शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधारी-विरोधकांत जुंपले शाब्दिक युद्ध

By admin | Updated: June 7, 2016 07:38 IST

जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या विकासकामे नियोजनाच्या अधिकारावरून सोमवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार ...

जि.प. सर्वसाधारण सभा : नियोजनाच्या अधिकारावरून विरोधकांचा रुद्रावतारअमरावती : जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या विकासकामे नियोजनाच्या अधिकारावरून सोमवारी डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली जुगलबंदी रंगली.जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन समिती, जिल्हा निधी व शासनाकडूनही निधी उपलब्ध करून दिला जातो. या कोट्यवधींच्या निधीतून विकासकामांना मंजुरी मिळण्यासाठी बांधकाम विभागाने सर्वसाधारण सभेत प्रस्ताव मांडला. ही मंजुरी कामांना की रकमेला, असा प्रश्न माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, जि.प.सदस्य अभिजित ढेपे, सुधीर सूर्यवंशी आदींनी उपस्थित केला. अध्यक्षांच्या अधिकाराचे पुरावे द्याअमरावती : यावर प्रशासनाच्यावतीने सीईओ सुनील पाटील यांनी रक्कमेला मंजुरी दिली जाते, असे सभागृहात स्पष्ट केले. मग, नियोजनाचे अधिकार कुणाला, यावरसुध्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी जाब विचारला असता सर्व नियोजनाचे अधिकार सभागृहाने बहुमताने अध्यक्षांना दिल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले. यावेळी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत अध्यक्षांना नियोजनाचे कुठलेही अधिकार नाहीत, असे सांगितले. जर अध्यक्षांना अधिकार असतील तर त्याचा पुरावा द्या, असे फर्मावल्याने सभागृहात गदारोळ झाला. अशातच सत्ताधारी व विरोधी सदस्यांमध्ये चांगलीच जुगलबंदी रंगली. विकासनिधीचे नियोजन व कामांना मंजुरी देण्याचे सर्वस्वी अधिकार जिल्हा परिषद सभागृहाचे आहेत. तशी तरतूद सुध्दा शासनाने केली आहे. मग, सत्ताधारी या आदेशाची पायमल्ली करतातच कशी, यावरून वातावरण तापले. असे प्रकार सभागृहात होत असतील तर ही मनमानी असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र, आतापर्यंत परंपरेनुसार अध्यक्षांनाच नियोजनाचे अधिकार देण्यात आले. मग आता का नाही, असा दावा सत्ताधाऱ्यांनी केला आहे. यावर पीठासीन सभापती तथा अध्यक्ष यांनी रोलिंग द्यावे, अशी मागणी विरोधकांनी केली. यावर काहीच न बोलता तीन महिन्यांतून एकदा होणारी सर्वसाधारण सभा अवघ्या तासाभरात गुंडाळण्यात आली. तत्पूर्वी माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे यांनी त्यांच्या सर्कलला देण्यात आलेल्या सुमारे ३० लाख रूपयांच्या निधीतील विकासाची जी कामे प्रस्तावित केली, त्या कामात सत्ताधाऱ्यांनी परस्पर बदल करून हा निधी दुसऱ्याच कामासाठी वळविला. यावर सुरेखा ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत अध्यक्षांना जाब विचारला. मात्र, यावरही कुठलाच निर्णय देण्यात आला नाही. सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके, उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीश कराळे, वृषाली विघे, अरूणा गोरले, सरिता मकेश्र्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, माजी अध्यक्ष सुरेखा ठाकरे, सुधीर सूर्यवंशी, रवींद्र मुंदे, अभिजित ढेपे, प्रताप अभ्यंकर, महेंद्रसिंग गैलवार, सदाशिव खडके, मनोहर सुने, मोहन सिंगवी, मोहन पाटील, प्रवीण घुईखेडकर, विक्रम ठाकरे, प्रमोद वाकोडे, प्रेमा खलोकार, रंजना उईके, निशांत जाधव, बापूराव गायकवाड, ममता भांबुरकर, मंदा गवई, संगीता सवई, सभापती विनोद टेकाडे. आशिष धर्माळे, सदस्य तसेच सीईओ सुनील पाटील, डेप्युटी सीईओ जे. एन आभाळे, कॅफो चंद्रशेखर खंडारे, कार्यकारी अभियंता अनिल जवंजाळ, डेप्युटी सीईओ कैलास घोडके, कार्यकारी अभियंता के. टी. उमाळकर, शिक्षणाधिकारी एस. एम. पानझाडे, समाजकल्याण अधिकारी भाऊराव चव्हाण, डीएचओ नितीन भालेराव, शिक्षणाधिकारी सी. आर. राठोड, पशुसंवर्धन अधिकारी पुरुषोत्तम सोळंके व खातेप्रमुख उपस्थित होते.प्रहारच्या सदस्यांचा ठिय्याचांदूरबाजार तालुक्यातील घाटलाडकी येथे सोमवारी झालेल्या विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात स्थानिक जिल्हा परिषद सदस्य व सरपंचांना विश्वासात न घेतल्याच्या कारणावरून प्रहारच्या सदस्य कविता दामेधर, प्रमोद वाकोडे, सभापती अर्चना अवसरमोल आदींनी अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या डायससमोर ठिय्या दिला. मात्र, सदर कार्यक्रमाला सदस्यांना निमंत्रण देण्यात आले. पत्रिकेतसुध्दा नाव आहे, असे अध्यक्ष उईके यांनी सभेत सांगितले. अग्निकांडातील शहिदांना श्रद्धांजली जिल्हा परिषदेच्यावतीने सोमवारी सर्वधारण सभेत पुलगाव येथील शहिदांना श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव सदस्य रंजना उईके यांनी मांडला. यानुसार जिल्हा परिषद सभागृहाच्यावतीने पुलगाव अग्निकांडातील शहीद अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.जि.प.मधील नियोजनाचे सर्व अधिकार अध्यक्षांनाच देण्यात आले आहे. ज्यांचा याला विरोध आहे त्यांनी विरोध नोंदवावा. चार-पाच विरोधी सदस्यांची ओरड निरर्थक आहे.- बबलू देशमुख,काँग्रेस गटनेता, जिल्हा परिषदविरोधकांनी कारण नसताना सभेत गोंधळ घातला. या वर्तणुकीचा आम्ही निषेध करतो. यापूर्वी सत्ता असताना काय केले याचे आत्मपरीक्षण आधी करावे. नंतरच सत्ताधाऱ्यांवर आरोप करावेत. - मोहन सिंघवी,जिल्हा परिषद सदस्यनियोजनाचे अधिकार अध्यक्षांना देण्याची पद्धत जुनीच आहे. मात्र, निवडणूक जवळ येत असताना चर्चा न होता सभा गुंडाळणे ही खेदजनक बाब आहे.- प्रताप अभ्यंकर, जिल्हा परिषद सदस्यअध्यक्षांना नियोजनाचे अधिकार नाहीत. सामोपचाराने जर सभागृहात निर्णय होत असतील तर ठिक आहे. परंतु सत्तेचा दुरूउपयोग करून अन्याय केल्यास सहन केले जाणार नाही.- सुरेखा ठाकरे, माजी अध्यक्ष जिल्हा परिषद