शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

१५ कोटींची सौरपंप योजना बारगळली

By admin | Updated: October 22, 2015 00:14 IST

जिल्ह्यात धारणी, चिखलदरा, अचलपूर तालुक्यामधील २३ गावांमध्ये सुमारे १५ कोटी ५ लाख रुपये खर्च करुन सौरपंप बसविण्यात आलेत.

सौर ऊर्जा प्लेट्स गेल्या चोरीला : बहुतांश गावात तांत्रिक अडचणीमनीष कहाते अमरावतीजिल्ह्यात धारणी, चिखलदरा, अचलपूर तालुक्यामधील २३ गावांमध्ये सुमारे १५ कोटी ५ लाख रुपये खर्च करुन सौरपंप बसविण्यात आलेत. त्यापैकी बहुतांश गावातील सौरपंप बंद असल्याने सौरपंप योजना कुचकामी ठरली आहे. जि.प.ची भूजलसर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वरिष्ठ भूजल वैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग आणि संबंधित ग्रा.पं.अशा तीन विभागांचा थेट संबंध सौरपंप योजनेशी येतो. प्रत्येक गावामध्ये ४ लाख ८८ हजार ७२८ रुपयांची सौरपंप योजना कार्यान्वित केली आहे. त्यामध्ये धारणी तालुक्यातील भुलूमगव्हाण, ढोकडा, खोपमार, खामडा, चोपण या गावांचा सौरपंप योजनेमध्ये समावेश आहे. चिखलदरा तालुक्यातील मेळघाट, बीबा, सेमाडोह, हातरु, ढाकणा, तेटू, केशरपूर आणि पातखाऊ इत्यादी गावे समाविष्ट आहेत. अचलपूरमधील जलालपूर, कुंभी, अंजनगाव तालुक्यातील चिंचोली, अशा एकूण ३१ गावांमध्ये सौरपंप बसविण्यात आले आहेत. त्यावर भूजल सर्वेक्षण विभागाने १५ कोटी ५ लाख रुपये सन २०११ पासून खर्च केले आहेत. प्रशासनाचा सर्वच गावातील सौरपंप सुरु असल्याचा दावा असला तरी धारणी तालुक्यातील कोट, ढोकडा आणि खोपमार, चिखलदरा तालुक्यातील ढाकणा या गावातील सौरपंप बंद आहेत. बहुतांश गावातील सौरपंप तांत्रिक अडचणींमुळे बंद आहेत. ज्या गावाची लोकसंख्या ३०० ते ४०० च्या आत आहेत आणि जेथे वीज नाही तसेच जेथे तांडावस्ती आहे, अशा ठिकाणी सौरपंप बसविण्यात येतात. अशा गावांमध्ये पाण्याची टाकी, २०० मीटरची पाईप लाईन आणि २ ठिकाणी नळ कनेक्शन असे या योजनेचे स्वरुप आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण योजनाच बारगळली आहे. अनेक गावातील सौरऊर्जा प्लेट्स चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे गावात पाणी पुरवठा विस्कळीत झाली आहे. यासंदर्भात वरिष्ठ भूजल वैज्ञानिक कराड यांचेशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.