शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कोरोना संसर्गाचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे परीक्षा विभागात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. नोव्हेंबर ...

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात ‘विथहेल्ड’ निकालामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गर्दीमुळे परीक्षा विभागात कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत सहा अधिकारी, कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. त्यामुळे परीक्षा विभागातील कर्मचारी धास्तावले असून, तोकड्या मनुष्यबळामुळे कामाचा प्रचंड ताण येत असल्याचे वास्तव आहे.

नोव्हेंबरमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होताच ‘विथहेल्ड’मध्ये निकाल असलेल्या विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी प्रचंड गर्दी वाढली आहे. हल्ली बी.एस्सी. सत्र ६ व ४ च्या गुणपत्रिका जमा करण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी होत आहे. मंगळवारी बीएसस्सी पर्यावरण विषयाचे निकाल जाहीर करण्याचे नियोजन परीक्षा विभागाने चालविले होते. मात्र, सोमवारच्या तुलनेत मंगळवारी ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांची गर्दी कमी पाहावयास मिळाली. ऑक्टोबर ते डिसेंबर असे तीन महिने परीक्षा विभागाचे कामकाज निरंतरतेने सुरूच आहे. परंतु, ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सुरू होताच विद्यार्थ्यांची प्रचंड गर्दी वाढली. परिणामी दीड महिन्यात सहा अधिकारी, कर्मचारी कोराेना संक्रमित आढळून आल्याने अन्य कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण झाल्याचे दिसून येत आहे. जी कामे महाविद्यालय स्तरावर होणे अपेक्षित असताना संपूर्ण ताण विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर आला आहे. १४ डिसेंबर रोजी दोन कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आल्याने अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भीती बळावली आहे.

--------------

- तर तीन दिवसांत गुणपत्रिका मिळणार

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ‘विथहेल्ड’ निकालाची समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठात विद्यार्थ्यांनी गर्दी करू नये. विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात दस्तावेज जमा करावे. ही कागदपत्रे महाविद्यालयाने विद्यापीठात जमा केल्यानंतर तीन दिवसांत विद्यार्थ्यांची गुणपत्रिका महाविद्यालयात पाठविली जाईल, असे पत्र परीक्षा विभागाने १४ डिसेंबर रोजी प्राचार्य, विभागप्रमुखांना पाठविले आहे.

----------------------

गत तीन महिन्यात विविध सहा परीक्षांचे नियोजन करण्यात आले. एकाच वेळी ९ ते १० हजार विद्यार्थ्यांचे निकाल ‘विथहेल्ड’ असल्याने कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. परीक्षा विभागात ४६ नव्याने अधिकारी, कर्मचारी मिळावे, यासाठी व्यवस्थापन परिषदेकडे मागणी केली आहे.

- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मू्ल्यांकन मंडळ.

-----------------------