शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सोफियाचा ‘दगाफटका’ सुरूच!

By admin | Updated: March 23, 2016 00:24 IST

महसूल प्रशासनाला अंधारात ठेवत रतन इंडियाने २ लाख ब्रास मुरूम अवैधरीत्या रेल्वे कामाकरिता वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे.

नागरिकांसह प्रशासनाला अव्हेरले : बाधितांची फसवणूकअमरावती : महसूल प्रशासनाला अंधारात ठेवत रतन इंडियाने २ लाख ब्रास मुरूम अवैधरीत्या रेल्वे कामाकरिता वापरल्याचा प्रकार उघड झाला आहे. रतन इंडिया (जुने नाव इंडिया बुल्स)ला अवैध कृत्याबद्दल ४ कोटींचा दंडही महसूल प्रशासनाने ठोठावला. मात्र, एक केंद्रीय मंत्रीच आपल्या हातात असल्याने महसूल प्रशासन वा कुणीही आपले काहीही बिघडवू शकत नाही, असे कंपनीतील वरिष्ठ राजरोसपणे सांगतात. त्यामुळे हा कोट्यवधींचा दंडही ते निमूटपणे भरतील, असे अजिबात नाही. सन २००९ पासूनच सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पाच्या व्यवस्थापन व स्थानिक अधिकाऱ्यांनी अमरावतीकरांच्या डोळ्यांत धूळफेक करण्याचा प्रयत्न केला. प्रसंगी विविध आमिषेसुद्धा दाखविली. टोकाचा विरोध मोडीत काढून आता तर सोफियातून वीजनिर्मिती सुरू झाल्याने कंपनी ‘मुजोर’ बनली आहे. विरोधाची धार तीव्र असताना मुंबई-दिल्लीच्या बैठकीत कंपनी व्यवस्थापनाने आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता कंपनी मुजोर झाली आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या हातावर तुरी देण्यात कंपनी यशस्वी ठरत आहे. स्थानिकांना सर्वाधिक रोजगार,स्वस्त दरात वीज, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई अशी विविध आश्वासने सोफियाकडून देण्यात आली. यातील एकाही आश्वासनाची पूर्ती अद्यापही झाली नाही. सिंचनाचे पाणी व १२ लाख लोकांच्या पेयजलावर डल्ला मारत सोफियाची सामाजिक बांधिलकी केवळ आग विझविण्याच्या एखाद्या प्रसंगापुरती मर्यादित आहे. प्रशासनालाही आपण मोजत नसल्याचे कंपनीने गौण खनिजाच्या रॉयल्टीचे ४ कोटी रुपये थकवून दाखवून दिले आहे. १ लाख ८० हजार शेतकऱ्यांचा रोजगार बुडाला!सोफिया औष्णिक विद्युत प्रकल्पासाठी अप्पर वर्धातील पाणी आरक्षित केल्याने सिंचनक्षेत्र बाधित होऊन १ लाख ८० हजार शेतकऱ्यांचा रोजगार बुडणार आहे, अशी भूमिका घेत आॅक्टोबर २०१० मध्ये सोफिया हटाव संघर्ष समिती जन्माला आली होती. तो विरोध मोडून काढून सोफियाचा ‘दगाफटका’ सुरूच आहे. कोळसा वाहतुकीने रस्त्यांची दुर्दशानांदगावपेठ औद्योगिक वसाहतीतील सोफियासाठी कोळशाची ने-आण सतत सुरू असते. अनियंत्रित वाहतुकीमुळे या भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. वलगाव येथील नागरिकांनी सोफियाच्या ट्रक वाहतुकीबाबत आंदोलन उभारले होते. त्या आंदोलनालाही सोफियाचे व्यवस्थापन जुमानले नाही.११७८ शेतकऱ्यांची जमीनडवरगाव व लगतच्या परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनीवर नांदगाव पेठ औद्योगिक वसाहत उभी राहिली. सुमारे १२०० शेतकऱ्यांची ७ हजार एकर जमीन १९९४ मध्ये कवडीमोल भावात घेतली गेली. त्याच जागेवर ही वसाहत उभी राहिली व तेथेच सोफिया औष्णीक विद्युत प्रकल्प कार्यान्वित झाला. स्थानिकांना नोकरीची संधी मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्यात. २२ वर्षांपासून हे प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्याने नौकरी द्यावी, यासाठी ५ जून २०१० ला अन्याय निवारण समितीने आंदोलन केले होते. मात्र त्या आंदोलकांच्या भावनेलाही सोफियाने हरताळ फासला आहे.