शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

सातेगावात साकारला श्रमदानातून गावतलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2016 00:46 IST

२० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे.

ग्रा.पं.चे सहकार्य : गावकऱ्यांची होणार सोयवनोजा बाग : २० वर्षांपासून सातेगाव ग्रामपंचायतीच्या ‘ई-क्लास’ जमिनीवर नागरिकांच्या सहकार्याने गावतलाव साकारत असल्याने याचा नागरिकांना लाभ होणार आहे. या गावतलावमुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी सोयीचे होणार असून जनावरांनासुद्धा पिण्यासाठी पाणी मिळणार आहे. परिसरातील शेतातील विहिरीतील पाण्याची पातळीसुद्धा वाढविण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सातेगावातील शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. या तलावासाठी युवा समाजसेवक महेश खारोडे यांनी सतत २० वर्षांपासून शासनस्तरावर पाठपुरावा केला होता.या जमिनीवर अतिक्रमण केले होते. परंतु अतिक्रमणधारकांनीसुद्धा समजूत काढूून फार मोठा अडथळा दूर करून अधिकारी-शासन, असा कागदपत्रांचा प्रवास सातत्याने करून तहसीलदार, एसडीओ, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी तसेच पंचायत समिती सदस्य क्षितिज अभ्यंकर, मातकर, ईश्वरकर, बाबरेकर यांचे विशेष सहकार्य घेऊन गावतलाव निर्माण करण्याचे ध्येय पूर्णत्वास आले. भविष्यात गावातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर रुप धारण करू शकतो, हेच ध्येय समोर ठेवून सातेगाव येथे २० वर्षांच्या तलावाच्या निर्मितीचा सुखकर प्रवास यशस्वी झाला आहे. तलावाच्या संरक्षण सर्वे करताना गावातील राजकीय विरोधी मंडळींनी अतिक्रमणधारकांनी अडथळा आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. अधिकाऱ्यांना सुद्धा तुम्ही संरक्षणातच तलावाचा सर्वे आराखडा करताना अधिकारी कर्मचाऱ्यांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु गावकऱ्यांच्या व अतिक्रमणधारकांच्या सहकार्यामुळे पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. यासाठी महेश खारोडे यांनी पाणी प्रश्नावर गावात जास्तीत जास्त पाणवठ्याची जलशिवाराची कामे आपल्या भागात कशी जास्त केली जातील, यासाठी अण्णा हजारे, पोपटराव पवार नाम फाऊंडेशन यांच्यासोबतसुद्धा पाण्यावर जास्तीत जास्त काम कसे करता येतील, नदी-नाल्यावर बंधारे, शेततळे, पाणी पश्नावर चर्चा लेख लिहून पाण्यासाठी जास्तीत जास्त काम करत असतात. या कामातूनच आपल्या गावात त्यांनी मोठा गावतलाव निर्मितीचा उद्देश साध्य केला आहे. या तलावाच्या कामामुळे सर्व गावकरी, शेतकरी समोरील पाण्याचा संकटापासून भयमुक्त होऊन आनंदी झाले.(वार्ताहर)