शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
3
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
4
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
5
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
6
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
7
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
8
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन
9
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
10
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
11
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
12
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
13
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
14
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
15
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
16
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
17
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
18
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
19
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
20
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!

अंजनगावात आडजात वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 00:06 IST

जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला मनाई असताना अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात महारुख, कडूनिंब वड, आंबा आदी वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे.

वनाधिकाऱ्यांचे अभय : महारुख, कडूनिंब, आंबा, वडाचे शेकडो टन लाकूडअमरावती : जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला मनाई असताना अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात महारुख, कडूनिंब वड, आंबा आदी वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे. आरागिरणी मालकांसोबत वनाधिकाऱ्यांचे लांगेबांधे असल्यामुळे दररोज हजारो टन आडजात लाकूड आरागिरण्यांमध्ये फस्त होत आहे. वनाधिकाऱ्यांच्या अल्प लाभाच्या हव्यासापोटी जंगल नष्ट होत आहे. एकीकडे उपवनसंरक्षक हेमंत मीना हे जंगलाच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत तर दुसरीकडे त्यांचे अधिनस्थ वनाधिकारी, कर्मचारी आरागिरणी मालकांकडून चिरीमिरी घेऊन आडजात लाकडाच्या कटाईला मूकसंमती देत आहेत. वनविभागाचा कारभार ‘दिव्याखाली अंधार’ असा सुरू आहे. वरिष्ठ वनाधिकारी जंगल, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी धडपड करीत असले तरी कनिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या दिवसाची सुरूवातच ‘लक्ष्मी दर्शन’ घेतल्याशिवाय होत नाही. परिणामी जिल्ह्यात अवैध आडजात लाकूड कटाई करून मोठ्या प्रमाणात आणले जात आहे. अंजनगाव सुर्जी हे हल्ली आडजात लाकूड तस्करीचे केंद्र बनले आहे. शुक्रवारी कलाम सॉ-मिलमध्ये मोठ्या प्रमाणात आडजात वृक्षकटाई करून आणल्या जाणाऱ्या लाकडाचे छायाचित्र विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला पाठविले आहे. तसेच जुन्या बसस्थानकाच्या बाजुला असलेल्या आर. के. स्टीलमध्ये देखील अवैध लाकूड आणले आहे. आडजात लाकूड कापण्याला मनाई असुनही परतवाडा वनपरिक्षेत्राधिकारी एस. बी. बारखडे आरागिरण्यांवर कारवाई का करीत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. वृक्ष कटाईचे वास्तव वेगळेचअमरावती : परतवाडा, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार आदी भागात अवैध लाकूड कापणे सुरुच असल्याची माहिती आहे. परंतु उपवनसंरक्षक हेमंत मीना आडजात वृक्षकटाई आणि आरागिरण्यांना अवैध लाकूड कापण्याबाबत आढावा घेतात तेव्हा ‘सर सब कुछ बंद है’ असा सूर सर्वच वनपरिक्षेत्राधिकारी आळवतात. मात्र, आडजात वृक्षकटाईची वास्तविकता वेगळीच आहे. यापूर्वी देखील अंजनगाव सुर्जी येथे शहानूर नदीच्या काठावर आडजात वृक्षांचे लाकूड मोठ्या प्रमाणात बेवारस आढळले होते. अखेर उपवनसंरक्षकांनी येथे धाडसत्र राबवून लाकूड जप्त केले होते. आरागिरणीत दरदिवसाला आणले जाणारे अवैध लाकूड रोखण्यासाठी उपवनसंरक्षकांनी आरागिरण्यांमध्ये आता ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवावे, अशी मागणी वृक्षप्रेमिंनी केली आहे. (प्रतिनिधी)उपवनसंरक्षकांना दिली जाते खोटी माहितीआरागिरणीत अवैध लाकूडकटाई सुरु असताना काहीच नियमबाह्य सुरु नसल्याची खोटी माहिती कनिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून उपवनसंरक्षकांना दिली जाते. वन विभागात ‘आॅलवेल’ असल्याचे भासवून आरागिरणी मालकांना अवैध व्यवसायासाठी बळ देण्याचे कटकारस्थान वनपरिक्षेत्राधिकारी, वनपालांकडून रचले जात असल्याचे चित्र आहे.