शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाने गिळले अचलपूरचे रस्ते

By admin | Updated: July 14, 2017 00:41 IST

जुळ्यानगरीची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि अतिक्रमणाने अधिकच अरूंद झालेले रस्ते,

वाहतूक बेशिस्त : जनता त्रस्त, अपघाताचा धोका कायम, वाहतुकीला अडथळासुनील देशपांडे। लोकमत न्यूज नेटवर्कअचलपूर : जुळ्यानगरीची वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या आणि अतिक्रमणाने अधिकच अरूंद झालेले रस्ते, त्यात बेशिस्त वाहतुकीचा कहर यामुळे येथील नागरिक हैराण झाले आहेत. अपघाताची शक्यता वाढली आहे. रस्त्याच्या दुतर्फा झालेले अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवीत असल्याचे चित्र आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत रस्त्यांची रूंदी तेवढीच आहे. बाजारपेठ अधिक गजबजत चालली आहे. याआधीच अरूंद रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी व हातगाड्याधारकांनी अतिक्रमण केल्याने रस्ते अधिकच अरूंद झाले आहेत. मात्र, हे अतिक्रमण हटविण्यात प्रशासन उदासीन असल्याने नागरिकांचे, वाहनधारकांचे हाल होत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. बियाणे खरेदीसाठी ग्रामीण भागातील शेतकरी बाजारपेठेत येत आहेत. शालेय साहित्य खरेदीची लगबगही सुरू आहे. त्यामुळे वर्दळ वाढली असून अतिक्रमण अधिकच डोकेदुखी ठरत आहे. भररस्त्यावर लागत असलेल्या हातगाड्यांमुळे वाहनांना अडसर निर्माण होत आहे. दुकानदारांनी रस्त्यावर माल रचून ठेवल्याने पायी चालणेदेखील कठीण होते. वाहनधारकही बेशिस्त झाले आहेत. नियमांचे उल्लंघन करून वाहने दामटली जात आहेत. रस्त्यांवर किरकोळ अपघात एक दिवसाआड घडतात. येथील वाहतूक शाखेत कार्यरत सात कर्मचारी काही दिवसांपूर्वी परतवाडा पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आल्याने अचलपूर शहरासाठी वाहतूक पोलीस नाहीत. त्यामुळे वाहतुकीला शिस्त लावणार कोण, हा प्रश्नच आहे. परतवाडा बसस्थानक वगळता कोठेही वाहतूक पोलीस नजरेस पडत नाही. त्यामुळे अवैध वाहतुकीला उधाण आले आहे. आॅटोचालकांवर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. वाहतूक व्यवस्था सुधारण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. अतिक्रमण हटविण्याची संपूर्ण तयारी पालिका प्रशासनाने केली आहे. तब्बल १ हजार अतिक्रमणधारकांची नावे यादीत आहेत. एसडीओ, पोलीस व महसूलचा समन्वय झाल्यास अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली जाईल. - सुनीता फिस्के, नगराध्यक्ष