शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

दुकाने, हॉटेल सुरू झाली; मंदिरे कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:16 IST

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लादलेले बहुतांशी निर्बंध राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून शिथिल केले आहेत. त्यामुळे आता हॉटेल, दुकाने, ...

अमरावती : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लादलेले बहुतांशी निर्बंध राज्य सरकारने १५ ऑगस्टपासून शिथिल केले आहेत. त्यामुळे आता हॉटेल, दुकाने, बार सर्वांनाच रात्री १० वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. बाजारपेठांमध्ये आता गर्दी वाढू लागली आहे. सर्व सुरू असताना केवळ मंदिर बंद का? श्रावण महिना हा व्रत वैकल्यांचा महिना आहे. किमान आता तरी मंदिरे उघडी करा, अशी मागणी भाविकांमधून जोर धरत आहे. कोरोनाचे नियम पाळून मंदिरे, प्रार्थना स्थळे सुरू करणे शक्य नसून शासन यावर कधी निर्णय घेणार, याची प्रतीक्षा सर्वांनाच लागलेली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिल महिन्यापासून राज्य सरकारने राज्यात लॉकडाऊन केले होते. मे, जून पासून हळूहळू त्यात शिथिलता आणण्यास सुरुवात केली. जसा कोरानाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. तसतसे शासनाने नियम आणखी शिथिल केले. १५ ऑगस्टपासून राज्यात रात्री १० वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. मात्र, अद्याप तरी सार्वजनिक कार्यक्रम आणि प्रार्थनास्थळे खुली करण्यास शासनाकडून परवानगी देण्यात आली नाही. श्रावण महिना व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. श्रावणात सण-समारंभाची रेलचेल असते. श्रावण सोमवार व शनिवारी मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी होते. परंतु सलग दुसऱ्या वर्षी कोरोनामुळे भाविकांच्या नित्यनेमात खंड पडला आहे. जिल्ह्यातील सर्व मंदिरे आणि प्रार्थनास्थळे अद्याप बंद आहेत. त्यामुळे भाविकांना बाहेरून दर्शन घ्यावे लागत आहे. मंदिरात केवळ पुजाऱ्यांकडून पूजाअर्चा होत आहे. मात्र, सर्वच कार्यक्रम सध्या तरी ठप्पच आहेत. मंदिरे बंद असल्यामुळे भाविकांमध्ये नाराजीचा सूर आहे. शासनाने आता कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे किमान आतातरी मंदिरे उभी करावीत भाविकांकडून जोर धरत आहे.

बॉक्स

आर्थिक उलाढाल ठप्प

मंदिरांवर अनेकांची आर्थिक गणिते अवलंबून आहेत. फुले, फळे व इतर धार्मिक विधीसाठी साहित्य विकणारी दुकानदार या सर्वांचा व्यवसाय मंदिरावर अवलंबून आहे. मात्र, मंदिर बंद असल्यामुळे त्यांची आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे.