शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

वातावरण बदलाचा परिणाम, रबीच्या पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: December 6, 2015 00:08 IST

खरीपाचा हंगाम अपुऱ्या पावसाअभावी उध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रबीवर होती.

नवे संकट : आठवड्यात पेरणी क्षेत्रात १२ टक्केच वाढ अमरावती : खरीपाचा हंगाम अपुऱ्या पावसाअभावी उध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रबीवर होती. परंतु ऐन पेरणीच्या हंगामात महिन्याभऱ्यापासून सतत वातावरण बदलत आहे. थंडीच्या दिवसात उष्णतामान वाढल्याने रबीच्या पेरण्या खोळंबल्या आहे. शेतकऱ्यांच्या मागे पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या खरीपाचा हंगामात दीड महिना उशीरा पाऊस व नंतर पावसात खंड यामुळे खरीपाचा हंगाम महिन्याभऱ्याने माघारला. त्यामुळे रबीचा हंगाम देखील माघारला. त्यात पावसाच्या दिवसात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमीनीत आर्द्रता नाही, तसेच कपाशीवर ‘लाल्यांचा’ प्रादुर्भाव यामुळे कपाशीचे उत्पन्नात कमी झाली. महिन्याभऱ्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने तुर पिकांवर देखील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी झालेल्या हरभऱ्याची वाढ खुंटली आहे. व ‘भर’ रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. डिसेंबर महिन्यातही थंडी नसल्याने गव्हाची पेरणी खोळंबली आहे. थंडीच्या अभावाचा परिणाम हरभऱ्याप्रमाणेच तुर पिकावर देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यंदाच्या रबी हंगामासाठी कृषि विभागाने १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यापैकी ९७ हजार ९२४ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी झालेली आहे. पेरणीची ही ६६ टक्केवारी आहे. मागील आठवड्यात पेरणीची ५५ टक्केवारी होती म्हणजेच एका आठवड्यात रबीच्या पेरणीत फक्त ११ टक्कयांनी वाढ झाली आहे. हे १५ हजार ७९६ हेक्टर क्षेत्र आहे. गव्हाची पेरणी रखडलीगव्हाच्या उगवणशक्तीसाठी व वाढीसाठी वातावरणात थंडी आवश्यक आहे. मात्र महिन्याभऱ्यापासून थंडीचा अभाव असल्याने अद्याप प्रस्तावित क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रातील गव्हाच्या पेरण्या रखडल्या आहेत. तसेच विहिरींची कमी होत असलेली पातळी व दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे ओंबीवर असणाऱ्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.याचाही काही प्रमाणात परिणाम होऊन गव्हाचे क्षेत्र कामी होत आहे.