शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
5
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
6
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
7
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
8
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
9
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
10
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
11
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
12
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
13
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
14
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
15
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
16
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
17
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
18
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
19
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
20
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...

संत बसवेश्वर यांचे विचार प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:11 IST

मोर्शी : विचारांतून क्रांती घडत असते. समाजाला जोडण्याचे काम तसेच स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता हे सर्व महामानवांच्या विचारातून ...

मोर्शी : विचारांतून क्रांती घडत असते. समाजाला जोडण्याचे काम तसेच स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता हे सर्व महामानवांच्या विचारातून होत असते. सामाजिक परिवर्तनासाठी बसवेश्वर यांचे विचार महत्त्वाचे आहेत. ज्या समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी-परंपरा होत्या, त्याच काळात बसवन्ना (बसवेश्वर) घडले. माणसाने प्रगती केली. परंतु, माणुसकी सोडली आहे. बसवन्नांच्या विचाराने माणसांना परिवर्तनाची दिशा दाखविली, असे प्रतिपादन लातूर येथील शिक्षक भीमराव पाटील यांनी केले.

कोरोनाकाळात शिक्षक हा नैराश्यात जाऊ नये, त्याच्या विचारांना चालना मिळावी, यासाठी शेंदूरजनाघाट येथील जनता गर्ल्स हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक अतुल पडोळे व जरूड येथील वसंतराव नाईक हायस्कूलच्या शिक्षक सुषमा मानेकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र मराठी अध्यापक आंतरजाल उपक्रम समितीद्वारे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचे अकरावे पुष्प " महात्मा बसवन्नाची सामाजिक क्रांती" या विषयावर भीमराव पाटील यांनी गुंफले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कल्याण कस्तुरे (नांदेड) हे होते. बसवेश्वरांनी समाजात सुधारणा करण्यासाठी स्वतःपासून सुरुवात केली. त्यांनी एकेश्वरवादाचा स्वीकार केला, असे भीमराव पाटील म्हणाले. कार्यक्रमाला अनेक शिक्षक-पालक ऑनलाईन उपस्थित होते. संचालन विजय सरगर (कोल्हापूर), स्वागत नाना डोंगरे (सोलापूर), सोमनाथ मठपती (परभणी) व आभार प्रदर्शन सोनटक्के (अहमदनगर) व वैशाली आडमुठे मॅडम (सांगली) यांनी केले.