शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

राजखेड-वडनेर मार्गावर २४ झाडांची कत्तल

By admin | Updated: June 18, 2016 00:08 IST

दर्यापूर तालुक्यात अवैध वृक्षतोडीला उधाण आले आहे. वडनेरगंगाई-राजखेड मार्गावर एमआरजीएसमधून पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून तयार करण्यात आले.

रानवैऱ्यांचा उपद्रव : महसूल विभागाचे दुर्लक्ष येवदा : दर्यापूर तालुक्यात अवैध वृक्षतोडीला उधाण आले आहे. वडनेरगंगाई-राजखेड मार्गावर एमआरजीएसमधून पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून तयार करण्यात आले. परंतु या मार्गावरील १९ बाभळीची आणि ५ निंबाची अपरिपक्व झाडे तोडण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी महसूल विभागाकडे परवानगी मागितली होती. परंतु झाडे तोडण्यास मनाई केल्यावरसुध्दा कुणालाही विश्वासात न घेता हिरवीकंच झाडे बुंध्यापासून तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एकीकडे सामाजिक वनीकरण विभाग दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करीत आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांना तसे आदेश देत आहे. तर दुसरीकडे नियम धाब्यावर बसविले जात आहे. येवदा परिसरातील वडनेरगंगाई, राजखेड, येरंडगाव, उमरी, येवदा, पिंपळोद मार्गावरील झाडे कोणतीही परवानगी न घेता अवैधरीत्या तोडली जात आहे. काही शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून जिवंत झाडांना जाळण्याचे कटकारस्थान रचत आहे. जिवंत झाडे जाळून मार्गावर पाडली जातात. त्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. आजपर्यंत कारवाई केल्याचे दिसत नाही. एक झाड तयार करण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा अवधी लागतो. पोटच्या मुलाप्रमाणे दररोज पाणी टाकून झाडांची जपणूक केली जाते. काही ठिकाणी नियोजनशून्य धोरणामुळे झाडे वाळतात. झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश शासन देत असले तरी रानवैऱ्यांकडून शासनाच्या उपक्रमाला तिलांजली दिली जात आहे. शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून योजना राबवीत आहे. शासनाने जर वृक्ष जिवंत ठेवण्याकडे लक्ष दिले तर पुढे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मदत होईल. शासनाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अनभिज्ञवृक्षकटाईबाबत दर्यापुरचे उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलण्यास साफ नकार दिला. यावरून दर्यापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना पर्यावरणाबाबत काही देणे-घेणे नाही, हे दिसून येते. तालुक्यात होत असलेली कत्तल त्वरित थांबवावी, अशी मागणी होत आहे.