शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

वातावरण बदलाचा परिणाम, रबीच्या पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: December 6, 2015 00:08 IST

खरीपाचा हंगाम अपुऱ्या पावसाअभावी उध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रबीवर होती.

नवे संकट : आठवड्यात पेरणी क्षेत्रात १२ टक्केच वाढ अमरावती : खरीपाचा हंगाम अपुऱ्या पावसाअभावी उध्वस्त झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रबीवर होती. परंतु ऐन पेरणीच्या हंगामात महिन्याभऱ्यापासून सतत वातावरण बदलत आहे. थंडीच्या दिवसात उष्णतामान वाढल्याने रबीच्या पेरण्या खोळंबल्या आहे. शेतकऱ्यांच्या मागे पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे. यंदाच्या खरीपाचा हंगामात दीड महिना उशीरा पाऊस व नंतर पावसात खंड यामुळे खरीपाचा हंगाम महिन्याभऱ्याने माघारला. त्यामुळे रबीचा हंगाम देखील माघारला. त्यात पावसाच्या दिवसात सरासरीपेक्षा कमी पावसाने जमीनीत आर्द्रता नाही, तसेच कपाशीवर ‘लाल्यांचा’ प्रादुर्भाव यामुळे कपाशीचे उत्पन्नात कमी झाली. महिन्याभऱ्यापासून वातावरणात सतत बदल होत असल्याने तुर पिकांवर देखील शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. तापमानात वाढ झाल्याने पेरणी झालेल्या हरभऱ्याची वाढ खुंटली आहे. व ‘भर’ रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. डिसेंबर महिन्यातही थंडी नसल्याने गव्हाची पेरणी खोळंबली आहे. थंडीच्या अभावाचा परिणाम हरभऱ्याप्रमाणेच तुर पिकावर देखील मोठ्या प्रमाणात झालेला आहे. यंदाच्या रबी हंगामासाठी कृषि विभागाने १ लाख ४७ हजार ८९० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले होते. यापैकी ९७ हजार ९२४ हेक्टर क्षेत्रात सद्यास्थितीत पेरणी झालेली आहे. पेरणीची ही ६६ टक्केवारी आहे. मागील आठवड्यात पेरणीची ५५ टक्केवारी होती म्हणजेच एका आठवड्यात रबीच्या पेरणीत फक्त ११ टक्कयांनी वाढ झाली आहे. हे १५ हजार ७९६ हेक्टर क्षेत्र आहे. गव्हाची पेरणी रखडलीगव्हाच्या उगवणशक्तीसाठी व वाढीसाठी वातावरणात थंडी आवश्यक आहे. मात्र महिन्याभऱ्यापासून थंडीचा अभाव असल्याने अद्याप प्रस्तावित क्षेत्राच्या ६० टक्के क्षेत्रातील गव्हाच्या पेरण्या रखडल्या आहेत. तसेच विहिरींची कमी होत असलेली पातळी व दरवर्षी जानेवारी ते मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे ओंबीवर असणाऱ्या गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.याचाही काही प्रमाणात परिणाम होऊन गव्हाचे क्षेत्र कामी होत आहे.