शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सात लाख हेक्टरमध्ये पेरणी

By admin | Updated: June 15, 2015 00:11 IST

आठ तारखेपासून सुरु झालेल्या मृग नक्षत्रात शनिवारी मान्सूनने सार्वत्रिक हजेरी लावताच पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे.

गजानन मोहोड अमरावतीआठ तारखेपासून सुरु झालेल्या मृग नक्षत्रात शनिवारी मान्सूनने सार्वत्रिक हजेरी लावताच पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग वाढली आहे. यंदाच्या खरिपाच्या हंगामात ७ लाख १४ हजार ९५० हेक्टर पेरणीक्षेत्राचे नियोजन आहे. पूर्वमान्सून व संरक्षित सिंचनाची सोय असणाऱ्या क्षेत्रात अद्याप एक टक्काही पेरणी झालेली नाही. जमिनीत आर्द्रता नसल्यामुळे किमान ६० ते ७० मि.मी. पाऊ स झाल्याशिवाय पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या सरासरीच्या तुलनेत एकूण ८८ मि.मी. पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे.ं-तर भासेल ओलाव्याचा अभावअमरावती : मान्सूनच्या पावसाची एक दोन दिवस मागेपुढे सुरुवात होईल. परंतु नंतर पावसात खंड पडण्याची शक्यता आहे. जुलैमध्ये पाऊस सरासरी पार करणार असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. खरीप २०१४ च्या हंगामात जून महिन्याची पावसाची एकूण सरासरी १४६ मिमी असताना केवळ ४० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. ही टक्केवारी केवळ ३४ होती. परिणामी शेतकऱ्यांवर दुबार पेरणी व बियाणे उगवण न झाल्याचे संकट ओढवले होते. मात्र जुलै महिन्यात पावसाची एकूण सरासरी २७७ मि.मी.च्या तुलनेत ३८६ मि.मी. म्हणजेच १३९ टक्के पाऊस पडला होता. यंदा जूनमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यास खरीप पिकांच्या योग्यवेळी पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलाव्याचा अभाव राहण्याची शक्यता आहे. कडधान्य पिकाची वेळेवर पेरणी करण्यास अडचणी संभवतात, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या पहिल्याच पावसामुळे शेतकऱ्यांना सध्या दिलासा मिळाला आहे. पेरणीपूर्व अंतिम मशागतीसाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरु झाली आहे. वखर, फलटन, जांभूळवाहित, पट्टीपास आदी मिळेल त्या साधनाव्दारे तयारीला लागला आहे. बि-बियाणे खरेदीला वेग आला आहे. बीटी कपाशीची पाकीटावर १०० रुपये कमी करुन शासनाने शेतकऱ्याला अंशत: दिलासा दिला आहे. नैसर्गिक आपत्तीपासून पिकाचे संरक्षण व्हावे, यासाठी दोन पीक विमा योजना सुरु केल्या आहेत. बोगस बियाण्यांचया शिरकाव होऊ नये यासाठी १५ भरारी पथके तैनात आहेत. कृषी विभागाच्या नियोजना नुसार यंदा सोयाबीनचे ३ लाख ४० हजार हेक्टर पेरणी क्षेत्र राहणार आहे. पाऊ स उशिरा आल्यास ६० दिवसांचे पीक असणारे मूग व उडीद पेरणीचे प्रमाण कमी होऊन सोयाबीन व कपाशीचे पेरणीक्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.