शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

साडेसतरा कोटींची मदत वितरित

By admin | Updated: March 24, 2016 00:35 IST

जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ३६ हजार ८४६ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

मे ते आॅक्टोबर २०१४ मधील नुकसान : ३७ हजार हेक्टरमधील पीके होती बाधित अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ३६ हजार ८४६ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. १ लाख ९ हजार ९३७ शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता. यासाठी शासनाने १७ मार्च रोजी १७ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर केला होता. हा निधी जिल्हा प्रशासनाने बुधवारी सर्व तालुक्यांना वितरित केला. पुढच्या आठवड्यात हा निधी बाधीत शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. सन २०१४ मध्ये मे ते आॅक्टोबर दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट व अतीवृष्टी यामुळे जिल्ह्यातील १ लाख ९ हजार शेतकऱ्यांच्या ३६ हजार ८४६ क्षेत्र बाधीत झाले. यामध्ये भात पिकाचे २० आर, कपाशी ५ हजार ८०८ हेक्टर, सोयाबीन १० हजार ४१ हेक्टर, तूर १६ हजार ५४२ हेक्टर, मूग व उडीद ३ हजार १८५ हेक्टर, ज्वारी ६५ हेक्टर, व इतर १८६ हेक्टर शेतीपीकांचे नुकसान झाले आहे. तसेच फळपीकांमध्ये ५१७ हेक्टर संत्रा, ५०० हेक्टर केळी असे एकूण १ हजार १७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या बाधीत क्षेत्राला ३० जानेवारी २०१४ चे शासन निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रास ४ हजार ५०० हेक्टर,ओलीताखालील पिकांना ९००० रुपये हेक्टर, बहुवार्षिक फळपिकांसाठी १२ हजार रुपये प्रती हेक्टर, रुपये वाटप करण्यात आले आहे. खरीप २०१४ (अवर्षण) मध्ये वाटप रक्कम वगळता उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून कोरडवाहू ५ हजार ५०० रुपये, ओलीताखाली ६ हजार रुपये व बहुवार्षीक पिकांकरिता १३ हजार रुपये हेक्टर या प्रमाणे प्रती हेक्टर या प्रमाणे दोन हेक्टर या मर्यादित वाटप करण्यात येणार आहे. या मदतीमधून बँकेने शेतकऱ्यांची कर्जकपात व अन्य कुठलीही कपात करु नये असे निर्देश आहे. २००७ मधील घरांच्या नुकसानीसाठी  साडेसात कोटी मंजूर जिल्ह्यात २००७ मध्ये अतिवृष्टी व पूर नुकसान झालेल्या ४३ गावामधील ४ हजार १२२ घरांच्या बांधकामास लाभार्थी घर बांधणार या तत्वावर शासनाने मान्यता दिली. यासाठी शासनाने १० कोट ६६ लाख ९० हजार इतका निधी मंजूर केला व यापैकी ७० टक्के म्हणजे ७ कोटी ४६ लाख ८३ हजार इतका निधी शासनाने जिल्ह्याला वितरित केला आहे.हा निधि ३१ मार्च २०१६ पर्यंत बाधितांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.