शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

रोही, रान डुक्कर, हरणाच्या कळपांचा पिकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

फोटो पी २१ जावरे पान १ लोकमत विशेष नरेंद्र जावरे परतवाडा : जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे ...

फोटो पी २१ जावरे

पान १

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे

परतवाडा : जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे पेरणी खोळंबली होती. ज्यांनी पेरणी केली त्यांना आभाळाकडे पाहण्याची वेळ आली. पाऊस आला, पेरलेले उगवले तर आता रोही, हरिण, रानडुकरांनी कळपाने पिकावर हल्ला केला. रात्रीतून पेरणी केलेले सोयाबीन, तूर व इतर पीक वन्यप्राणी फस्त करीत आहेत. डोळ्यादेखत कोवळ्या पिकांवर हल्ला होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. यासदर्भात परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तांबसवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे.

चांदूरबाजार तालुक्यातील तांबसवाडी, तळणी, राजना पूर्णा परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस मांडला आहे. रात्रीला दोनशेपेक्षा अधिक संख्येने या वन्यप्राण्यांचा कळप पीक फस्त करीत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. यासंदर्भात वनविभागाला तक्रार दिली असून, बंदोबस्ताची मागणी शुभम माहोरे, गोकुल पोहकार, किशोर माहोरे, सुनील महोरे, अजय महोरे, योगेश माहोरेसह शेतकऱ्यांनी केली आहे.

बॉक्स

एकाच फटक्यात दोन, तीन एकरातील पीक शेत फस्त

रात्रीला २०० ते ३०० संख्येने वन्यप्राणी कळपाने शेतात शिरतात. एकाचवेळी दोन ते तीन एकरातील पीक फस्त करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

मारले तर गुन्हा, पीक खांल्ले त्याचे काय?

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वारंवार निवेदन दिले. शेतकऱ्याने रोही, रानडुक्कर, हरणाला मारले तर वनविभाग गुन्हा दाखल करतो. परंतु घाम गाळून व रात्रंदिवस राबराब राबून तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वन्यप्राणी फस्त करीत आहे त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तत्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त

तांबसवाडी व परिसरात शेकडोंच्या संख्येने येणारे रोही परिसरात असलेल्या बघाडी प्रकल्प, व तळणी पूर्णा परिसरातून झुडपी जंगल आहे तेथून शेतात शिरतात दुसरीकडे अचलपूर तालुक्यातील पथ्रोट,टवलार, दर्यापूर व अंजनगाव परिसरात वन्य प्राणी रोही हरिण रानडुकरांचा त्रास असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप बोर्डे यांनी दिली.

बॉक्स

मारण्यावर बंदी, नुकसान भरपाईचा आदेश

या वन्यप्राण्यांना मारण्याची शासनाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांना परवानगी दिली होती. मात्र, वन्यप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे त्यावर स्थगनादेश देण्यात आला आहे. त्यावर उपाय म्हणून शेतीला श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेतून दहा शेतकऱ्यांच्या गटाला दहा टक्के रक्कम तार कुंपणासाठी दिली जाते. झालेल्या नुकसान संदर्भातच वनविभाग काही रक्कम देत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.

कोट

तांबसवाडी राजवाडा परिसरात शेकडो रोहींचे कळप रात्रीला नुकतेच उगवलेले पीक फस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाला त्यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे.

- शुभम माहोरे,

शेतकरी, तांबसवाडी

कोट

दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार आदी तालुक्यातील ग्रामीण भागात रोही, हरिण, रानडुक्कर, काळवीट आदींचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तांबसवाडी परिसरातील तक्रार प्राप्त झाली आहे. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करून योग्य उपाययोजना करण्यात येईल.

- प्रदीप भड,

वनपरिक्षेत्राधिकारी, परतवाडा