शहरं
Join us  
Trending Stories
1
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
2
"राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालू", भाजप प्रवक्त्याचे टीव्हीवरील चर्चेत विधान, काँग्रेसचे अमित शाहांना पत्र
3
नेपाळचे माजी पंतप्रधान ओली यांना काठमांडू सोडण्यास मनाई, पासपोर्ट निलंबित, देखरेखीखाली ठेवले
4
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
5
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
6
या नालायकांबरोबर युती करणार नाही; शिंदेसेनेच्या आमदाराची अजितदादांच्या राष्ट्रवादीवर बोचरी टीका
7
शेअर बाजाराची मजबूत सुरुवात: सेन्सेक्स १३६ अंकांनी वधारला, निफ्टी २४,७०० च्या जवळ; हे स्टॉक्स तेजीत
8
"वडिलांची जागा मी कधीच घेऊ शकत नाही, पण..."; ठाकरेंच्या आमदाराने घेतले श्वेताचे पालकत्व 
9
Tata Capital IPO: गुंतवणूकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक, टाटा कॅपिटलनं सेट केला प्राईज बँड; GMP पण सुस्साट, पाहा डिटेल्स
10
मुंब्रा अपघात काळ्या बॅगेमुळेच! तीन महिन्यांच्या चौकशी अहवालात कारण स्पष्ट
11
कोण आहेत मोहसिन नकवी? जे टीम इंडियाची ट्रॉफी घेऊन पळून गेले; 'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारताविरोधात...
12
तुमची मुलगी म्हणेल Thank You! या ६ बेस्ट स्कीम्स देतील जबरदस्त नफा, ५ नंबरच्या स्कीमनं तर पक्कं होईल तिचं भविष्य सुरक्षित
13
संतापजनक! आधी मारहाण, नंतर शाळेच्या खिडकीला उलटे टांगले; ७ वर्षाच्या मुलावर क्रूरता
14
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
15
सोशल मीडियावरील ती पोस्ट! ...अन् टीम इंडियानं अख्ख्या जगासमोर घेतला पाक मंत्र्याचा बदला
16
IND vs Pak: "अभिषेक बच्चन चांगला खेळलास", भारताने आशिया कप जिंकल्यानंतर बिग बींचा शोएब अख्तरला टोला
17
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
18
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
19
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
20
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान

आमसभेत ‘समाजकल्याण’वर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:09 IST

अमरावती : कोरोना संक्रमण, त्या अनुषंगाने लागलेले लॉकडाऊन, संचारबंदी अशा एक ना अनेक कारणांमुळे गतवर्षीचा निधी शिल्लक राहिला. सबब, ...

अमरावती : कोरोना संक्रमण, त्या अनुषंगाने लागलेले लॉकडाऊन, संचारबंदी अशा एक ना अनेक कारणांमुळे गतवर्षीचा निधी शिल्लक राहिला. सबब, लाभार्थींपर्यंत लाभ पोहोचू शकला नाही. त्यामुळे अनेक योजनांची ‘रखडगाडी’ झाली. विकासाला चालना देण्यासाठी गतवर्षी मंजूर झालेला लाभ लाभार्थींना नव्याने दिला जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला सन २०२०-२१ या वर्षात २० टक्के निधीमधून साहित्य पुरवायचे होते. यातून टिनपत्रे, एचडीपीई पाईप, क्रीडागंण, ग्रंथालय, लाऊडस्पीकर, पंपसेट, पाणबुडी, पिको फॉल-शिलाई मशीन, मुलामुलींना सायकली देण्यात येणार होत्या. मात्र, कोरोना संसर्गामुळे लाभार्थी वेळेत साहित्य खरेदी केल्याच्या पावत्या सादर करू शकले नाहीत. परिणामी लाभार्थी लाभापासून वंचित राहिले. त्या पार्श्वभूमीवर समाजकल्याण समितीने तरतूद केलेला निधी लाभार्थींना सन २०२१-२२ मध्ये द्यावा, असा प्रस्ताव समाजकल्याण समितीने आमसभेसमोर ठेवला. आमसभेनेही त्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले आहे.

बॉक्स

सात टक्क्यांतून या कामांचा तिढा सुटला

जिल्हा परिषदेमार्फत १३ वने योजनेअंतर्गत सात टक्के निधीमधून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी सन २०२०-२१ या वर्षात १ कोटी ४१ लाख ९६ हजार रुपयांची तरतूद केली होती. यापैकी ७६ लाख ३४ हजार २२० रुपये समाजकल्याण विभागाने खर्च केले आहेत; तर अजूनही ६५ लाख ६१ हजार ७८० रुपयांचा निधी अखर्चित आहे. त्यामुळे या अखर्चित निधीला सन २०२१-२२ या वर्षात खर्च करण्यास मंजूर मिळण्याबाबतचा ठराव २७ मे रोजीच्या सभेत पारित केला होता. या ठरावालाही आमसभेने एकमताने मंजुरी प्रदान केली आहे. या निर्णयामुळे मेळघाटातील रस्ते, नाली बांधकाम, गावांमध्ये हायमास्ट पथदिवे बसविणे, अंगणवाडी वजनकाटे व वॉटर प्यूरिफायर बसविणे, मेळघाटातील शाळा, अंगणवाडीमध्ये मराठी, कोरकू भाषा शिक्षण उपक्रमावर निधी खर्च केला जाणार असल्याने अखर्चित निधीचा तिढा सुटला आहे.

कोट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक़डाऊन लावण्यात आला होता. परिणामी वैयक्तिक लाभाच्या योजनेतील लाभार्थींना साहित्य खरेदीच्या पावत्या सादर करता आल्या नाहीत. परिणामी ते लाभापासून वंचित होते. या लाभार्थींना लाभ देता आला नाही. त्यामुळे समाजकल्याण समितीच्या शिफारशींवरून हा लाभ देण्याचे प्रस्तावास मंजुरी दिली आहे.

- बबलू देशमुख, अध्यक्ष, जिल्हा परिषद