शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून रेड अलर्ट
2
पहलगाम हल्ला अन् ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेची तारीख ठरली; पीएम मोदीही उपस्थित राहणार
3
कल्याण मारहाण प्रकरण: मराठी मुलीला मारणारा परप्रांतीय गोकुळ झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी
4
मुंबई लोकलचा प्रश्न दिल्लीत; काँग्रेस खासदाराने लोकसभेत मांडली जीवघेण्या प्रवासाची व्यथा
5
सुसाट स्पोर्ट्स बाईक दुभाजकावर आदळली, भीषण अपघातात भाजपा मंत्र्याचा पुतण्या मृत्युमुखी
6
नवी मुंबई: तरुणीने प्रेमसंबंध तोडले अन् तो नैराश्यामध्ये गेला, नंतर थेट घरावरच...
7
लोकसंख्येत होतेय सातत्याने घट! 'या' देशात फक्त ९ हजार लोक उरले
8
नाना पाटेकर यांना होता आणखी एक मुलगा, अडीच वर्षांचा असताना झालं निधन
9
'झिरो फिगर'च्या नादात केलं खतरनाक डाएटिंग, मरता मरता वाचली; तरुणीसोबत घडलं भयंकर
10
राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक २०२५ लोकसभेत सादर; आता BCCI वर असेल केंद्राचे नियंत्रण
11
क्रिकेटच्या देवानंतर परदेशात असा सन्मान लाभणारे दुसरे भारतीय क्रिकेटर ठरले फारूख इंजिनीयर
12
'या' कारणामुळे UPI पेमेंट अडकू शकतात! १ ऑगस्टपासून ७ बदल होणार, बघा तुम्हाला काय करावं लागेल!
13
विवाहबाह्य संबंधाच्या प्रकरणात मुंबई, दिल्लीलाही टाकलं मागे, भारतातील 'हे' शहर पहिल्या क्रमांकावर
14
मराठी-हिंदी वादावर राज्यपालांचे विधान, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
15
ट्रम्प यांचं म्हणणं ऐकलं, आता साखरेपासून बनलेलं कोक आणतेय कोका-कोला कंपनी; मग आतापर्यंत काय पीत होते लोक?
16
खळबळजनक! बायकोला परत आणण्यासाठी काकानं दिला पाच वर्षाच्या पुतण्याचा बळी
17
फ्रिजमध्ये पिशव्यांमध्ये भाज्या साठवणं अत्यंत घातक; रोजची साधी सवय ठरू शकते जीवघेणी
18
कशासाठी...! मायक्रोसॉफ्टने १४००० कोटींना मानवी विष्ठा विकत घेतली; लाखो टन CO2 कायमचा संपविणार...
19
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
20
या ५९ देशांत विना व्हिसा प्रवास करू शकतात भारतीय; फिरण्याची आवड असेल तर पाहा Visa Free देशांची यादी

दुष्काळग्रस्त गावांना ‘संजीवनी’

By admin | Updated: November 24, 2015 00:18 IST

कृषी ग्राहकांसाठी प्रस्तावित कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर राज्यात पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना लागू केली आहे.

संस्थांना लाभ : अंमलबजावणीस सुरुवातअमरावती : कृषी ग्राहकांसाठी प्रस्तावित कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर राज्यात पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना लागू केली आहे. ही योजना पहिल्या टप्प्यात लागू केली आहे. राज्यात यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त गावांत ही योजना राबविण्यात येणार आहे. जुलै २०१५पासून अंमलबजावणी सुरू आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाच्या थकबाकीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पाणी पुरवठा योजनांचे वीज कनेक्शन थकबाकी असल्याने कट झाले आहे. तसेच सुरु असलेल्या योजनांचीही थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्यांचे कनेक्शन कट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्यात पडलेला अल्पसा पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता पिण्याचा पाण्याचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. त्यावर मात करण्यासाठी पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना ‘राज्य शासनाने हाती घेतली आहे. या योजनेत स्वच्छेने सहभागी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जून २०१५ अखेर असणाऱ्या वीज बिलाच्या मुळ थकबाकी रकमेपैकी ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा दहा सलग समान मासिक हप्त्यात महावितरणकडे भरावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी जुलै २०१५ पासूनची चालू विजेची बिले विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. याशिवाय ८० टक्के पाणीपट्टी वसुली असणे आवश्यक आहे. शहरी भागांमध्ये पाणी चोरीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा ही अनिवार्य नागरी सुविधा असल्याने शासनातर्फे भरण्यात येणारी मुळ थकबाकीची ५० टक्के रक्कम, या योजनेत स्वच्छेने सहभागी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना, त्यांना चौदाव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून संस्थांमार्फत महावितरण कंपनीला अनुदान स्वरुपात देण्यात यावी, अशा सूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने काढलेल्या शासन निर्देशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)