शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
3
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
4
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
5
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
6
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
7
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
8
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
9
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
10
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
11
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
12
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
13
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
14
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
15
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
16
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
17
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
18
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
19
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
20
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री

बियाणे कंपन्यांचे जाहिरात युद्ध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:10 IST

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेतमाल पिकवायचे. परंतु या पिकाचे उत्पादन अधिक प्रमाणात कसे होईल, यासाठी शेतकरी धावपळ करत असतो. हीच ...

शेतकऱ्यांनी आपल्या शेतात शेतमाल पिकवायचे. परंतु या पिकाचे उत्पादन अधिक प्रमाणात कसे होईल, यासाठी शेतकरी धावपळ करत असतो. हीच शेतकऱ्यांची धावपळ बियाणे कंपनीच्या प्रतिनिधींनी बघून त्यांना आपल्या कंपनीचे बियाणे कसे दर्जेदार आणि विश्वासाचे आहे, हे पटविण्यासाठी ग्रामीण भागात सध्या भित्तीपत्रकाद्वारे दिसत आहे.

सध्या सरकी, सोयाबीन, तूर आदी बियाणे कृषी केंद्रांमध्ये विक्रीकरिता दाखल झाले असले तरी सगळीकडे कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आले आहे. परिणामी शेतकऱ्यांना अतिरिक्त किमती बियाणे विकत घ्यावे लागतील काय? या चिंतेत शेतकरी सापडला आहे.

बियाणे कंपनीतर्फे गावातील प्रत्येक बस स्टॅन्ड असो, पानटपरी असो किंवा गावातील येणारा मुख्य रस्ता असो तेथे बियाण्यांचे मोठे पोस्टर लावून शेतकऱ्यांना आकर्षित करताना दिसत आहे. शेतकऱ्यांसोबतच ग्रामीण भागातील नागरिकसुद्धा त्या बियाण्यांच्या पोस्टरकडे आकर्षित होत असल्याचे विदारक चित्र धामणगाव तालुक्यात दिसून येत आहे.

कृषी केंद्रचालकांऐवजी बियाणे कंपनीचे सेल्समन शेतकऱ्यांना बियाण्यांची इत्थंभूत माहिती देऊन आकर्षित करत असल्याचे काही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.

बॉक्स

पैशाची जुळजुळवा सुरू

पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतकऱ्यांची पेरणीयोग्य जमीन तयार करण्यासाठी कसरत सुरू झालेली आहे. परंतु बँकेने कर्ज नाकारल्याने काही शेतकरी जुळवाजुळवीसाठी दोरोदारी फिरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे.