शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

शाळांमध्ये आधार नोंदणीसाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:13 IST

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्याचे आधार नोंदणी अनिवार्य केल्याने शाळांची धावपळ सुरू झाली आहे. सर्व ...

अमरावती : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व विद्यार्थ्याचे आधार नोंदणी अनिवार्य केल्याने शाळांची धावपळ सुरू झाली आहे. सर्व विद्यार्थ्यांकडून शाळांची आधार क्रमांकाची माहिती मागविणे सुरू केले आहे.

शाळांच्या संच मान्यतेकरिता शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांच्या आधार नोंदणी अनिवार्य करणारे परिपत्रक ८ सप्टेंबर रोजी काढले आहे. विद्यार्थ्यांचे आधार नोंदणीकरण न झाल्यास त्यांना पटसंख्येतून वगळून संचमान्यता करण्यात येईल, असेही पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानुसार शाळांनी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी सुरू केली आहे. काही शाळांनी गुगल फोरमच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून ही माहिती संकलित करणे सुरू केले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचे नाव, माता आणि पिता, पालकांचा व्यवसाय, वार्षिक उत्पन्न, मातृभाषा, जात आणि धर्म आरटीईतून झालेले प्रवेश, विद्यार्थ्यांची जन्मतारीख, दिव्यांगांची माहिती इत्यादी मागविली आहे. विद्यार्थ्यांना भविष्यात मिळणाऱ्या सवलती शिष्यवृत्ती तसेच इतर गरजांसाठी आधार क्रमांक आणि इतर माहिती एकत्रित करण्यात येत आहे.