शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

युवा पिढीचा सोशल मीडियावर दंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:11 IST

चांदूर बाजार : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा केल्यापासून ग्रामीण भागात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील ...

चांदूर बाजार : निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीची घोषणा केल्यापासून ग्रामीण भागात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यामुळे गावातील चावडीवर मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत निवडणुकीच्या चर्चा झडत आहेत. आता तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने त्या चर्चा नॉनस्टॉप रंगू लागल्या आहेत. युवा पिढीने तर सोशल अक्षरश: दंगा घातला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीला केवळ २० दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. कोरोना संक्रमणाची खबरदारी म्हणून या निवडणुका लांबवण्यात आल्या होत्या. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व अधिकारात झालेली वाढ बघता, अनेकांना राजकारण खुणावू लागले आहे. युवक वर्गही मोठ्या प्रमाणात याकडे आकृष्ट होऊ लागला आहे, हे चांगले चिन्ह मानले जाते. युवकांचा सहभागाने अनेकांची एकाधिकारशाही आता संपुष्टात येणार असल्याचे दिसते. गेल्या काही काळापासून नागरिकांमध्ये आता जागरूकता आलेली आहे. तरीही त्यांना निवडणुका जिंकणे कठीण झाले आहे. कार्यकर्ते पोसणे, निवडणुकीतील अपार खर्च यामुळे एखादा गरीब नेता नेतृत्वगुण असूनही निवडून येणे कठीण आहे. मात्र, शेवटी मतदार ठरवतील तोच नेता निवडून येईल, हे जरी खरे असले तरी सत्तास्थापनेच्या वेळी पडद्याआड अनेक राजकीय घडामोडी असतात. मतदारांनी दिलेला कौल डावलून सत्ता स्थापन केली जाते. अशी अनेक उदाहरणे आहेत. यामुळे गुलाबी थंडीत सध्या या राजकीय चर्चेशिवाय दुसरी चर्चा ग्रामीण भागात आढळलेली नाही.

-------------------