शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
3
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
4
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
5
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
6
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
7
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
8
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
9
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
10
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
11
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
12
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
13
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
14
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
15
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
16
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
17
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
18
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
19
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

तब्बल ५० तासांनी संपले सर्च ऑपरेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:18 IST

वरूड : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथील नदीपात्रात आठ जणांचे मृतदेह तब्बल ५० तासांनी शोध व बचाव पथकाला गवसले. मंगळवारी ...

वरूड : तालुक्यातील श्रीक्षेत्र झुंज येथील नदीपात्रात आठ जणांचे मृतदेह तब्बल ५० तासांनी शोध व बचाव पथकाला गवसले. मंगळवारी सकाळी सव्वा अकरा वाजता ते डोंग्यासह बुडाले होते. गुरुवारी पहिला मृतदेह पहाटे साडेपाच वाजता हाती लागला, तर शेवटचा मृतदेह दुपारी ४ वाजता. या कालावधीत जसजसे मृतदेह सापडले, तसतसा तेथे तिष्ठत बसलेल्या नातेवाइकांचा शोक अनावर होत गेला. या मृतांमध्ये नारायण मटरे वगळता सर्व तिशीच्या आत आहेत.

गाडेगाव येथून दशक्रियेसाठी श्रीक्षेत्र झुंज येथे आलेल्या मटरे, खंडाळे, शिवणकर, वाघमारे कुटुंबातील सदस्यांना डोंगीत सफर करण्याचा मोह आवरला नाही आणि त्यातच त्यांचा घात झाला. १३ जणांची नाव डगमगली. दोघेजण पोहत सुखरूप निघाले, तर ११ लोकांना जलसमाधी मिळाली. प्रशासनाने शोध व बचावकार्य सुरू केल्यानंतर अथांग पाण्यातून तीन मृतदेह पहिल्या दिवशी काढण्यात आले. मात्र, आठ जणांचा शोध बुधवारी दिवसभरात लागला नव्हता. गुरुवारी सकाळी साडेपाच वाजता पहिला मृतदेह हाती लागला आणि पाठोपाठ सहा मृतदेह बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले. आठवा मृतदेह सायंकाळी चार वाजता सापडला. मृतदेह पाण्यात छिन्नविच्छिन्न झाल्याने घटनस्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले व त्यांच्या गावी पोहचविण्यात आले. तब्बल ५० तासांनंतर

शोधमोहीम आटोपली. घटनास्थळावर आ. देवेंद्र भुयार, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र बहुरूपी, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, उपविभागीय पोलीस अधिकारी कविता फडतरे, नायब तहसीलदार देवानंद धबाले, बेनोडा ठाणेदार मिलिंद सरकटे, उपनिरीक्षक दिलीप श्रीराव यांच्यासह बेनोडा, वरूड आणि शेंदूरनाघाट पोलिसांसह राज्य राखीव दलाचे पथक तळ ठोकून होते.

------------------

शोधकार्यात सात बोटी

सात बोटीवर आपत्ती व्यवस्थापनाचे ७४ अधिकारी, कर्मचारी शोधकार्य करीत होते. यात एनडीआरएफ नागपूर २२ अधिकरी आणि जवान होते. यात बिपीन बिहारी यांच्या नेतृत्वात २२ जवान सहभागी झाले. एसडीआरएफ, नागपूर येथील समादेशक पंकज डहाने, सहायक समादेशक प्रमोद लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व टीम लीडर राधेश्याम मडावी यांच्या नेतृत्वात २५ जवान होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे शोध व बचाव पथक टीम लीडर दीपक डोरस व देवानंद भुजाडे यांच्या नेतृत्वात शोध घेत होते.