शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

अंजनगावात आडजात वृक्षांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2016 00:06 IST

जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला मनाई असताना अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात महारुख, कडूनिंब वड, आंबा आदी वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे.

वनाधिकाऱ्यांचे अभय : महारुख, कडूनिंब, आंबा, वडाचे शेकडो टन लाकूडअमरावती : जिल्ह्यात आडजात वृक्ष कटाईला मनाई असताना अंजनगाव सुर्जी येथे मोठ्या प्रमाणात महारुख, कडूनिंब वड, आंबा आदी वृक्षांची अवैध कटाई केली जात आहे. आरागिरणी मालकांसोबत वनाधिकाऱ्यांचे लांगेबांधे असल्यामुळे दररोज हजारो टन आडजात लाकूड आरागिरण्यांमध्ये फस्त होत आहे. वनाधिकाऱ्यांच्या अल्प लाभाच्या हव्यासापोटी जंगल नष्ट होत आहे. एकीकडे उपवनसंरक्षक हेमंत मीना हे जंगलाच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस परिश्रम घेत आहेत तर दुसरीकडे त्यांचे अधिनस्थ वनाधिकारी, कर्मचारी आरागिरणी मालकांकडून चिरीमिरी घेऊन आडजात लाकडाच्या कटाईला मूकसंमती देत आहेत. वनविभागाचा कारभार ‘दिव्याखाली अंधार’ असा सुरू आहे. वरिष्ठ वनाधिकारी जंगल, वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी धडपड करीत असले तरी कनिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या दिवसाची सुरूवातच ‘लक्ष्मी दर्शन’ घेतल्याशिवाय होत नाही. परिणामी जिल्ह्यात अवैध आडजात लाकूड कटाई करून मोठ्या प्रमाणात आणले जात आहे. अंजनगाव सुर्जी हे हल्ली आडजात लाकूड तस्करीचे केंद्र बनले आहे. शुक्रवारी कलाम सॉ-मिलमध्ये मोठ्या प्रमाणात आडजात वृक्षकटाई करून आणल्या जाणाऱ्या लाकडाचे छायाचित्र विश्वसनीय सूत्रांनी ‘लोकमत’ला पाठविले आहे. तसेच जुन्या बसस्थानकाच्या बाजुला असलेल्या आर. के. स्टीलमध्ये देखील अवैध लाकूड आणले आहे. आडजात लाकूड कापण्याला मनाई असुनही परतवाडा वनपरिक्षेत्राधिकारी एस. बी. बारखडे आरागिरण्यांवर कारवाई का करीत नाही, हा संशोधनाचा विषय आहे. वृक्ष कटाईचे वास्तव वेगळेचअमरावती : परतवाडा, अंजनगाव सुर्जी, चांदूरबाजार आदी भागात अवैध लाकूड कापणे सुरुच असल्याची माहिती आहे. परंतु उपवनसंरक्षक हेमंत मीना आडजात वृक्षकटाई आणि आरागिरण्यांना अवैध लाकूड कापण्याबाबत आढावा घेतात तेव्हा ‘सर सब कुछ बंद है’ असा सूर सर्वच वनपरिक्षेत्राधिकारी आळवतात. मात्र, आडजात वृक्षकटाईची वास्तविकता वेगळीच आहे. यापूर्वी देखील अंजनगाव सुर्जी येथे शहानूर नदीच्या काठावर आडजात वृक्षांचे लाकूड मोठ्या प्रमाणात बेवारस आढळले होते. अखेर उपवनसंरक्षकांनी येथे धाडसत्र राबवून लाकूड जप्त केले होते. आरागिरणीत दरदिवसाला आणले जाणारे अवैध लाकूड रोखण्यासाठी उपवनसंरक्षकांनी आरागिरण्यांमध्ये आता ‘सर्जिकल स्ट्राईक’ राबवावे, अशी मागणी वृक्षप्रेमिंनी केली आहे. (प्रतिनिधी)उपवनसंरक्षकांना दिली जाते खोटी माहितीआरागिरणीत अवैध लाकूडकटाई सुरु असताना काहीच नियमबाह्य सुरु नसल्याची खोटी माहिती कनिष्ठ वनाधिकाऱ्यांकडून उपवनसंरक्षकांना दिली जाते. वन विभागात ‘आॅलवेल’ असल्याचे भासवून आरागिरणी मालकांना अवैध व्यवसायासाठी बळ देण्याचे कटकारस्थान वनपरिक्षेत्राधिकारी, वनपालांकडून रचले जात असल्याचे चित्र आहे.