शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
2
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
3
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
4
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
5
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
6
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
7
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
8
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
9
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
10
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
11
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
12
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
13
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'
14
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
15
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
16
केस कलर करण्याची हौस बेतली जीवावर; तरुणीसोबत घडलं भयंकर, अवस्था पाहून बसेल धक्का
17
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
18
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
19
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा

बनावट बियाणे, खतांची खुलेआम विक्री

By admin | Updated: June 28, 2014 00:21 IST

जिल्ह्यात बनावट बीटी बियाणे व रासायनिक खते सर्रास विकली जात असल्याच्या घटना दररोज उघडकीस येत आहेत.

अमरावती : जिल्ह्यात बनावट बीटी बियाणे व रासायनिक खते सर्रास विकली जात असल्याच्या घटना दररोज उघडकीस येत आहेत. विभागात १५ दिवसांत दोन कोटींची बनावट बियाणे व खते जप्ती व कारवाई करण्यात आली आहे. सोमवार तसेच मंगळवारी आसरा व मूर्तिजापूर (तरोडा) गावात बनावट रासायनिक खतांची १६३ बॅग पकडण्यात आल्या. तक्रारी झाल्याने कृषी विभागाने या कारवाई केल्या. मुळात कृषी विभाग याबाबत गाफील असून भरारी पथकाद्वारा कुठलीही धडाक्याची कारवाई होत नाही. त्यामुळे दररोज लाखो रूपयांनी शेतकऱ्यांची लूट होत आहे.जिल्ह्यात खरिपाच्या सरासरी पेरणी क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्र हे कपाशी व सोयाबीनचे आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी या दोन्ही पिकाच्या पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. बियाण्यांच्या वाढत्या मागणीनुसार किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात परराज्यातून चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर बनावट रासायनिक खते व बियाणे आणण्यात येत आहे. जिल्हा सीमालगतच्या तालुक्यात याची सर्रास विक्री होत आहे. वरूड, मोर्शी, धामणगाव, तिवसा व भातकुली तालुक्यात बोगस बीटी बियाणे विक्री होत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. जागृत शेतकऱ्यांनी कृषी विभागाला अवगत केल्यामुळे या ठिकाणी कारवाया झाल्या. विशेष म्हणजे हा सर्व बनावट माल दुकानात न मिळता अन्य ठिकाणी सापडला आहे. दररोज लाखो रूपयांनी शेतकऱ्यांची फसवणूक होत असताना जिल्ह्याचे १५ भरारी पथक झोपी गेले आहे काय, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बनावट बियाणे व खत कंपन्यांचे एजंट खुलेआम फिरत आहेत. नामांकित कंपनीच्या नावावर सर्रास बनावट मालाची विक्री होत आहे. वेगवेगळे आमिष दाखविले जात आहेत. बियाण्यांची खोटी मार्केटिंग करण्यात येऊन शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक होत आहे. गावाचे सजग पहारी म्हणून ओळखले जाणारे तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक हे अनभिज्ञ आहेत. गावात बोगस कंपनीच्या एजंटद्वारे बनावट खते, बियाण्यांची विक्री होत आहे. हे संबंधित अधिकाऱ्यांना माहीत असू नये यावर शेतकऱ्यांचा विश्वास बसत नाही. शेतकरी कुठल्याही आमिषाला लवकर बळी पडतो. ग्रामपंचायतीच्या गोदामात १०० बॅगा बनावट कंपनीचे खत १५ दिवसांपासून ठेवले जाते. सचिव म्हणतात, ''मला याची कल्पना नाही'', मुळात जबाबदारी कोणाची? कृषी विभागदेखील डोळे बंद करून विश्वास ठेवतो, शासनाच्या या यंत्रणेनेच शेतकऱ्यांचा खेळखंडोबा केला आहे. (प्रतिनिधी)