शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानात तीन शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:13 IST

अमरावती : सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)ने आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा ...

अमरावती : सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण विकास अभियानांतर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान (व्हीएसटीएफ)ने आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील तीन शाळांची निवड केली आहे.

राज्याच्या ग्रामीण व आदिवासी भागातील अतिमागास गावांना स्वयंपूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाची अंमलबजावणी राज्यभरात सुरू झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदर्श शाळा निर्मितीच्या परिपत्रकानुसार राज्यातील ३०० शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. शासनाच्या या उपक्रमाला पूरक उपक्रम म्हणून सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत जिल्ह्यातील किमान २ व कमाल ३ जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्याचे धोरण व्हीएसटीएफने स्वीकारले आहे. या अंतर्गत पुढील एक वर्षात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील जामली आर, धारणीमधील बेरदाबर्डा व चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी या शाळेत भौतिक सुविधा व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे उपक्रम सुरू केले जाणार आहेत. यासंदर्भात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या बैठकीतील चर्चेनुसार बीडीओ व गटशिक्षणाधिकारी यांच्या पत्रानुसार व्हीएसटीएफच्या पाच तालुक्यांतील झेडपीच्या प्राथमिक शाळांचे पटसंख्येवर आधारित निकषानुसार पात्र शाळांची तपासणी करून याचा अहवाल १७ फेब्रुवारी २०२१ रोजी सादर केला होता. त्याअनुषंगाने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या अहवाल, बीडीओ, गटशिक्षणाधिकारी यांच्या प्रस्तावानुसार तसेच जिल्हा अभियान परिषदव्दारा पात्र शाळांची निवड करण्यात आली आहे. यात जामली आर, बेरदाबर्डा, विश्राेळी या शाळांचा समावेश आहे.

बॉक्स

जिल्हाधिकारी, सीईओकडून शिक्कामोर्तब

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानांतर्गत व्हीएसटीएफच्या गावातील आदर्श शाळेसाठी पात्र ठरलेल्या वरील तीनही शाळांच्या निवडीवर अभियानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल व जिल्हा अभियान परिषदेचे उपाध्यक्ष तथा झेडपी मुख्यकार्यकारी अधिकारी अविशांत पांडा आदींनी शिक्कामोर्तब केले.