शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

रोही, रान डुक्कर, हरणाच्या कळपांचा पिकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

फोटो पी २१ जावरे पान १ लोकमत विशेष नरेंद्र जावरे परतवाडा : जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे ...

फोटो पी २१ जावरे

पान १

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे

परतवाडा : जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे पेरणी खोळंबली होती. ज्यांनी पेरणी केली त्यांना आभाळाकडे पाहण्याची वेळ आली. पाऊस आला, पेरलेले उगवले तर आता रोही, हरिण, रानडुकरांनी कळपाने पिकावर हल्ला केला. रात्रीतून पेरणी केलेले सोयाबीन, तूर व इतर पीक वन्यप्राणी फस्त करीत आहेत. डोळ्यादेखत कोवळ्या पिकांवर हल्ला होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. यासदर्भात परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तांबसवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे.

चांदूरबाजार तालुक्यातील तांबसवाडी, तळणी, राजना पूर्णा परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस मांडला आहे. रात्रीला दोनशेपेक्षा अधिक संख्येने या वन्यप्राण्यांचा कळप पीक फस्त करीत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. यासंदर्भात वनविभागाला तक्रार दिली असून, बंदोबस्ताची मागणी शुभम माहोरे, गोकुल पोहकार, किशोर माहोरे, सुनील महोरे, अजय महोरे, योगेश माहोरेसह शेतकऱ्यांनी केली आहे.

बॉक्स

एकाच फटक्यात दोन, तीन एकरातील पीक शेत फस्त

रात्रीला २०० ते ३०० संख्येने वन्यप्राणी कळपाने शेतात शिरतात. एकाचवेळी दोन ते तीन एकरातील पीक फस्त करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

मारले तर गुन्हा, पीक खांल्ले त्याचे काय?

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वारंवार निवेदन दिले. शेतकऱ्याने रोही, रानडुक्कर, हरणाला मारले तर वनविभाग गुन्हा दाखल करतो. परंतु घाम गाळून व रात्रंदिवस राबराब राबून तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वन्यप्राणी फस्त करीत आहे त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तत्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त

तांबसवाडी व परिसरात शेकडोंच्या संख्येने येणारे रोही परिसरात असलेल्या बघाडी प्रकल्प, व तळणी पूर्णा परिसरातून झुडपी जंगल आहे तेथून शेतात शिरतात दुसरीकडे अचलपूर तालुक्यातील पथ्रोट,टवलार, दर्यापूर व अंजनगाव परिसरात वन्य प्राणी रोही हरिण रानडुकरांचा त्रास असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप बोर्डे यांनी दिली.

बॉक्स

मारण्यावर बंदी, नुकसान भरपाईचा आदेश

या वन्यप्राण्यांना मारण्याची शासनाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांना परवानगी दिली होती. मात्र, वन्यप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे त्यावर स्थगनादेश देण्यात आला आहे. त्यावर उपाय म्हणून शेतीला श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेतून दहा शेतकऱ्यांच्या गटाला दहा टक्के रक्कम तार कुंपणासाठी दिली जाते. झालेल्या नुकसान संदर्भातच वनविभाग काही रक्कम देत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.

कोट

तांबसवाडी राजवाडा परिसरात शेकडो रोहींचे कळप रात्रीला नुकतेच उगवलेले पीक फस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाला त्यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे.

- शुभम माहोरे,

शेतकरी, तांबसवाडी

कोट

दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार आदी तालुक्यातील ग्रामीण भागात रोही, हरिण, रानडुक्कर, काळवीट आदींचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तांबसवाडी परिसरातील तक्रार प्राप्त झाली आहे. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करून योग्य उपाययोजना करण्यात येईल.

- प्रदीप भड,

वनपरिक्षेत्राधिकारी, परतवाडा