शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

एकाचवेळी नुतनीकरण, भोजनालय सुरुच

By admin | Updated: November 3, 2016 00:15 IST

रेल्वे स्थानकावर एकाचवेळी भोजनालयाचे नूतनीकरण आणि खाद्य पदार्थाची विक्री सुरु ठेवणे ही बाब रेल्वे नियमात बसत नसल्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहे.

बडनेऱ्यातील घटना : अग्निकांडाच्या घटनेबाबत संशय बडनेरा : रेल्वे स्थानकावर एकाचवेळी भोजनालयाचे नूतनीकरण आणि खाद्य पदार्थाची विक्री सुरु ठेवणे ही बाब रेल्वे नियमात बसत नसल्यामुळे तर्कवितर्क लावले जात आहे. ही आग शॉर्ट सर्किट किंवा इतर कारणांमुळे लागली की लावली? यादिशेने तपास केल्यास अनेक बाबीचा उलगडा होईल, अशी चर्चा जोर धरु लागली आहे.बडनेरा रेल्वे स्थानकावर दिवाळीच्या दिवशी आर. आर. नामक भोजनालयास आग लागली. आगीने रौद्र रुप घेतले असते तर मोठी दुर्घटना घडली असती. रेल्वे प्रशासनाने नुकतेच वृंदावन रेस्टारेंट, हैद्राबाद यांना रेल्वे स्थानकावरील भोजनालयाचे कंत्राट दिले आहे. या भोजनालयाच्या नूतनीकरणाचे कामकाज सद्या सुरु आहे. दरम्यान भोजनालयात खाद्य पदार्थ, जेवन, फराळ आदी साहित्य तयार करणे व त्यांची विक्री करण्याचे देखील सुुरु आहे. एकाच वेळेस नूतनीकरण व व्यवसाय करणे नियमाला धरुन आहे का? हे रेलवे प्रशासनाला तपासावे लागेल. ज्या भोजनालयात आग लागली, त्यामध्ये नव्याने वीज केबल टाकण्याचे काम सुरु आहे. ज्या भोजनालयात आग लागली, तेथे ५ ते ६ गॅस सिलिंडर होते. एवढे सिलिंडर कशासाठी ठेवण्यात आले होते. ते भरले होते की रिकामे याकडे देखील लक्ष द्यावे लागणार आहे. जर सिलिंडरचा स्फोट झाला असता तर रेल्वेस्थानकाला मोठा धोका पोहचला असता हे वास्तव आहे. रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रेल्वे प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देते काय? हा सवाल देखील या आगीच्या निमित्ताने समोर आला आहे. या घटनेनंतर बडनेरा रेल्वे स्थानकावरील प्रवासी, नागरिक, रेल्वे कर्मचारी खरेच सुरक्षित आहे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भोजनालयात यापूर्वी देखील दोनदा आग लागल्याचे बोलल्या जात आहे. आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.चौकशी समिती गठित रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बडनेऱ्याच्या रेल्वे स्थानकावरील भोजनालयातील आगीच्या घटनेला गांभीर्याने घेतले आहे. चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. सिनियर डीसीएम सुनील मिश्रा हे स्वत: येथे आले होते. ही चौकशी समिती अहवाल रेल्वेच्या महाप्रबंधकांना पाठविणार आहे. त्यानंतरच आगीचे नेमके कारण समोर येणार आहे. आगीने रौद्ररुप घेतले असते तर मोठी दुर्घटना रेल्वे स्थानकावर घडली असती. याचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठ अधिकारी याकडे लक्ष देवून आहेत.