शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अत्यल्प कालावधीतील सोयाबीन पीक शेतकऱ्यांना फायद्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:17 IST

विदर्भात जवळपास १५ सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यातही परतीचा पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पडत असल्याने मध्यम कालावधीच्या पिकांसाठी आवश्यक त्या वेळेत ...

विदर्भात जवळपास १५ सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यातही परतीचा पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पडत असल्याने मध्यम कालावधीच्या पिकांसाठी आवश्यक त्या वेळेत पाणी मिळते. तसेच अत्यल्प कालावधीतील (अर्ली व्हेरायटी) पिकांची उत्पादन क्षमता कमी असते. दीर्घ मुदती पिकांच्या तुलनेत ती क्षमता त्याहीपेक्षा कमी राहते. परंतु, ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्याकरिता अर्ली व्हेरायटीचे वाण फायद्याचे ठरू शकतात. पावसाचे दिवस कमी असले तरीही या पिकांचा कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना मालामाल करू शकते.

बॉक्स

जिल्ह्यात वाढला सोयाबीनचा पेरा

वर्ष पेरा हेक्टरमध्ये

२०१७ २९१२००

२०१८ २९१६००

२०१९ २४८४००

२०२० २९४२००

२०२१ २६७०००

झटपट येणारे सोयाबीन

जे एस - २००३४, जे एस ९५-६०जेएस-९३-०५, पीडीकेयू अंबा, एनआरसी १४२, एनआरसी १३८

मध्यम कालावधीत येणारे सोयाबीन

सुवाना सोया, पीडीकेयू येलो, गोल्ड, एमएयूएस-१५८, एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, एनआरसी - ८६

जास्त कालावधीत येणारे सोयाबीन

एमएयूएस-११८८, फुले संगम, फुले किमया, एनआरसी-३७, जेएस-९७-५२ हे वाण उशिरा येणारे आहेत.

---

शेतकरी म्हणतात....

यंदा अर्ली व्हेरायटीचे सोयाबीन पेरले. पिकाची स्थितीसुद्धा उत्तम होती. मात्र, ऐन फुलोरावर असताना पाऊस राहिल्याने अळ्याचा मारा होऊन पूर्ण फुले फस्त केल्याने शेंगाच धरल्या नाही. यंदा सवंगणीचीही संधी मिळणार नसल्याने मोठे नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

- गोपाल सगणे, शेतकरी, सावळापूर

---

यंदा अर्ली व्हेरायटी सोयाबीनच्या पाच बॅग पेरणी केली. शेंगाही बऱ्यापैकी आहेत. मात्र, सध्या सततचा पाऊस पिकासाठी धोकादायक ठरण्याची भीती वाटू लागली आहे. १५ दिवसांची उसंत मिळाल्यास बऱ्यापैकी उत्पादन होण्याची आशा आहे.

- बलदेव चव्हाण,

शेतकरी, मांजरी म्हसला

सोयाबीनचे वाण विविध कालावधीसाठी उपलब्ध आहे. जमिनीचा पोत, सिंचन सुविधा आणि पीक पद्धतीवर वाणाची निवड अवलंबून असते. ऑफ सिझनमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतल्यास ग्रीन मोझॅक व अळ्यांचा प्रादुर्भाव वाढून उत्पादनक्षमता अतिशय घटते. तसेच पुढील हंगामातील पिकांवर रोग येण्याची शक्यता असते.

- डॉ. सतीश निचळ,

सोयाबीन शास्त्रज्ञ, प्रादेशिक संशोधन केंद्र, अमरावती