शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
3
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
4
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
5
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
6
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
7
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
8
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
9
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
10
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
11
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
12
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
13
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
14
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
15
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
16
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती
17
दहीहंडी उत्सवात '१९१६' नंबरचे टी-शर्ट घालून १ हजार स्वयंसेवक तैनात करा- आशिष शेलार
18
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
19
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा

अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकांवर सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

कोरोना संसर्गाचा परिणाम, राज्यातील २१ जोडी रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

कोरोना संसर्गाचा परिणाम, राज्यातील २१ जोडी रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द

अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १५ मेपर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे रेल्वेत गर्दी ओसरली असून, रेल्वे बाेर्डाने राज्यातील तब्बल २१ जोडी रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आता अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकावर कमालीचा सन्नाटा निर्माण झाला आहे. दिवसातून दोन, तीन गाड्यांचेच अवागमन सुरू असल्याचे चित्र आहे.

रेल्वे बोर्डाने १० मेपासून राज्यातील महत्त्वाच्या २१ जाेडी रेल्वे गाड्या रद्द केल्यामुळे नागपूर-भुसावळ मार्गावरील प्रवाशांना याचा फटका बसला आहे. अचानक ३० जूनपर्यंत गाड्या रद्द झाल्यामुळे आरक्षण तिकीट रिफंड मिळविण्यासाठी गर्दी वाढली आहे. अमरावती रेल्वेस्थानकाहून आजमितीला एकही गाडी धावत नसल्याने प्लॅटफार्मवर सर्वत्र शुकशुकाटाचे चित्र अनुभवता येत आहे. एरव्ही प्रवाशांच्या गर्दीने गजबजणाऱ्या येथील मॉडेल रेल्वेस्थानकावर कर्मचारी, सुरक्षा रक्षकांशिवाय कोणीही दिसून येत नाही. अशातच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ९ ते १५ मेदरम्यान कठोर संचारबंदी लागू केली. त्याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर झाला आहे. अनेकांनी बाहेरगावी जाण्यासाठी काढलेले आरक्षण तिकीट परत करण्यासाठी रेल्वे खिडक्यांवर पैसे मिळविण्यासाठी गर्दी करीत आहेत. अमरावती-मुंबई, अमरावती-तिरुपती, अमरावती-सुरत या गाड्या बंद आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकाहून हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेस या गाड्या सुरू आहेत. अमरावती रेल्वेस्थानकाहून आरक्षण तिकिटाची रक्कम परत मिळण्यासाठी दर दिवशी एक ते सव्वा लाख रुपये परत करण्यात येत आहे.

-------------------

गत १५ दिवसांपासून रेल्वेस्थानकावरील गर्दी ओसरली आहे. आरक्षण रिफंड परत मिळण्यासाठी प्रवासी येतात. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. ३० जूनपर्यंत अशीच स्थिती असणार आहे.

- डी.व्ही. धकाते, निरीक्षक, रेल्वे आरक्षण केंद्र अमरावती.