शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सर्वशिक्षा अभियानाच्या बजेटला ‘हिरवी झेंडी’

By admin | Updated: September 14, 2016 00:18 IST

दरवर्षी लवकरच मंजूर होणारे सर्वशिक्षा अभियानाच्या बजेटला यंदा चक्क सप्टेंबर महिना उजाडला.

निर्णय : प्रस्ताव ८४ कोटींचा, मंजुरी ४१ कोटींचीजितेंद्र दखने अमरावतीदरवर्षी लवकरच मंजूर होणारे सर्वशिक्षा अभियानाच्या बजेटला यंदा चक्क सप्टेंबर महिना उजाडला. ८४ कोटी ९० लाख रूपयांच्या प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियान विभागाने एसपीएमपीकडे पाठविला होता. मात्र त्यापैकी ४१ कोटी ०८ लाख ८८ हजार रूपयांचे बजेट मंजूर करण्यात आले. त्यामधून ८ कोटी २५ लाख रूपयांचा निधीसुद्धा प्राप्त झाला आहे. परंतु उर्वरित निधी प्रत्यक्ष किती मिळणार, हे मात्र आताच सांगता येणार नाही.सर्वशिक्षा अभियानाच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमासाठी कोट्यवधींची कामे प्रस्तावीत राहतात. परंतु अनेक प्रस्तावीत कामांसाठी निधी कमी पडत आहे. त्यामुळे शिल्लक निधीवरच समाधान मानण्याची वेळ सर्वशिक्षा अभियानावर आली होती. सर्व शिक्षा अभियानाचे मागील वर्षाचे बजेट सुमारे ७३ कोटी ६८ लाख रूपयांचे होते. यातून ५० टक्केच निधी जिल्ह्याला मिळाला होता. या निधीच्या माध्यमातून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले. काही उपक्रम राबविण्यासाठी निधीच प्राप्त झाला नाही. यंदा म्हणजेच सन २०१६-१७ साठी शिक्षण विभागाने सुमारे ८४ कोटी ९० लाख रूपयांचे बजेट महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे (एसपीएसपी) सादर केले होते. यासाठी वारंवार बैठकी, चर्चा आणि मुंबईवारी करण्याची वेळ सर्वशिक्षा अभियानातील कर्मचाऱ्यांवर आली होती. दरम्यान सप्टेंबर महिना उजाडला असून आता कुठे सुमारे ४१ कोटी ०८ लाख ८८ हजार रूपयांचे बजेट मंजूर केले आहे. या निधीतून विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये विविध प्रकारचे बांधकाम, विशेष प्रशिक्षण, २५ टक्के प्रवेश शिक्षक प्रशिक्षण गणवेश, पाठपुस्तके, हंगामी वसतिगृह, विविध अनुदान, शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण आणि समावेशित शिक्षण, अध्ययन समृद्धी कार्यक्रम नवोपक्रमशील उपक्रम यासारखे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. मात्र मंजूर निधी हा पूर्ण मिळत नसल्याने उपक्रम राबविताना अडचणी येत असल्याची खंतही व्यक्त होत आहे. यासाठी प्रयत्नाची गरज आहे.या बाबी कराव्या लागणार साध्यमहाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडे (एसपीएसपी)यांच्याकडून बजेटला मंजुरी देण्यात आली आहे. ह्या गाईड लाईन सर्वशिक्षा अभियानातून साध्य कराव्या लागणार आहेत. यात प्रामुख्याने मुलांच्या गुणवत्तेत वाढ करणे, शाळा प्रगत करणे, शिक्षकांना गणित विषयात प्रगल्भ करणे, त्याचप्रमाणे स्पोकन इंग़्रजी विषयात प्रगल्भ करणे, शाळेचे स्वमूल्यमापन शाळा समृद्ध करणे आदी उद्धिष्ट अभियानातून करावे लागणार आहेत.सर्वशिक्षा अभियानातून शासनाने ठरवून दिलेले उपक्रम आणि काम केले जाणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे ८ कोटींंचा हप्ता मिळाला होता. यात विद्यार्थ्यांना गणवेश व इतर कामे केली आहेत. उर्वरित निधी प्राप्त होताच प्राधान्यानुसार कामे केली जातील.- एस.एम. पानझाडे, शिक्षणाधिकारी प्राथमिक