शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
3
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
4
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
5
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
6
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
7
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
8
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
9
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
10
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
11
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
12
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
13
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
14
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
15
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
16
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
17
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
18
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
19
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
20
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश

‌ दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर अन् सकाळी १० ते २ शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:13 IST

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर ...

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर जोरदार तयारी सुरु झाली असून, प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना नवी नियमावली पाठविली आहे. यात प्रामुख्याने प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवताना तितकेच अंतर शिक्षकांनासुद्धा बंधनकारक केले आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत शाळा सुरू असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २७ जानेवारीपूर्वी पाचवी ते आठवीपर्यत वर्ग सुरू करण्याबाबत पूर्वतयारी म्हणून शाळा संचालक, मुख्याध्यापकांना गाईडलाईनचे नवे पत्र पाठविले आहे. कोरोना संसर्ग रोखणे अथवा विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक साहित्य, वस्तू खरेदीबाबत सूचना दिल्या आहेत. मुलांना मास्क खरेदी करण्यासाठीसुद्धा आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पाचवी, सहावी, सातवी अथवा आठवीचे वर्ग शिक्षक, शिष्यवृती शिक्षकांना कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. कोराेना चाचणी अहवाल शाळा किंवा मुख्याध्यापकांकडे सादर करावा लागणार आहे. वर्ग किंवा शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. मास्क नसल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. १८ जानेवारी २०२१ शासननिर्णयाचे शाळांना पालन करणे आवश्यक आहे. १५ जून, २४ जून, २२ जुलै, १७ ऑगस्ट, ८ सप्टेबर, २९ ऑक्टोबर व १० नोव्हेंबर २०१९ च्या शासन आदेशाचे शाळांना पालन करणे बंधनकारक केल्याची माहिती प्राथमिकच्या उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सांगितले.

-------------------------

समग्र शिक्षा अभियानातून साहित्य खरेदी

शाळांसाठी आवश्यक असलेले थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, मास्क, साबण खरेदी ही समग्र शिक्षा अभियानातून करावी लागणार आहे. वर्ग खोल्यांचे निर्जतुकीकरणासाठी लागणारे औषध हे ग्रामपंचायती किंवा शाळांना खरेदी करावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.

---------------------

विद्यार्थ्यांची जागा बदलणार नाही

वर्गखोलीत एकदा ज्या जागेवर विद्यार्थी बाकावर बसेल तीच जागा नियमित ठेवली

जाणार आहे. डेस्क किंवा बाकावर झिगझॅग पद्धतीने प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची ताप आणि ऑक्सिजन नोंद ठेवावी लागणार आहे.

-----------------

- मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्यक

- वर्गात इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांचे अध्ययन

- ऑनलाईन शिक्षणातून अन्य विषय शिकविले जातील.

- जास्त संख्येच्या शाळेत ५० टक्के विद्यार्थी आळीपाळीने हजर असतील.

- शाळा किमान तीन तास तर कमाल चार तास भरेल.

- शाळांमध्ये मुले एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

- परिपाठ नाही, गर्दी नाही वही, पेन, साहित्याची देवाणघेवाण नाही.