शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

दुष्काळग्रस्त गावांना ‘संजीवनी’

By admin | Updated: November 24, 2015 00:18 IST

कृषी ग्राहकांसाठी प्रस्तावित कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर राज्यात पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना लागू केली आहे.

संस्थांना लाभ : अंमलबजावणीस सुरुवातअमरावती : कृषी ग्राहकांसाठी प्रस्तावित कृषी संजीवनी योजनेच्या धर्तीवर राज्यात पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना लागू केली आहे. ही योजना पहिल्या टप्प्यात लागू केली आहे. राज्यात यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या दुष्काळग्रस्त गावांत ही योजना राबविण्यात येणार आहे. जुलै २०१५पासून अंमलबजावणी सुरू आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणाऱ्या पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिलाच्या थकबाकीत वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा सुरळीत चालू ठेवण्यासाठी ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. राज्यात बहुतांश ठिकाणी पाणी पुरवठा योजनांचे वीज कनेक्शन थकबाकी असल्याने कट झाले आहे. तसेच सुरु असलेल्या योजनांचीही थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढल्याने त्यांचे कनेक्शन कट होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत राज्यात पडलेला अल्पसा पाऊस, त्यामुळे निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती पाहता पिण्याचा पाण्याचा मुद्दा गंभीर बनत चालला आहे. त्यावर मात करण्यासाठी पेयजल पाणीपुरवठा संजीवनी योजना ‘राज्य शासनाने हाती घेतली आहे. या योजनेत स्वच्छेने सहभागी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था यांनी जून २०१५ अखेर असणाऱ्या वीज बिलाच्या मुळ थकबाकी रकमेपैकी ५० टक्के रक्कम एकरकमी किंवा दहा सलग समान मासिक हप्त्यात महावितरणकडे भरावी. या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी जुलै २०१५ पासूनची चालू विजेची बिले विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. याशिवाय ८० टक्के पाणीपट्टी वसुली असणे आवश्यक आहे. शहरी भागांमध्ये पाणी चोरीचे प्रमाण ५० टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. पाणीपुरवठा ही अनिवार्य नागरी सुविधा असल्याने शासनातर्फे भरण्यात येणारी मुळ थकबाकीची ५० टक्के रक्कम, या योजनेत स्वच्छेने सहभागी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना, त्यांना चौदाव्या वित्त आयोगांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीतून संस्थांमार्फत महावितरण कंपनीला अनुदान स्वरुपात देण्यात यावी, अशा सूचना उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने काढलेल्या शासन निर्देशात म्हटले आहे. (प्रतिनिधी)