शहरं
Join us  
Trending Stories
1
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
2
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
3
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
4
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
5
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
6
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
7
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
8
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
9
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
10
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
11
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
12
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
13
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
14
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
15
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
16
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
17
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
18
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
19
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
20
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
Daily Top 2Weekly Top 5

आमसभेत ‘समाजकल्याण’वर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

अमरावती : कोरोना संक्रमण, त्या अनुषंगाने लागलेले लॉकडाऊन, संचारबंदी अशा एक ना अनेक कारणांमुळे गतवर्षीचा निधी शिल्लक राहिला. सबब, ...

अमरावती : कोरोना संक्रमण, त्या अनुषंगाने लागलेले लॉकडाऊन, संचारबंदी अशा एक ना अनेक कारणांमुळे गतवर्षीचा निधी शिल्लक राहिला. सबब, लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचू शकला नाही. त्यामुळे अनेक योजनांची ‘रखडगाडी’ झाली. विकासाला चालना देण्यासाठी गतवर्षी मंजूर झालेला लाभ लाभार्थींना नव्याने दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सन २०२०-२१ या वर्षात २० टक्के निधीमधून साहित्य पुरवायचे होते. यातून टिनपत्रे, एचडीपीई पाईप, क्रीडागंण, ग्रंथालय, लाऊडस्पीकर, पंपसेट, पाणबुडी, पिको फॉल-शिलाई मशीन, मुलामुलींना सायकली देण्यात येणार होत्या. मात्र, कोरोना संसर्गामुळे लाभार्थी वेळेत साहित्य खरेदी केल्याच्या पावत्या सादर करू शकले नाहीत. परिणामी लाभार्थी लाभापासून वंचित राहिले. त्या पार्श्वभूमीवर समाजकल्याण समितीने तरतूद केलेला निधी लाभार्थींना सन २०२१-२२ मध्ये द्यावा, असा प्रस्ताव समाजकल्याण समितीने आमसभेसमोर ठेवला. आमसभेनेही त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.

बॉक्स

सात टक्क्यांतून या कामांचा तिढा सुटला

जिल्हा परिषदेमार्फत १३ वने योजनेअंतर्गत सात टक्के निधीमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी सन २०२०-२१ या वर्षात १ कोटी ४१ लाख ९६ हजार रुपयांची तरतूद केली होती. यापैकी ७६ लाख ३४ हजार २२० रुपये समाजकल्याण विभागाने खर्च केले आहेत; तर अजूनही ६५ लाख ६१ हजार ७८० रुपयांचा निधी अखर्चित आहे. त्यामुळे या अखर्चित निधीला सन २०२१-२२ या वर्षात खर्च करण्यास मंजूर मिळण्याबाबतचा ठराव २७ मे रोजीच्या सभेत पारित केला होता. या ठरावालाही आमसभेने एकमताने मंजुरी प्रदान केली आहे. या निर्णयामुळे मेळघाटातील रस्ते, नाली बांधकाम, गावांमध्ये हायमास्ट पथदिवे बसविणे, अंगणवाडी वजनकाटे व वॉटर प्यूरिफायर बसविणे, मेळघाटातील शाळा, अंगणवाडीमध्ये मराठी, कोरकू भाषा शिक्षण उपक्रमावर निधी खर्च केला जाणार असल्याने अखर्चित निधीचा तिढा सुटला आहे.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक़डाऊन लावण्यात आला होता. परिणामी वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थींना साहित्य खरेदीच्या पावत्या सादर करता आल्या नाहीत. परिणामी ते लाभापासून वंचित होते. या लाभार्थींना लाभ देता आला नाही. त्यामुळे समाजकल्याण समितीच्या शिफारशींवरून हा लाभ देण्याचे प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद