शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

पहिली प्रवेशासाठी आता सहा वर्षांची अट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 23:04 IST

मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीत प्रवेश द्यावा, असा आदेश राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे आता ६ वर्षांच्या आतील बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार नाही. याची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी सुरू केली आहे.

ठळक मुद्देशालेय शिक्षण विभागाचे आदेश : प्राथमिक शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार बालकाचे वय सहा वर्षे पूर्ण झाल्यानंतरच इयत्ता पहिलीत प्रवेश द्यावा, असा आदेश राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. त्यामुळे आता ६ वर्षांच्या आतील बालकांना इयत्ता पहिलीत प्रवेश देता येणार नाही. याची अंमलबजावणी जिल्ह्यातील प्राथमिक शाळांनी सुरू केली आहे.सध्या शहर आणि ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या संख्येने सुरू झाल्या आहेत. अशा शाळांमध्ये मुलांना प्ले-ग्रुपपासून प्रवेश दिला जातो. आपल्या मुलांना शाळेत बसण्याची सवय लागावी, यासाठी पालक अडीच - तीन वर्षे झाल्यानंतर प्ले ग्रुपला दाखल करतात. सध्याच्या स्थितीत पहिली पूर्वशिक्षण देणाऱ्या शाळांना परवानगी घेण्याची सक्ती नसल्यामुळे त्यावर शिक्षण विभागाचेही नियंत्रण नसल्याचे अधोरेखित झाले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी प्ले ग्रुप ज्युनियर 'केजी' आणि सिनियर 'केजी'चे शिक्षण देणाºया शाळांची संस्थांचालकांनी दुकानदारी थाटली आहे.सन २०१६-१७ साठी पूर्व प्राथमिक प्रवेशासाठी किमान वय ३ वर्षांहून अधिक व पहिलीसाठी ५ वर्षे पूर्ण असावे, असे ठरविण्यात आले होते. याचबरोबर पहिलीच्या प्रवेशासाठी पाल्यांचे वय सन २०१७-१८ मध्ये ५ वर्षे ४ महिने पूर्ण असण्याची अट घातली होती. मात्र, मुलांच्या क्षमतेपेक्षा अधिक अभ्यासक्रम ठरत असल्याने त्यात सन २०१८-१९ मध्ये पुन्हा वयाची अट घालण्यात आली. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी किमान ५ वर्षे ८ महिने निश्चित करण्यात आले होते. परंतु यातही दप्तरांचे ओझे पाहता सन २०१९-२० पासून पहिलीच्या प्रवेशासाठी किमान ६ वर्षे वयाची अट नव्या आदेशानुसार घातली आहे. यापुढे प्रवेश देताना सर्व शाळांनी ३० सप्टेंबरची दिनांक गृहित धरून मुलांचे वय निश्चित करावयाचे आहे, असे आदेशात म्हटले आहे. या अटीनुसार आरटीईच्या प्रवेशासाठी वेबसाइटवरही वयोगट अपलोड केला आहे. त्यामुळे आरटीईसाठी सहापेक्षा कमी वय असलेल्या मुलांचा अर्ज अपलोड होत नाही.प्रत्येक बालक शाळेत जाणे आवश्यकराज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ११ जून २०१० रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार सहा वर्षे पूर्ण झालेल्या कोणत्याही बालकास मोफत आणि सक्तीच्या प्राथमिक शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही. त्यामुळे सहा वर्षे पूर्ण झालेले प्रत्येक बालक शाळेत जाणे आवश्यक आहे, असे सूत्रांनी कळविले आहे.