शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

सातेगावात साकारला श्रमदानातून गावतलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2016 00:46 IST

२० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे.

ग्रा.पं.चे सहकार्य : गावकऱ्यांची होणार सोयवनोजा बाग : २० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे. या गावतलावमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोयीचे होणार असून जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. परिसरातील शेतातील विहिरीतील पाण्याची पातळीसुद्धा वाढविण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सातेगावातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या तलावासाठी युवा समाजसेवक महेश खारोडे यांनी सतत २० वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.या जमिनीवर अतिक्रमण केले होते. परंतु अतिक्रमणधारकांनीसुद्धा समजूत काढूून फार मोठा अडथळा दूर करून अधिकारी-शासन, असा कागदपत्रांचा प्रवास सातत्याने करून तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्य क्षितिज अभ्यंकर, मातकर, ईश्वरकर, बाबरेकर यांचे विशेष सहकार्य घेऊन गावतलाव निर्माण करण्याचे ध्येय पूर्णत्वास आले. भविष्यात गावातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर रुप धारण करू शकतो, हेच ध्येय समोर ठेवून सातेगाव येथे २० वर्षांच्या तलावाच्या निर्मितीचा सुखकर प्रवास यशस्वी झाला आहे. तलावाच्या संरक्षण सर्वे करताना गावातील राजकीय विरोधी मंडळींनी अतिक्रमणधारकांनी अडथळा आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही संरक्षणातच तलावाचा सर्वे आराखडा करताना अधिकारी कर्मचाऱ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु गावकऱ्यांच्या व अतिक्रमणधारकांच्या सहकार्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. यासाठी महेश खारोडे यांनी पाणी प्रश्नावर गावात जास्तीत जास्त पाणवठ्याची जलशिवाराची कामे आपल्या भागात कशी जास्त केली जातील, यासाठी अण्णा हजारे, पोपटराव पवार नाम फाऊंडेशन यांच्यासोबतसुद्धा पाण्यावर जास्तीत जास्त काम कसे करता येतील, नदी-नाल्यावर बंधारे, शेततळे, पाणी पश्नावर चर्चा लेख लिहून पाण्यासाठी जास्तीत जास्त काम करत असतात. या कामातूनच आपल्या गावात त्यांनी मोठा गावतलाव निर्मितीचा उद्देश साध्य केला आहे. या तलावाच्या कामामुळे सर्व गावकरी, शेतकरी समोरील पाण्याचा संकटापासून भयमुक्त होऊन आनंदी झाले.(वार्ताहर)