शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार! विद्यार्थ्यांना कधी आणि कुठे पाहता येणार? जाणून घ्या
2
Video: 'आय लव्ह यू यार... प्लीज उठ जा...'; हुतात्मा सुरेंद्र कुमार यांच्या पत्नीचा मन हेलावून टाकणारा आक्रोश
3
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
4
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
5
'या' मॉडेलला आता आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागणार; ग्लॅमरस ते खुनी 'असा' होता प्रवास
6
पाकला पाठिंबा देणाऱ्या चीनला भारताने शिकवला धडा; ड्रॅगनला ५ वर्षे सहन करावा लागणार तोटा
7
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३२,०४४ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
9
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
10
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
11
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
12
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
13
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
14
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
15
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
16
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
17
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
18
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
19
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
20
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...

पश्चिम विदर्भात खरिपाची २९.२५ लाख हेक्टरमध्ये पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:11 IST

अमरावती : विभागात ९ जुलैनंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत ३२,२८,५०० हेक्टर सरासरी ...

अमरावती : विभागात ९ जुलैनंतर पावसाची रिपरिप सुरू झाल्याने खरिपाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत ३२,२८,५०० हेक्टर सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २९,२५,४०० हेक्टर क्षेत्रात पेरणी आटोपली आहे. ही ९१ टक्केवारी आहे. विभागातल्या चार जिल्ह्यात ९० टक्क्यांवर पेरणी झालेली असतांना पावसाअभावी अकोला जिल्ह्यात मात्र टक्का माघारल्याचे दिसून येते.

पश्चिम विदर्भात १० जूनला मान्सूनचे आगमन झाले असले तरी सक्रिय नसल्याने पेरण्या रखडल्या होत्या. मात्र, महिनाभरानंतर म्हणजेच ९ जुलैपासून पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने खरिपाच्या पेरण्यांना गती आली. त्यापूर्वी १० ते १२ दिवस पावसात खंड पडल्याने काही भागात दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. त्या पेरण्यादेखील आता आटोपल्या आहेत. अकोला जिल्ह्यात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या होत्या. त्यांनाही आता गती आल्याचे दिसून येते.

विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या गुरुवारच्या अहवालानुसार अमरावती जिल्ह्यात ६,४९,५०० हेक्टरमध्ये पेरणी झालेली आहे. ही ९४ टक्केवारी आहे. यवतमाळ जिल्ह्यात ८,६८,२०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९५ टक्केवारी आहे. वाशिम जिल्ह्यात ३,७७,९०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९२ टक्केवारी आहे. बुलडाणा जिल्ह्यात ६,६७,२०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही ९१ टक्केवारी आहे. याशिवाय अकोला जिल्ह्यात ३,६२,४०० हेक्टरमध्ये आतापर्यत पेरणी आटोपली. ही ७५ टक्केवारी आहे.

बॉक्स

सर्वाधिक १३.११ लाख हेक्टरमध्ये सोयाबीन

विभागात आतापर्यंत झालेल्या पेरण्यांमध्ये सर्वाधिक १३,११,१०० हेक्टरमध्ये सोयाबीनचे क्षेत्र आहे. सोयाबीनच्या सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ही ८६ टक्केवारी आहे. याशिवाय कपाशीची ९,१६,८०० हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणी झालेली आहे. ही सरासरीच्या ९३ टक्के क्षेत्र आहे. कृषी विभागाच्या मते आता सोयाबीनचे नापेर क्षेत्र कपाशीच्या क्षेत्रात रुपांतरीत होण्याची शक्यता आहे.

बॉक्स

असे आहे पीकनिहाय क्षेत्र

विभागात सद्यस्थितीत ५,३०० हेक्टरमध्ये धान, २७,००० हेक्टरमध्ये ज्वारी, १०० हेक्टरमध्ये बाजरी, २५,५०० हेक्टरमध्ये मका, १,३०० हेक्टरमध्ये इतर तृणधान्य, ३,७९,१०० हेक्टरमध्ये तूर, ५५,९०० हेक्टरमध्ये मूग, ४२,४०० हेक्टरमध्ये उडीद, ६०० हेक्टरमध्ये भुईमूग, ९०० हेक्टरमध्ये तीळ, १०० हेक्टरमध्ये सुर्यफुलाची पेरणी झालेली आहे.