शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात तीन शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST

अमरावती : सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)ने आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा ...

अमरावती : सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)ने आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील तीन शाळांची निवड केली आहे.

राज्याच्या ग्रामीण व आदिवासी भागातील अतिमागास गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा निर्मितीच्या परिपत्रकानुसार राज्यातील ३०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. शासनाच्या या उपक्रमाला पूरक उपक्रम म्हणून सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत जिल्ह्यातील किमान २ व कमाल ३ जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे धोरण व्हीएसटीएफने स्वीकारले आहे. या अंतर्गत पुढील एक वर्षात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जामली आर, धारणीमधील बेरदाबर्डा व चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी या शाळेत भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठकीतील चर्चेनुसार बीडीओ व गटशिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार व्हीएसटीएफच्या पाच तालुक्यांतील झेडपीच्या प्राथमिक शाळांचे पटसंख्येवर आधारित निकषानुसार पात्र शाळांची तपासणी करून याचा अहवाल १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर केला होता. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या अहवाल, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रस्तावानुसार तसेच जिल्हा अभियान परिषदव्दारा पात्र शाळांची निवड करण्यात आली आहे. यात जामली आर, बेरदाबर्डा, विश्राेळी या शाळांचा समावेश आहे.

बॉक्स

जिल्हाधिकारी, सीईओकडून शिक्कामोर्तब

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत व्हीएसटीएफच्या गावातील आदर्श शाळेसाठी पात्र ठरलेल्या वरील तीनही शाळांच्या निवडीवर अभियानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अभियान परिषदेचे उपाध्यक्ष तथा झेडपी मुख्यकार्यकारी अधिकारी अविशांत पांडा आदींनी शिक्कामोर्तब केले.