शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

रोही, रान डुक्कर, हरणाच्या कळपांचा पिकांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:09 IST

फोटो पी २१ जावरे पान १ लोकमत विशेष नरेंद्र जावरे परतवाडा : जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे ...

फोटो पी २१ जावरे

पान १

लोकमत विशेष

नरेंद्र जावरे

परतवाडा : जिल्ह्याच्या अनेक तालुक्यातील ग्रामीण भागात पावसामुळे पेरणी खोळंबली होती. ज्यांनी पेरणी केली त्यांना आभाळाकडे पाहण्याची वेळ आली. पाऊस आला, पेरलेले उगवले तर आता रोही, हरिण, रानडुकरांनी कळपाने पिकावर हल्ला केला. रात्रीतून पेरणी केलेले सोयाबीन, तूर व इतर पीक वन्यप्राणी फस्त करीत आहेत. डोळ्यादेखत कोवळ्या पिकांवर हल्ला होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. यासदर्भात परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना तांबसवाडी व परिसरातील शेतकऱ्यांनी तक्रार दिली आहे.

चांदूरबाजार तालुक्यातील तांबसवाडी, तळणी, राजना पूर्णा परिसरात वन्यप्राण्यांनी हैदोस मांडला आहे. रात्रीला दोनशेपेक्षा अधिक संख्येने या वन्यप्राण्यांचा कळप पीक फस्त करीत असल्याने बळीराजा धास्तावला आहे. यासंदर्भात वनविभागाला तक्रार दिली असून, बंदोबस्ताची मागणी शुभम माहोरे, गोकुल पोहकार, किशोर माहोरे, सुनील महोरे, अजय महोरे, योगेश माहोरेसह शेतकऱ्यांनी केली आहे.

बॉक्स

एकाच फटक्यात दोन, तीन एकरातील पीक शेत फस्त

रात्रीला २०० ते ३०० संख्येने वन्यप्राणी कळपाने शेतात शिरतात. एकाचवेळी दोन ते तीन एकरातील पीक फस्त करीत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

बॉक्स

मारले तर गुन्हा, पीक खांल्ले त्याचे काय?

वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी परतवाडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात वारंवार निवेदन दिले. शेतकऱ्याने रोही, रानडुक्कर, हरणाला मारले तर वनविभाग गुन्हा दाखल करतो. परंतु घाम गाळून व रात्रंदिवस राबराब राबून तळहाताच्या फोडाप्रमाणे जोपासलेले पीक वन्यप्राणी फस्त करीत आहे त्याचे काय, असा सवाल शेतकऱ्यांनी केला आहे. तत्काळ बंदोबस्त करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.

बॉक्स

जिल्ह्यातील शेतकरी त्रस्त

तांबसवाडी व परिसरात शेकडोंच्या संख्येने येणारे रोही परिसरात असलेल्या बघाडी प्रकल्प, व तळणी पूर्णा परिसरातून झुडपी जंगल आहे तेथून शेतात शिरतात दुसरीकडे अचलपूर तालुक्यातील पथ्रोट,टवलार, दर्यापूर व अंजनगाव परिसरात वन्य प्राणी रोही हरिण रानडुकरांचा त्रास असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप बोर्डे यांनी दिली.

बॉक्स

मारण्यावर बंदी, नुकसान भरपाईचा आदेश

या वन्यप्राण्यांना मारण्याची शासनाने वनपरिक्षेत्र अधिकारी यांना परवानगी दिली होती. मात्र, वन्यप्रेमींनी न्यायालयात याचिका दाखल केल्यामुळे त्यावर स्थगनादेश देण्यात आला आहे. त्यावर उपाय म्हणून शेतीला श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेतून दहा शेतकऱ्यांच्या गटाला दहा टक्के रक्कम तार कुंपणासाठी दिली जाते. झालेल्या नुकसान संदर्भातच वनविभाग काही रक्कम देत असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी सांगितले.

कोट

तांबसवाडी राजवाडा परिसरात शेकडो रोहींचे कळप रात्रीला नुकतेच उगवलेले पीक फस्त करीत आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाला त्यासंदर्भात तक्रार करण्यात आली आहे.

- शुभम माहोरे,

शेतकरी, तांबसवाडी

कोट

दर्यापूर, अंजनगाव, अचलपूर, चांदूरबाजार आदी तालुक्यातील ग्रामीण भागात रोही, हरिण, रानडुक्कर, काळवीट आदींचा शेतकऱ्यांना त्रास होत आहे. तांबसवाडी परिसरातील तक्रार प्राप्त झाली आहे. त्यावर वरिष्ठांशी चर्चा करून योग्य उपाययोजना करण्यात येईल.

- प्रदीप भड,

वनपरिक्षेत्राधिकारी, परतवाडा