शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

अंजनगाव बारीसह सहा गावे जलमय होण्यापासून वाचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:18 IST

अमरावती : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने भिवापूर तलावाच्या पाण्यात अंजनगाव बारीसह सहा गावे जलमय होण्यापासून वाचली. वेळीच उपयाययोजना करण्यात ...

अमरावती : गत आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने भिवापूर तलावाच्या पाण्यात अंजनगाव बारीसह सहा गावे जलमय होण्यापासून वाचली. वेळीच उपयाययोजना करण्यात आल्याने मोठी हानी टळली. परिणामी अंजनगाव बारी ग्रामपंचायतने विशेष ठराव करून आमदार रवि राणा व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे कौतुक करीत आभार मानले.

जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, पंचायत समिती सदस्य मीनल डकरे यांच्या नेतृत्वात सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन पवनीत कौर यांचा सत्कार केला, हे विशेष. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार रवि राणा यांनी रात्री स्वतः भिवापूर तलाव परिसरात जाऊन प्रशासनाला तलाव फुटण्याच्या धोक्याबद्दल अवगत केले. तात्काळ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी संपर्क साधला. जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनीसुद्धा प्रसंगाचे गांभीर्य ओळखून समयसूचकता दाखवित संपूर्ण यंत्रणेला कामाला लावले व तलावाचा बांध मोकळा करून पाण्याला वाट देऊन तलाव फुटण्यापासून व अंजनगाव बारी आणि लगतच्या पार्डी, अऱ्हाड, कुऱ्हाड, उदखेड, भानखेड, गोविंदपूर आदी गावे जलमय होऊन जीवितहानी व नुकसान होण्यापासून वाचविले. यामुळे ग्रामपंचायतने विशेष ठराव करून आमदार रवि राणा व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांचे आभार मानले व भविष्यात अशा घटना घडू नये, यासाठी भिवापूर तलावाला संरक्षक भिंत व बांध बांधण्यासाठी दोन कोटींची मागणी केली.

उपवनसंरक्षक चंद्रसेखरन बाला यांच्यासह युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, जिल्हा परिषद सदस्य दिनेश टेकाम, पंचायत समिती सदस्य मीनल डकरे, अजय घुले, आशिष कावरे, विनोद जायलवाल, सरपंच प्रकाश खंडारे, उपसरपंच जगदीश अंबाडकर, सदस्य उमेश डकरे, अरविंद निंबर्ते, अर्चना टवलारे, प्रणाली तेटू, दीपाली तलवारे, मेघा भुजाडे, सुनील निचत, विजय इंगोले, विजय पोकळे, अशोक कारमोरे, चंद्रकांत खडसे, हर्षल रेवणे, अवि काळे, अजय बोबडे, शुभम उंबरकर आदी उपस्थित होते.