शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
3
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
4
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
5
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
6
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
7
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
8
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
9
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
10
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
11
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
12
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
13
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
14
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
15
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
16
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
17
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
18
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
19
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार

अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकांवर सन्नाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:13 IST

कोरोना संसर्गाचा परिणाम, राज्यातील २१ जोडी रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य ...

कोरोना संसर्गाचा परिणाम, राज्यातील २१ जोडी रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द

अमरावती : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १५ मेपर्यंत मिनी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे रेल्वेत गर्दी ओसरली असून, रेल्वे बाेर्डाने राज्यातील तब्बल २१ जोडी रेल्वे गाड्या ३० जूनपर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी आता अमरावती, बडनेरा रेल्वेस्थानकावर कमालीचा सन्नाटा निर्माण झाला आहे. दिवसातून दोन, तीन गाड्यांचेच अवागमन सुरू असल्याचे चित्र आहे.

रेल्वे बोर्डाने १० मेपासून राज्यातील महत्त्वाच्या २१ जाेडी रेल्वे गाड्या रद्द केल्यामुळे नागपूर-भुसावळ मार्गावरील प्रवाशांना याचा फटका बसला आहे. अचानक ३० जूनपर्यंत गाड्या रद्द झाल्यामुळे आरक्षण तिकीट रिफंड मिळविण्यासाठी गर्दी वाढली आहे. अमरावती रेल्वेस्थानकाहून आजमितीला एकही गाडी धावत नसल्याने प्लॅटफार्मवर सर्वत्र शुकशुकाटाचे चित्र अनुभवता येत आहे. एरव्ही प्रवाशांच्या गर्दीने गजबजणाऱ्या येथील मॉडेल रेल्वेस्थानकावर कर्मचारी, सुरक्षा रक्षकांशिवाय कोणीही दिसून येत नाही. अशातच जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी ९ ते १५ मेदरम्यान कठोर संचारबंदी लागू केली. त्याचा परिणाम रेल्वे गाड्यांवर झाला आहे. अनेकांनी बाहेरगावी जाण्यासाठी काढलेले आरक्षण तिकीट परत करण्यासाठी रेल्वे खिडक्यांवर पैसे मिळविण्यासाठी गर्दी करीत आहेत. अमरावती-मुंबई, अमरावती-तिरुपती, अमरावती-सुरत या गाड्या बंद आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकाहून हावडा-मुंबई मेल, एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस, अहमदाबाद-चेन्नई नवजीवन एक्स्प्रेस या गाड्या सुरू आहेत. अमरावती रेल्वेस्थानकाहून आरक्षण तिकिटाची रक्कम परत मिळण्यासाठी दर दिवशी एक ते सव्वा लाख रुपये परत करण्यात येत आहे.

-------------------

गत १५ दिवसांपासून रेल्वेस्थानकावरील गर्दी ओसरली आहे. आरक्षण रिफंड परत मिळण्यासाठी प्रवासी येतात. अमरावती-मुंबई एक्स्प्रेस रद्द झाल्याचा मोठा परिणाम जाणवत आहे. ३० जूनपर्यंत अशीच स्थिती असणार आहे.

- डी.व्ही. धकाते, निरीक्षक, रेल्वे आरक्षण केंद्र अमरावती.