शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
3
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
4
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
5
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
6
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
7
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
8
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
9
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
10
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
11
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
12
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
13
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
14
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
15
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
16
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
17
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
18
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
19
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!

सरपंचांना पाहावी लागते ग्रामसवेकांची वाट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:13 IST

अमरावती : जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्षानुवर्षे सत्ता राखून बसलेल्या दिग्गजांचा पराभव करीत अनेक ठिकाणी तरुणांनी ग्रामपंचायतीतील ...

अमरावती : जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्षानुवर्षे सत्ता राखून बसलेल्या दिग्गजांचा पराभव करीत अनेक ठिकाणी तरुणांनी ग्रामपंचायतीतील सत्ता मिळविली. मात्र अनेक गावांमध्ये पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने गावगाडा समजण्यासाठी मोठी कसरत सुरू असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत दिसून येत आहे.

जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, अचलपूर, चांदूर बाजार, मोर्शी, वरूड, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे, अमरावती, भातकुली, या १२ तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने लोकांची कामे करून घेण्यासाठी नवनिर्वाचित सरपंचांची मोठी कसरत होत आहे. एका ग्रामसेवकाकडे दोन-तीन गावांचा कारभार असल्यामुळे नेमका किती वेळ, कोणत्या गावासाठी द्यायचा, याबाबत ग्रामसेवकांचीही डोकेदुखी वाढत चालली आहे. नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून गावकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. पदाधिकाऱ्यांनाही ग्रामविकासाची इच्छा आहे. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. ग्रामसेवक ग्रामीण विकासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र, सध्या ग्रामपंचायतींना पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने लोकांची अनेक कामे रखडली आहेत. त्यामुळे सेवारत गाव सोडून ग्रामसेवकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मार्चअखेर सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोठी धावपळ होताना दिसून येते. अशातच कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, स्थानिक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्येक गावासाठी पूर्णवेळ ग्रामसेवक असावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

बॉक्स

ऑनलाईन कामामुळे ग्रामसेवकांची दमछाक

घरकुल योजना, ग्रामविकास आराखडा, जॉब कार्ड योजना यांसारख्या अनेक योजना ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे ग्रामसेवकांना अनेक कामांचे रेकाॅर्ड ऑनलाइन अपलोड करणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे प्रत्येक कामाच्या ठिकाणी जाताना ग्रामपंचायतदप्तरी कामकाज करताना ग्रामसेवकांची मोठी दमछाक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

बॉक्स

५१० पैकी ७३ पदे रिक्त

जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींसाठी ५१० पदे मंजूर आहेत. त्यापैकी ४३२ पदे भरली असून, ७३ पदे रिक्त आहेत. यामध्ये धारणी व चिखलदरा तालुक्यांचा अपवाद वगळला, तर अमरावती ५,भातकुली ४,नांदगाव खंडेश्वर व चांदूर रेल्वे प्रत्येकी ६,धामणगाव रेल्वे ९, तिवसा ५, मोर्शी ३, वरूड ४, चांदूृर बाजार ५, अचलपूर ७, अंजगाव सुर्जी १०, दर्यापूर ९ या प्रमाणे पदे रिक्त आहेत. तीन हजार लोकसंख्येवरील ११ गावांमध्ये ग्रामविकास अधिकाऱ्यांची पदे भरलेली नाहीत.

कोट

निवडणुकीनंतर लोकांच्या कामांची अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांची कामे योग्य वेळेत होणे गरजेचे आहे. मात्र, पूर्णवेळ ग्रामसेवक नसल्याने या कामात अडचणी निर्माण होत आहेत. गावासाठी पूर्णवेळ ग्रामसेवक दिले असून, नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी भर देता येईल.

- विपिन अनोकार, सरपंच

कोट

ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांची पदे रिक्त असल्यामुळे उपलब्ध ग्रामसेवकांवर व ग्रामविकास अधिकाऱ्यांना अतिरिक्त ग्रामपंचायतींची जबाबदारी आहे. त्यामुळे ग्रामसेवकांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे तीन हजार लोकसंख्येच्या वरील जी गावे आहेत, त्या गावांना ग्रामविकास अधिकारी पदे मंजूर करणे आवश्यक आहे.

- कमलाकर वनवे, जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन