शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

भूधारकांच्या संमतीवर ‘स्मार्ट सिटी’ची मदार

By admin | Updated: February 17, 2017 00:18 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्याची ‘डेडलाईन’ जवळ आली असताना

२७ फेब्रुवारीची ‘डेडलाईन’ : ११८ हेक्टर जमिनीची गरज अमरावती : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आवश्यक प्रस्ताव पाठविण्याची ‘डेडलाईन’ जवळ आली असताना वडद येथिल शेतकऱ्यांनी त्यांची जमीन देण्यास अद्यापही संमती दिलेंली नाही. वडद येथिल शेतकऱ्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी त्यांची जमीन उपलब्ध करून देण्यासाठी २७ फेब्रुवारीपर्यंत लेखी संमती द्यावी, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केले आहे.महापालिकेतर्फे वडद येथिल ११८.८३ अर्थात २९७ एकर जमिनीवर स्मार्ट सिटी प्रकल्प विचाराधीन आहे. त्यासाठी संबंधित जमीनधारकांची संमती असल्याचे दस्तऐवज मिळाल्यानंतरच प्रस्तावाचा मार्ग प्रशस्त होणार आहे. स्मार्ट सिटी स्पर्धेच्या पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये अमरावती महापालिकेने तयार केलेल्या प्रस्तावाचा टिकाव लागू शकला नाही. त्यामुळे आता महापालिकेला ३१ मार्चपर्यंत नव्याने स्मार्ट सिटीच्या जागेसह केंद्रशासनाला सुधारित प्रस्ताव पाठवायचा आहे. मात्र, वडद येथिल शेतकऱ्यांनी महापालिकेच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद न दिल्याने स्मार्ट सिटीच्या सहभागावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत तिसऱ्या टप्प्यासाठी लागणाऱ्या जागेबाबत महापालिकेत १७ जानेवारीला संबंधित शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीदरम्यान स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या महत्त्वासह शेतकऱ्यांच्या वा त्या जमिनधारकांच्या लाभाबाबत उहापोह करण्यात आला. आयुक्त हेमंत पवार यांच्यासह उभय उपायुक्त आणि पर्यावरण अधिकारी महेश देशमुख यांनी त्यावेळी उपस्थित जमिनधारकांशी सकारात्मक संवाद साधला होता. महापालिकेतर्फे त्या जमिनधारकांना सुयोग्य प्रस्ताव देण्यात आला. एकूण जमिनीपैकी ३० टक्के जमिनी त्यांना ‘वेल डेव्हलप’ करुन दिली जाईल. ती जमीन संबंधित शेतकऱ्यांमध्ये समप्रमाणात वितरित करण्यात येईल, असा एकंदर प्रस्ताव होता. त्याअनुषंगाने जमिनधारकांनी त्यांची एक कृती समिती गठित करून महापालिकेला निर्णय कळवावा, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने ‘शेतकरी कृती समिती स्मार्ट सिटी मौजे वडद’ ची स्थापना केल्याचे ११ फेब्रुवारीला महापालिकेला कळविण्यात आले. मात्र, १७ जानेवारीच्या बैठकीनंतर महिना उलटत असताना संबंधित जमिनधारकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे संबंधित जमिनधारकांना जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत नोटीस देण्याची कारवाई महापालिकास्तरावरुन सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी मौजे वडद येथिल सर्वे क्रमांकनिहाय जमीन मालकांची यादी जाहीर करण्यात आली असून स्मार्ट सिटी प्रकल्पाकरिता जमीन उपलब्ध करुन देण्याबाबत लेखी संमती २७ फेब्रुवारीपर्यंत महापालिकेस सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.