शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजखेड-वडनेर मार्गावर २४ झाडांची कत्तल

By admin | Updated: June 18, 2016 00:08 IST

दर्यापूर तालुक्यात अवैध वृक्षतोडीला उधाण आले आहे. वडनेरगंगाई-राजखेड मार्गावर एमआरजीएसमधून पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून तयार करण्यात आले.

रानवैऱ्यांचा उपद्रव : महसूल विभागाचे दुर्लक्ष येवदा : दर्यापूर तालुक्यात अवैध वृक्षतोडीला उधाण आले आहे. वडनेरगंगाई-राजखेड मार्गावर एमआरजीएसमधून पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून तयार करण्यात आले. परंतु या मार्गावरील १९ बाभळीची आणि ५ निंबाची अपरिपक्व झाडे तोडण्यासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी महसूल विभागाकडे परवानगी मागितली होती. परंतु झाडे तोडण्यास मनाई केल्यावरसुध्दा कुणालाही विश्वासात न घेता हिरवीकंच झाडे बुंध्यापासून तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एकीकडे सामाजिक वनीकरण विभाग दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करीत आहे. त्याबाबत कर्मचाऱ्यांना तसे आदेश देत आहे. तर दुसरीकडे नियम धाब्यावर बसविले जात आहे. येवदा परिसरातील वडनेरगंगाई, राजखेड, येरंडगाव, उमरी, येवदा, पिंपळोद मार्गावरील झाडे कोणतीही परवानगी न घेता अवैधरीत्या तोडली जात आहे. काही शेतकरी वन्यप्राण्यांच्या त्रासाला कंटाळून जिवंत झाडांना जाळण्याचे कटकारस्थान रचत आहे. जिवंत झाडे जाळून मार्गावर पाडली जातात. त्यामुळे अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर बाबीकडे कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. आजपर्यंत कारवाई केल्याचे दिसत नाही. एक झाड तयार करण्यासाठी पाच ते दहा वर्षांचा अवधी लागतो. पोटच्या मुलाप्रमाणे दररोज पाणी टाकून झाडांची जपणूक केली जाते. काही ठिकाणी नियोजनशून्य धोरणामुळे झाडे वाळतात. झाडे लावा झाडे जगवा, असा संदेश शासन देत असले तरी रानवैऱ्यांकडून शासनाच्या उपक्रमाला तिलांजली दिली जात आहे. शासन वृक्ष लागवडीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून योजना राबवीत आहे. शासनाने जर वृक्ष जिवंत ठेवण्याकडे लक्ष दिले तर पुढे होणारा पर्यावरणाचा ऱ्हास थांबण्यास मदत होईल. शासनाने याबाबत कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.दर्यापूरचे उपविभागीय अधिकारी अनभिज्ञवृक्षकटाईबाबत दर्यापुरचे उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी यांना विचारणा केली असता त्यांनी याबाबत बोलण्यास साफ नकार दिला. यावरून दर्यापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना पर्यावरणाबाबत काही देणे-घेणे नाही, हे दिसून येते. तालुक्यात होत असलेली कत्तल त्वरित थांबवावी, अशी मागणी होत आहे.