शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
3
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
4
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
5
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
6
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
7
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
8
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
9
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
10
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
11
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
12
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!
13
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
14
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
15
स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली 'ही' तीन ध्येय साध्य केली तर आपला पराभव होऊच शकणार नाही!
16
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
18
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
19
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले

पहिली प्रवेशासाठी आता सहा वर्षांची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:04 IST

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीत प्रवेश द्यावा, असा आदेश राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे आता ६ वर्षांच्या आतील बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार नाही. याची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी सुरू केली आहे.

ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाचे आदेश : प्राथमिक शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीत प्रवेश द्यावा, असा आदेश राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे आता ६ वर्षांच्या आतील बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार नाही. याची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी सुरू केली आहे.सध्या शहर आणि ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या संख्येने सुरू झाल्या आहेत. अशा शाळांमध्ये मुलांना प्ले-ग्रुपपासून प्रवेश दिला जातो. आपल्या मुलांना शाळेत बसण्याची सवय लागावी, यासाठी पालक अडीच - तीन वर्षे झाल्यानंतर प्ले ग्रुपला दाखल करतात. सध्याच्या स्थितीत पहिली पूर्वशिक्षण देणाऱ्या शाळांना परवानगी घेण्याची सक्ती नसल्यामुळे त्यावर शिक्षण विभागाचेही नियंत्रण नसल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्ले ग्रुप ज्युनियर 'केजी' आणि सिनियर 'केजी'चे शिक्षण देणाºया शाळांची संस्थांचालकांनी दुकानदारी थाटली आहे.सन २०१६-१७ साठी पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान वय ३ वर्षांहून अधिक व पहिलीसाठी ५ वर्षे पूर्ण असावे, असे ठरविण्यात आले होते. याचबरोबर पहिलीच्या प्रवेशासाठी पाल्यांचे वय सन २०१७-१८ मध्ये ५ वर्षे ४ महिने पूर्ण असण्याची अट घातली होती. मात्र, मुलांच्या क्षमतेपेक्षा अधिक अभ्यासक्रम ठरत असल्याने त्यात सन २०१८-१९ मध्ये पुन्हा वयाची अट घालण्यात आली. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान ५ वर्षे ८ महिने निश्चित करण्यात आले होते. परंतु यातही दप्तरांचे ओझे पाहता सन २०१९-२० पासून पहिलीच्या प्रवेशासाठी किमान ६ वर्षे वयाची अट नव्या आदेशानुसार घातली आहे. यापुढे प्रवेश देताना सर्व शाळांनी ३० सप्टेंबरची दिनांक गृहित धरून मुलांचे वय निश्चित करावयाचे आहे, असे आदेशात म्हटले आहे. या अटीनुसार आरटीईच्या प्रवेशासाठी वेबसाइटवरही वयोगट अपलोड केला आहे. त्यामुळे आरटीईसाठी सहापेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा अर्ज अपलोड होत नाही.प्रत्येक बालक शाळेत जाणे आवश्यकराज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ११ जून २०१० रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सहा वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही बालकास मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे सहा वर्षे पूर्ण झालेले प्रत्येक बालक शाळेत जाणे आवश्यक आहे, असे सूत्रांनी कळविले आहे.