शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

साडेसतरा कोटींची मदत वितरित

By admin | Updated: March 24, 2016 00:35 IST

जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ३६ हजार ८४६ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.

मे ते आॅक्टोबर २०१४ मधील नुकसान : ३७ हजार हेक्टरमधील पीके होती बाधित अमरावती : जिल्ह्यात मे ते आॅक्टोबर २०१४ मध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे ३६ हजार ८४६ हेक्टरमधील शेतीपिके व फळपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. १ लाख ९ हजार ९३७ शेतकऱ्यांना या नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला होता. यासाठी शासनाने १७ मार्च रोजी १७ कोटी ५२ लाखांचा निधी मंजूर केला होता. हा निधी जिल्हा प्रशासनाने बुधवारी सर्व तालुक्यांना वितरित केला. पुढच्या आठवड्यात हा निधी बाधीत शेतकऱ्यांच्या बॅँक खात्यात जमा होणार आहे. सन २०१४ मध्ये मे ते आॅक्टोबर दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट व अतीवृष्टी यामुळे जिल्ह्यातील १ लाख ९ हजार शेतकऱ्यांच्या ३६ हजार ८४६ क्षेत्र बाधीत झाले. यामध्ये भात पिकाचे २० आर, कपाशी ५ हजार ८०८ हेक्टर, सोयाबीन १० हजार ४१ हेक्टर, तूर १६ हजार ५४२ हेक्टर, मूग व उडीद ३ हजार १८५ हेक्टर, ज्वारी ६५ हेक्टर, व इतर १८६ हेक्टर शेतीपीकांचे नुकसान झाले आहे. तसेच फळपीकांमध्ये ५१७ हेक्टर संत्रा, ५०० हेक्टर केळी असे एकूण १ हजार १७ हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते. या बाधीत क्षेत्राला ३० जानेवारी २०१४ चे शासन निर्णयानुसार कोरडवाहू क्षेत्रास ४ हजार ५०० हेक्टर,ओलीताखालील पिकांना ९००० रुपये हेक्टर, बहुवार्षिक फळपिकांसाठी १२ हजार रुपये प्रती हेक्टर, रुपये वाटप करण्यात आले आहे. खरीप २०१४ (अवर्षण) मध्ये वाटप रक्कम वगळता उर्वरित रक्कम विशेष बाब म्हणून कोरडवाहू ५ हजार ५०० रुपये, ओलीताखाली ६ हजार रुपये व बहुवार्षीक पिकांकरिता १३ हजार रुपये हेक्टर या प्रमाणे प्रती हेक्टर या प्रमाणे दोन हेक्टर या मर्यादित वाटप करण्यात येणार आहे. या मदतीमधून बँकेने शेतकऱ्यांची कर्जकपात व अन्य कुठलीही कपात करु नये असे निर्देश आहे. २००७ मधील घरांच्या नुकसानीसाठी  साडेसात कोटी मंजूर जिल्ह्यात २००७ मध्ये अतिवृष्टी व पूर नुकसान झालेल्या ४३ गावामधील ४ हजार १२२ घरांच्या बांधकामास लाभार्थी घर बांधणार या तत्वावर शासनाने मान्यता दिली. यासाठी शासनाने १० कोट ६६ लाख ९० हजार इतका निधी मंजूर केला व यापैकी ७० टक्के म्हणजे ७ कोटी ४६ लाख ८३ हजार इतका निधी शासनाने जिल्ह्याला वितरित केला आहे.हा निधि ३१ मार्च २०१६ पर्यंत बाधितांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.