शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

विद्रुपा नदीत केमिकल मिसळल्याने खळबळ

By admin | Updated: July 26, 2014 20:59 IST

मनात्री परिसरात विद्रुपा नदीत मोठय़ा प्रमाणात केमिकल मिसळल्याने परिसरातील पाणी दूषित झाले

मनात्री: तेल्हारा तालुक्यातील मनात्री परिसरात विद्रुपा नदीत मोठय़ा प्रमाणात केमिकल मिसळल्याने परिसरातील पाणी दूषित झाले असून, जनावरे दगावण्याची भीती निर्माण झाली आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी वेळीच उपाययोजना न केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेल्हारा तालुक्यातील मनात्री परिसर हा नदीकाठचा भाग असून, या ठिकाणी अनेक वीटभट्टय़ा आहेत. वीटभट्टय़ांमध्ये वापरण्यासाठी मोठय़ा प्रमाणात केमिकल आणण्यात येते; परंतु बुधवारी अचानक विद्रुपा नदीला पूर आल्याने या परिसरात पाणी शिरले आणि केमिकलचा साठा पाण्यात मिसळला. या प्रकारामुळे परिसरातील पाणी काळे झाले आहे. पाच वर्षाआधी गावात अशाच प्रकारचे केमिकल पुरामध्ये मिसळल्यामुळे गावातील २५ जनावरांचा मृत्यू झाला होता. पुन्हा तीच स्थिती असल्यामुळे पशुपालक धास्तावले आहेत. मनात्री परिसरात वीटभट्टय़ांवर मनमानी पद्धतीने काम चालते. संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने मोठय़ा प्रमाणात केमिकलचा वापर या भट्टय़ांमध्ये होत आहे. या परिसरातील पाणी केमिकलयुक्त झाल्यामुळे जनावरांना धोका निर्माण झाला आहे. ** विद्रुपा नदीमुळे नदीकाठची जमीन वाहून गेली असून, यामध्ये शेतकर्‍यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. सुरेश पोटे नामक शेतकर्‍याचे पाईप व पंप वाहून गेले. महादेव वानखडे या शेतकर्‍याची जमीन खरडून गेली. महागड्या बियाण्यांची पेरणी केली असली तरी पिके वर येण्याची सुतराम शक्यता नाही. पाण्यामुळे मनात्री, पंचगव्हाण, डवला तळेगाव या गावांचा संपर्क तुटला होता. मनात्री गावातील सुनील डायलकर, गजानन वाघोडे, महादेव वानखडे, कैलास वानखडे, सुरेश पोटे, बाळू काळमेघ, श्रीकृष्ण वानखडे, बाळकृष्ण वानखडे, अनिल वानखडे यांचे नुकसान झाले आहे.