शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
5
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
6
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
7
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
8
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
9
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
10
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
11
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
12
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
13
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
14
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
15
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
16
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
17
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
18
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
19
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
20
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम

-अन् बिबट्याच्या तावडीतून रोही बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:18 IST

वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मालेगाव वनक्षेत्रात सोमवारी सकाळी ७.४५ वाजता तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यावर आलेल्या रोहीची शिकार करण्याच्या तयारीत बिबट असताना ते थोडक्यात बजावले. हा संपूर्ण घटनाक्रम ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. या जंगलात वन्यजिवांची संख्या अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देसोमवारी ट्रॅप कॅमेऱ्यात घटना कैद : चिरोडी-पोहरा वनक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढली

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मालेगाव वनक्षेत्रात सोमवारी सकाळी ७.४५ वाजता तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यावर आलेल्या रोहीची शिकार करण्याच्या तयारीत बिबट असताना ते थोडक्यात बजावले. हा संपूर्ण घटनाक्रम ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. या जंगलात वन्यजिवांची संख्या अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.वडाळी-चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत चिरोडी-पोहरा जंगलात वाघांची संख्या नगण्यच. एक पट्टेदार वाघ होता, तोही प्रतिकूल वातावरणामुळे जंगलातून निघून गेला. त्यामुळे आता या वनपरिक्षेत्राचे राजे बिबटच आहे. चिरोडी-पोहरा-माळेगाव-वडाळी या वर्तुळ वनक्षेत्रात गतवर्षी मे महिन्यात १६ बिबटच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर वरूडच्या जंगलात वनकर्मचाºयांचा चक्क बिबटाशी सामना झाल्याने भीतीचे सावट पसरले आहे. या जंगलात बिबट्यांचा वावर व त्यांची संख्या वाढल्याने वनविभाग सतर्क झाला. बिबट्यासाठी हा परिसर नवखा नाही. त्यामुळे या परिसरात बिबट बिनधास्त संचार करीत असून वडाळी, पोहरा व चिरोडी जंगलात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना लागणारे आवश्यक खाद्य, पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याने बिबट या जंगलात रममान झाले आहेत. बिबट अमरावती-चांदूररेल्वे मार्ग ओलांडून जंगलात भ्रमण करीत असल्याने या मार्गावर काही गतिरोधक बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले जाईल, वनाधिकाºयांनी सांगितले. या जंगलात बिबट्यांसह रोही, हरिण, सांबर, चित्तळ, रानडुकरांची संख्या वाढल्याने वन्यजीवांसाठी पोषक वातावरण आहे. चिरोडी, मालेगाव, मार्डा, कारला, सावंगा विठोबा, मालखेड, लालखेड, कस्तुरा, मोगरा, भानखेडा, हातला, बोडणा, इंदला, घातखेडा, पिंपळखुटा, पोहरा, वडाळी या भागात बिबट्यांची संख्या १६ ते १९ च्या जवळपास असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. ही संख्या समृद्ध जंगलाचे प्रतीक मानले जात असल्याने या वनक्षेत्राला राखीव वनक्षेत्रातून बाहेर काढून अभयारण्याचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.