शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

एक लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा

By admin | Updated: June 8, 2014 23:34 IST

खरीप हंगाम २0१४-१५ साठी जिल्ह्यात सोयाबीनसाठी सरासरी २,0१,२00 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना किमान ३,७५,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कमीत कमी २ लाख क्विंटल बियाण्यांची

अमरावती : खरीप हंगाम २0१४-१५ साठी जिल्ह्यात सोयाबीनसाठी सरासरी २,0१,२00 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना किमान ३,७५,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. यासाठी कमीत कमी २ लाख क्विंटल बियाण्यांची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात एकूण गरजेच्या तुलनेत किमान १ लाख क्विंटल सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा यंदा जाणवणार आहे. महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडे फक्त २५ हजार क्विंटल बियाणे उपलब्ध असल्याने इतर खाजगी कंपन्या किमान १ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध करतील, अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने आतापासून सोयाबीनची चढय़ा भावात विक्री व काळाबाजार सुरू झाला आहे.जिल्ह्यात सोयाबीन बियाणे टंचाईचे सावट असल्याने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी २८ एप्रिल २0१४ रोजी सोयाबीन उत्पादन कंपन्यांची बैठक घेऊन उत्पादित बियाणे जिल्ह्यातच विकण्याचे आदेश या कंपन्यांना दिलेत. १५ ते २0 हजार क्विंटल  बियाणे उपलब्ध होऊ शकेल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. प्रत्यक्षात कृषी विभाग मात्र खासगी कंपन्यांकडून किमान एक लाख क्विंटल सोयाबीन, बियाणे उपलब्ध होईल तसेच महाबीज व राष्ट्रीय बीज निगम यांच्याकडून ३५ हजार क्विंटल बियाण्यांची उपलब्धी होऊ शकेल या वांझोट्या आशेवर आहे. सोयाबीनचे प्लॉटदेखील उगवणशक्तीच्या परीक्षेत नापास ठरले आहे. खरीपपूर्व आढावा सभेत राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात ७८ हजार किलो बियाण्यांचा तुटवडा असल्याची जाहीर कबुली दिली. प्रत्यक्षात हा तुटवडा यापेक्षा अधिक राहणार आहे. त्यामुळे सोयाबीनची चढय़ा भावात व काळाबाजारात विक्री होत आहे. याला पायबंद घालणे तूर्तास कृषी विभागाचे भरारी पथक सपशेल फेल झाले आहे.जिल्ह्यात १0४८ कृषी निविष्ठा केंद्रधारक आहेत. यासह वितरक व किरकोळ विक्रेत्यांनी एक लाख क्विंटलवर सोयाबीन बियाण्यांची मागणी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाकडे नोंदवली. प्रत्यक्षात मागणीच्या २५ टक्के पुरवठा खरिपाच्या तोंडावर झालेला नाही, ही वस्तुस्थिती आहे.