शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

‌ दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर अन् सकाळी १० ते २ शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:13 IST

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर ...

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर जोरदार तयारी सुरु झाली असून, प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना नवी नियमावली पाठविली आहे. यात प्रामुख्याने प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवताना तितकेच अंतर शिक्षकांनासुद्धा बंधनकारक केले आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत शाळा सुरू असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २७ जानेवारीपूर्वी पाचवी ते आठवीपर्यत वर्ग सुरू करण्याबाबत पूर्वतयारी म्हणून शाळा संचालक, मुख्याध्यापकांना गाईडलाईनचे नवे पत्र पाठविले आहे. कोरोना संसर्ग रोखणे अथवा विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक साहित्य, वस्तू खरेदीबाबत सूचना दिल्या आहेत. मुलांना मास्क खरेदी करण्यासाठीसुद्धा आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पाचवी, सहावी, सातवी अथवा आठवीचे वर्ग शिक्षक, शिष्यवृती शिक्षकांना कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. कोराेना चाचणी अहवाल शाळा किंवा मुख्याध्यापकांकडे सादर करावा लागणार आहे. वर्ग किंवा शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. मास्क नसल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. १८ जानेवारी २०२१ शासननिर्णयाचे शाळांना पालन करणे आवश्यक आहे. १५ जून, २४ जून, २२ जुलै, १७ ऑगस्ट, ८ सप्टेबर, २९ ऑक्टोबर व १० नोव्हेंबर २०१९ च्या शासन आदेशाचे शाळांना पालन करणे बंधनकारक केल्याची माहिती प्राथमिकच्या उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सांगितले.

-------------------------

समग्र शिक्षा अभियानातून साहित्य खरेदी

शाळांसाठी आवश्यक असलेले थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, मास्क, साबण खरेदी ही समग्र शिक्षा अभियानातून करावी लागणार आहे. वर्ग खोल्यांचे निर्जतुकीकरणासाठी लागणारे औषध हे ग्रामपंचायती किंवा शाळांना खरेदी करावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.

---------------------

विद्यार्थ्यांची जागा बदलणार नाही

वर्गखोलीत एकदा ज्या जागेवर विद्यार्थी बाकावर बसेल तीच जागा नियमित ठेवली

जाणार आहे. डेस्क किंवा बाकावर झिगझॅग पद्धतीने प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची ताप आणि ऑक्सिजन नोंद ठेवावी लागणार आहे.

-----------------

- मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्यक

- वर्गात इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांचे अध्ययन

- ऑनलाईन शिक्षणातून अन्य विषय शिकविले जातील.

- जास्त संख्येच्या शाळेत ५० टक्के विद्यार्थी आळीपाळीने हजर असतील.

- शाळा किमान तीन तास तर कमाल चार तास भरेल.

- शाळांमध्ये मुले एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

- परिपाठ नाही, गर्दी नाही वही, पेन, साहित्याची देवाणघेवाण नाही.