शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

-अन् बिबट्याच्या तावडीतून रोही बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:18 IST

वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मालेगाव वनक्षेत्रात सोमवारी सकाळी ७.४५ वाजता तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यावर आलेल्या रोहीची शिकार करण्याच्या तयारीत बिबट असताना ते थोडक्यात बजावले. हा संपूर्ण घटनाक्रम ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. या जंगलात वन्यजिवांची संख्या अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देसोमवारी ट्रॅप कॅमेऱ्यात घटना कैद : चिरोडी-पोहरा वनक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढली

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मालेगाव वनक्षेत्रात सोमवारी सकाळी ७.४५ वाजता तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यावर आलेल्या रोहीची शिकार करण्याच्या तयारीत बिबट असताना ते थोडक्यात बजावले. हा संपूर्ण घटनाक्रम ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. या जंगलात वन्यजिवांची संख्या अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.वडाळी-चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत चिरोडी-पोहरा जंगलात वाघांची संख्या नगण्यच. एक पट्टेदार वाघ होता, तोही प्रतिकूल वातावरणामुळे जंगलातून निघून गेला. त्यामुळे आता या वनपरिक्षेत्राचे राजे बिबटच आहे. चिरोडी-पोहरा-माळेगाव-वडाळी या वर्तुळ वनक्षेत्रात गतवर्षी मे महिन्यात १६ बिबटच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर वरूडच्या जंगलात वनकर्मचाºयांचा चक्क बिबटाशी सामना झाल्याने भीतीचे सावट पसरले आहे. या जंगलात बिबट्यांचा वावर व त्यांची संख्या वाढल्याने वनविभाग सतर्क झाला. बिबट्यासाठी हा परिसर नवखा नाही. त्यामुळे या परिसरात बिबट बिनधास्त संचार करीत असून वडाळी, पोहरा व चिरोडी जंगलात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना लागणारे आवश्यक खाद्य, पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याने बिबट या जंगलात रममान झाले आहेत. बिबट अमरावती-चांदूररेल्वे मार्ग ओलांडून जंगलात भ्रमण करीत असल्याने या मार्गावर काही गतिरोधक बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले जाईल, वनाधिकाºयांनी सांगितले. या जंगलात बिबट्यांसह रोही, हरिण, सांबर, चित्तळ, रानडुकरांची संख्या वाढल्याने वन्यजीवांसाठी पोषक वातावरण आहे. चिरोडी, मालेगाव, मार्डा, कारला, सावंगा विठोबा, मालखेड, लालखेड, कस्तुरा, मोगरा, भानखेडा, हातला, बोडणा, इंदला, घातखेडा, पिंपळखुटा, पोहरा, वडाळी या भागात बिबट्यांची संख्या १६ ते १९ च्या जवळपास असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. ही संख्या समृद्ध जंगलाचे प्रतीक मानले जात असल्याने या वनक्षेत्राला राखीव वनक्षेत्रातून बाहेर काढून अभयारण्याचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.