शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

By admin | Updated: June 8, 2014 23:34 IST

खरीप हंगाम २0१४-१५ साठी जिल्ह्यात सोयाबीनसाठी सरासरी २,0१,२00 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना किमान ३,७५,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कमीत कमी २ लाख क्विंटल बियाण्यांची

अमरावती : खरीप हंगाम २0१४-१५ साठी जिल्ह्यात सोयाबीनसाठी सरासरी २,0१,२00 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना किमान ३,७५,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कमीत कमी २ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात एकूण गरजेच्या तुलनेत किमान १ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा यंदा जाणवणार आहे. महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडे फक्त २५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याने इतर खाजगी कंपन्या किमान १ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करतील, अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने आतापासून सोयाबीनची चढय़ा भावात विक्री व काळाबाजार सुरू झाला आहे.जिल्ह्यात सोयाबीन बियाणे टंचाईचे सावट असल्याने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी २८ एप्रिल २0१४ रोजी सोयाबीन उत्पादन कंपन्यांची बैठक घेऊन उत्पादित बियाणे जिल्ह्यातच विकण्याचे आदेश या कंपन्यांना दिलेत. १५ ते २0 हजार क्विंटल  बियाणे उपलब्ध होऊ शकेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रत्यक्षात कृषी विभाग मात्र खासगी कंपन्यांकडून किमान एक लाख क्विंटल सोयाबीन, बियाणे उपलब्ध होईल तसेच महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडून ३५ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धी होऊ शकेल या वांझोट्या आशेवर आहे. सोयाबीनचे प्लॉटदेखील उगवणशक्तीच्या परीक्षेत नापास ठरले आहे. खरीपपूर्व आढावा सभेत राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात ७८ हजार किलो बियाण्यांचा तुटवडा असल्याची जाहीर कबुली दिली. प्रत्यक्षात हा तुटवडा यापेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे सोयाबीनची चढय़ा भावात व काळाबाजारात विक्री होत आहे. याला पायबंद घालणे तूर्तास कृषी विभागाचे भरारी पथक सपशेल फेल झाले आहे.जिल्ह्यात १0४८ कृषी निविष्ठा केंद्रधारक आहेत. यासह वितरक व किरकोळ विक्रेत्यांनी एक लाख क्विंटलवर सोयाबीन बियाण्यांची मागणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे नोंदवली. प्रत्यक्षात मागणीच्या २५ टक्के पुरवठा खरिपाच्या तोंडावर झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.