शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

-अन् बिबट्याच्या तावडीतून रोही बचावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:18 IST

वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मालेगाव वनक्षेत्रात सोमवारी सकाळी ७.४५ वाजता तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यावर आलेल्या रोहीची शिकार करण्याच्या तयारीत बिबट असताना ते थोडक्यात बजावले. हा संपूर्ण घटनाक्रम ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. या जंगलात वन्यजिवांची संख्या अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.

ठळक मुद्देसोमवारी ट्रॅप कॅमेऱ्यात घटना कैद : चिरोडी-पोहरा वनक्षेत्रात बिबट्यांची संख्या वाढली

अमोल कोहळे।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वडाळी-चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत मालेगाव वनक्षेत्रात सोमवारी सकाळी ७.४५ वाजता तृष्णातृप्तीसाठी पाणवठ्यावर आलेल्या रोहीची शिकार करण्याच्या तयारीत बिबट असताना ते थोडक्यात बजावले. हा संपूर्ण घटनाक्रम ट्रॅप कॅमेºयात कैद झाला. या जंगलात वन्यजिवांची संख्या अधिक असल्याचे आता स्पष्ट होत आहे.वडाळी-चांदूर रेल्वे वन परिक्षेत्रांतर्गत चिरोडी-पोहरा जंगलात वाघांची संख्या नगण्यच. एक पट्टेदार वाघ होता, तोही प्रतिकूल वातावरणामुळे जंगलातून निघून गेला. त्यामुळे आता या वनपरिक्षेत्राचे राजे बिबटच आहे. चिरोडी-पोहरा-माळेगाव-वडाळी या वर्तुळ वनक्षेत्रात गतवर्षी मे महिन्यात १६ बिबटच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या. इतकेच नव्हे तर वरूडच्या जंगलात वनकर्मचाºयांचा चक्क बिबटाशी सामना झाल्याने भीतीचे सावट पसरले आहे. या जंगलात बिबट्यांचा वावर व त्यांची संख्या वाढल्याने वनविभाग सतर्क झाला. बिबट्यासाठी हा परिसर नवखा नाही. त्यामुळे या परिसरात बिबट बिनधास्त संचार करीत असून वडाळी, पोहरा व चिरोडी जंगलात त्यांचे वास्तव्य आहे. त्यांना लागणारे आवश्यक खाद्य, पिण्याच्या पाण्याची सुविधा असल्याने बिबट या जंगलात रममान झाले आहेत. बिबट अमरावती-चांदूररेल्वे मार्ग ओलांडून जंगलात भ्रमण करीत असल्याने या मार्गावर काही गतिरोधक बसविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले जाईल, वनाधिकाºयांनी सांगितले. या जंगलात बिबट्यांसह रोही, हरिण, सांबर, चित्तळ, रानडुकरांची संख्या वाढल्याने वन्यजीवांसाठी पोषक वातावरण आहे. चिरोडी, मालेगाव, मार्डा, कारला, सावंगा विठोबा, मालखेड, लालखेड, कस्तुरा, मोगरा, भानखेडा, हातला, बोडणा, इंदला, घातखेडा, पिंपळखुटा, पोहरा, वडाळी या भागात बिबट्यांची संख्या १६ ते १९ च्या जवळपास असल्याचा वनविभागाचा अंदाज आहे. ही संख्या समृद्ध जंगलाचे प्रतीक मानले जात असल्याने या वनक्षेत्राला राखीव वनक्षेत्रातून बाहेर काढून अभयारण्याचा दर्जा मिळणे गरजेचे आहे.