शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

‌ दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर अन् सकाळी १० ते २ शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:13 IST

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर ...

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग २७ जानेवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरावर जोरदार तयारी सुरु झाली असून, प्राथमिक शिक्षण विभागाने शाळांना नवी नियमावली पाठविली आहे. यात प्रामुख्याने प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवताना तितकेच अंतर शिक्षकांनासुद्धा बंधनकारक केले आहे. सकाळी १० ते दुपारी २ वाजतापर्यंत शाळा सुरू असणार आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने २७ जानेवारीपूर्वी पाचवी ते आठवीपर्यत वर्ग सुरू करण्याबाबत पूर्वतयारी म्हणून शाळा संचालक, मुख्याध्यापकांना गाईडलाईनचे नवे पत्र पाठविले आहे. कोरोना संसर्ग रोखणे अथवा विद्यार्थ्यांची काळजी घेण्यासाठी आवश्यक साहित्य, वस्तू खरेदीबाबत सूचना दिल्या आहेत. मुलांना मास्क खरेदी करण्यासाठीसुद्धा आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. पाचवी, सहावी, सातवी अथवा आठवीचे वर्ग शिक्षक, शिष्यवृती शिक्षकांना कोरोना टेस्ट करावी लागणार आहे. कोराेना चाचणी अहवाल शाळा किंवा मुख्याध्यापकांकडे सादर करावा लागणार आहे. वर्ग किंवा शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षकांना मास्क वापरणे बंधनकारक असेल. मास्क नसल्यास गंभीर नोंद घेण्यात येईल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. १८ जानेवारी २०२१ शासननिर्णयाचे शाळांना पालन करणे आवश्यक आहे. १५ जून, २४ जून, २२ जुलै, १७ ऑगस्ट, ८ सप्टेबर, २९ ऑक्टोबर व १० नोव्हेंबर २०१९ च्या शासन आदेशाचे शाळांना पालन करणे बंधनकारक केल्याची माहिती प्राथमिकच्या उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी सांगितले.

-------------------------

समग्र शिक्षा अभियानातून साहित्य खरेदी

शाळांसाठी आवश्यक असलेले थर्मल गन, ऑक्सिमीटर, सॅनिटायझर, मास्क, साबण खरेदी ही समग्र शिक्षा अभियानातून करावी लागणार आहे. वर्ग खोल्यांचे निर्जतुकीकरणासाठी लागणारे औषध हे ग्रामपंचायती किंवा शाळांना खरेदी करावे लागेल, असे स्पष्ट केले आहे.

---------------------

विद्यार्थ्यांची जागा बदलणार नाही

वर्गखोलीत एकदा ज्या जागेवर विद्यार्थी बाकावर बसेल तीच जागा नियमित ठेवली

जाणार आहे. डेस्क किंवा बाकावर झिगझॅग पद्धतीने प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटाचे अंतर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांची ताप आणि ऑक्सिजन नोंद ठेवावी लागणार आहे.

-----------------

- मुलांना शाळेत पाठविण्यासाठी पालकांचे संमतिपत्र आवश्यक

- वर्गात इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांचे अध्ययन

- ऑनलाईन शिक्षणातून अन्य विषय शिकविले जातील.

- जास्त संख्येच्या शाळेत ५० टक्के विद्यार्थी आळीपाळीने हजर असतील.

- शाळा किमान तीन तास तर कमाल चार तास भरेल.

- शाळांमध्ये मुले एकत्र येणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल.

- परिपाठ नाही, गर्दी नाही वही, पेन, साहित्याची देवाणघेवाण नाही.