.ं-तर भासेल ओलाव्याचा अभावअमरावती : मान्सूनच्या पावसाची एक दोन दिवस मागेपुढे सुरुवात होईल. परंतु नंतर पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये पाऊस सरासरी पार करणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. खरीप २०१४ च्या हंगामात जून महिन्याची पावसाची एकूण सरासरी १४६ मिमी असताना केवळ ४० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. ही टक्केवारी केवळ ३४ होती. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी व बियाणे उगवण न झाल्याचे संकट ओढवले होते. मात्र जुलै महिन्यात पावसाची एकूण सरासरी २७७ मि.मी.च्या तुलनेत ३८६ मि.मी. म्हणजेच १३९ टक्के पाऊस पडला होता. यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यास खरीप पिकांच्या योग्यवेळी पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलाव्याचा अभाव राहण्याची शक्यता आहे. कडधान्य पिकाची वेळेवर पेरणी करण्यास अडचणी संभवतात, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पहिल्याच पावसामुळे शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळाला आहे. पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. वखर, फलटन, जांभूळवाहित, पट्टीपास आदी मिळेल त्या साधनाव्दारे तयारीला लागला आहे. बि-बियाणे खरेदीला वेग आला आहे. बीटी कपाशीची पाकीटावर १०० रुपये कमी करुन शासनाने शेतकऱ्याला अंशत: दिलासा दिला आहे. नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी दोन पीक विमा योजना सुरु केल्या आहेत. बोगस बियाण्यांचया शिरकाव होऊ नये यासाठी १५ भरारी पथके तैनात आहेत. कृषी विभागाच्या नियोजना नुसार यंदा सोयाबीनचे ३ लाख ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्र राहणार आहे. पाऊ स उशिरा आल्यास ६० दिवसांचे पीक असणारे मूग व उडीद पेरणीचे प्रमाण कमी होऊन सोयाबीन व कपाशीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.