शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
2
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
3
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
4
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
5
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
6
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
7
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
8
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
9
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
10
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
11
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
12
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
13
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
14
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
15
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
16
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
17
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
18
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
19
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
20
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात

एसएमएस कंपनीचे दूषित पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:10 IST

नांदगाव पेठ : स्थानिक पंचतारांकित एमआयडीसीत जलशुद्धीकरण करणाऱ्या एसएमएस कंपनीचे केमिकलयुक्त पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये शिरले आहे. यामुळे नांदगाववासीयांचे आरोग्य ...

नांदगाव पेठ : स्थानिक पंचतारांकित एमआयडीसीत जलशुद्धीकरण करणाऱ्या एसएमएस कंपनीचे केमिकलयुक्त पाणी पुन्हा जलस्रोतांमध्ये शिरले आहे. यामुळे नांदगाववासीयांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रवाहाने हे दूषित पाणी वाहत आता बोरनदी प्रकल्पात जात असून भविष्यात परिसरातील शेती आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा आहे.

नजीकच्या आस्वाद हॉटेलच्या बाजूला असलेल्या कालव्यात या दूषित आणि केमिकलयुक्त पाण्याचे थर साचलेले आहे. हे पाणी पावसाच्या प्रवाहाने जलस्रोतांमध्ये शिरत आहे. शिवाय नदीच्या कालव्यातून हे पाणी नव्याने बनलेल्या बोरनदी प्रकल्पातदेखील शिरत असल्यामुळे आजूबाजूची शेती आणि नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होणार आहे. एसएमएस कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतीत हे केमिकलयुक्त पाणी शिरल्याने येथील संत्राबागा व शेतातील उत्पादन कायमचे बंद झाले आहे. नुकतेच पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांशी चर्चा करून सदर बाधित झालेली शेती अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आहे. या कंपनीला वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा कंपनीने आजवर कोणतीच दाखल घेतलेली नसून, हे दूषित पाणी बघण्यासाठी नुकतेच ग्रामपंचायत सदस्य बाळू राऊत, छत्रपती पटके, गोलू नागापुरे व मोरेश्वर इंगळे यांनी मोका पाहणी करून कंपनीवर कारवाईची मागणी केली.