शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे नीच कृत्य! इंडिगोचे विमान वादळात, २२७ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; तरीही नाकारली परवानगी
2
'हुंड्याच्या पैशातून उभारलेली घरंदारं, प्रॉपर्टी पेटवून द्या'; वैष्णवी हगवणे प्रकरणात अभिनेते प्रवीण तरडेंची संतप्त पोस्ट
3
IPL 2025 : शाहरुख खान काटावर पास! GT च्या मध्यफळीतील बाकी सर्व नापास; शेवटी LSG नं मारली बाजी
4
"आई-बाबा, मला माफ करा; अपेक्षा पूर्ण करू शकत नाही", लातुरात विद्यार्थिनीने मृत्यूला कवटाळलं
5
Vaishnavi Hagawane: फरार राजेंद्र हगवणेच्या सख्ख्या भावाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, संशय काय?
6
झारीतील शुक्राचार्यांनी ८ अधिकारी-कर्मचाऱ्यांची केली बेकादेशीर नेमणूक; संजय राठोडांच्या खात्यावर भाजप आमदार जोशींचा आरोप
7
गडचिरोली: ‘माझे आवडते चॅनेल पाहू दिले नाही’ म्हणत घरामागे गेली अन् १० वर्षीय मुलीने संपवलं आयुष्य
8
IPL 2025 : DSP सिराजनं खेळला स्लेजिंगचा डाव; निक्कीनं त्याला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
शालार्थ आयडी घोटाळा: बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी ‘एसआयटी’च्या जाळ्यात; शिक्षण विभागाला मोठा हादरा
10
Vaishnavi Hagawane case: अखेर निलेश चव्हाणविरुद्ध गुन्हा दाखल; बाळाला घ्यायला गेल्यानंतर दिली होती धमकी 
11
Vaishnavi Hagawane: हगवणेंचे मित्र, नातेवाईक पोलिसांच्या रडारवर! सुनील चांदेरे यांच्यासह अनेकांची चौकशी 
12
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
13
आणखी एका हेराला अटक! वाराणसीच्या तुफैलने पाकिस्तानमध्ये भारतातील कोणत्या ठिकाणांची माहिती पाठवली?
14
हगवणे कुटुंबीय हे माझे दूरचे नातेवाईक, वैष्णवीचे मामासासरे IG सुपेकरांनी मांडली बाजू
15
'बाबा, माझी पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोडू नका', निवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाची आत्महत्या
16
Thane: 2.25 कोटींचे ड्रग्ज, तीन पेडलर; तीन महिन्यांपासून फरार महिलेला अखेर बेड्या
17
Kishtwar Encounter: जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण!
18
Vaishnavi Hagawane: 'पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर शशांकचे मामा, त्यांची चौकशी झाली पाहिजे' अंजली दमानियांचे गंभीर आरोप
19
'पाकिस्तानला दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवण्यास सांगा', भारताने तुर्कीला सुनावले
20
मयंतीला फॉलो करणाऱ्या रॉबिन उथप्पाची Live शोमध्ये गंमत; दोघांना बघून गावसकरांना पडला हा प्रश्न

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कोरोना संसर्गाचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे परीक्षा विभागात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. नोव्हेंबर ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे परीक्षा विभागात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत सहा अधिकारी, कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. त्यामुळे परीक्षा विभागातील कर्मचारी धास्तावले असून, तोकड्या मनुष्यबळामुळे कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे वास्तव आहे.

नोव्हेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होताच ‘विथहेल्ड’मध्ये निकाल असलेल्या विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रचंड गर्दी वाढली आहे. हल्ली बी.एस्सी. सत्र ६ व ४ च्या गुणपत्रिका जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मंगळवारी बीएसस्सी पर्यावरण विषयाचे निकाल जाहीर करण्याचे नियोजन परीक्षा विभागाने चालविले होते. मात्र, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी कमी पाहावयास मिळाली. ऑक्टोबर ते डिसेंबर असे तीन महिने परीक्षा विभागाचे कामकाज निरंतरतेने सुरूच आहे. परंतु, ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सुरू होताच विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी वाढली. परिणामी दीड महिन्यात सहा अधिकारी, कर्मचारी कोराेना संक्रमित आढळून आल्याने अन्य कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे दिसून येत आहे. जी कामे महाविद्यालय स्तरावर होणे अपेक्षित असताना संपूर्ण ताण विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर आला आहे. १४ डिसेंबर रोजी दोन कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आल्याने अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भीती बळावली आहे.

--------------

- तर तीन दिवसांत गुणपत्रिका मिळणार

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी गर्दी करू नये. विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात दस्तावेज जमा करावे. ही कागदपत्रे महाविद्यालयाने विद्यापीठात जमा केल्यानंतर तीन दिवसांत विद्यार्थ्यांची गुणपत्रिका महाविद्यालयात पाठविली जाईल, असे पत्र परीक्षा विभागाने १४ डिसेंबर रोजी प्राचार्य, विभागप्रमुखांना पाठविले आहे.

----------------------

गत तीन महिन्यात विविध सहा परीक्षांचे नियोजन करण्यात आले. एकाच वेळी ९ ते १० हजार विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. परीक्षा विभागात ४६ नव्याने अधिकारी, कर्मचारी मिळावे, यासाठी व्यवस्थापन परिषदेकडे मागणी केली आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.

-----------------------