शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

जलयुक्त शिवारसाठी २९४ गावांची निवड

By admin | Updated: January 6, 2016 00:21 IST

शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेपैकी एक असलेली जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत सन २०१६ करिता २९४ गावांची निवड झाली ....

गतवर्षी चार हजार कामे : ४२ कोटींच्या निधीतून होणार कामेअमरावती : शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेपैकी एक असलेली जलयुक्त शिवार अभियानांंतर्गत सन २०१६ करिता २९४ गावांची निवड झाली असून पहिल्या टप्प्यातील विकासकामांकरिता ४२ कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे. गतवर्षी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांकरिता २५३ गावांची निवड करण्यात आली होती. शासनाने या कामांकरिता ११५ कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यापैकी ८६ कोटी रुपये निधी खर्च झाला असून अनेक कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली. विविध विभागाच्या योजनांतून लोकसहभागातून ४ हजार ६०० कामे पूर्ण झाली आहेत. या वर्षाकरिता जलयुक्त शिवार योजनेच्या तालुका समितीच्या वतीने आढावा घेऊन तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांना १५ जानेवारीपर्यंत कामाचे आराखडे जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावे लागणार आहे. तर २६ जानेवारीपासून यावर्षीच्या जलयुक्त शिवार योजनेतील नवीन कामाचा शुभारंभ होणार असून ३० जूनपर्यंत कामे पूर्ण करावयाची आहेत. त्याकरिता गुरुवारपासूनच तालुका पातळीवरील महसूल विभाग, कृषी विभाग व इतर विभागाचेही अधिकारी, कर्मचारी गावमुक्कांनी राहून नागरिकांच्या समस्या व शेततळे, नालाखोलीकरण, गावतलाव व इतर कामाच्या नियोजनासंदर्भात त्यांची मते जाणून घेणार आहेत. ग्रामीण भागात सिंचन व्यवस्था व्हावी व भविष्यात गावपातलीवर पाणीटंचाई निर्माण होऊ नये म्हणून शेततळे, नालाखोलीकरण, सिमेंटनाला, जुने बंधारे पुनर्जिवित करून त्याची दुरुस्ती करणे आदी कामे या योजनेंतर्गत करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)