शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

केंद्र पुरस्कृत कृषी योजनांची होणार पुनर्रचना

By admin | Updated: May 19, 2014 22:59 IST

हवामानातील बदलत्या वातावरणाशी सुसंगत नवीन कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्यासह देशभरात शाश्‍वत शेती अभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने शेवटच्या टप्प्यात मंजूर केला आहे.

अमरावती : हवामानातील बदलत्या वातावरणाशी सुसंगत नवीन कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून राज्यासह देशभरात शाश्‍वत शेती अभियान राबविण्याचा निर्णय केंद्र शासनाने शेवटच्या टप्प्यात मंजूर केला आहे. या निर्णयानुसार केंद्र पुरस्कृत योजना एकत्रितपणे राबविल्या जाणार आहेत. यासाठी राज्य व जिल्हास्तरावर विविध समित्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियान सक्षम करण्याचा उद्देश आहे.

सन २0१४-१५ पासून मावळत्या केंद्र शासनाने शेतीशी संबंधित विविध योजनांची पुनर्रचना केली. यापैकी काही योजना एकत्रितपणे राबविण्यात येणार आहेत. यामध्ये राष्ट्रीय सुक्ष्म सिंचन अभियान, राष्ट्रीय सेंद्रीय शेती प्रकल्प, राष्ट्रीय मृदा आरोग्य व सुपिकता व्यवस्थापन प्रकल्प आणि कोरडवाहू शाश्‍वत शेती कार्यक्रमाचा समावेश आहे. योजनांच्या माध्यमातून हवामान बदलांशी सुसंगत कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी राष्ट्रीय शाश्‍वत शेती अभियान राबविण्यात येईल. अभियानाच्या माध्यमातून कोरडवाहू क्षेत्रविकास, शेती, जलव्यवस्थापन, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि वातावरण बदल व शाश्‍वत शेती संनियंत्रण या घटकांचा सर्वांगीण विकास साधण्यात येणार आहे.

योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामध्ये प्रत्येक राज्य आणि जिल्हास्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्याचे सुचविले आहे. त्यानुसार राज्य शासनस्तरावर राज्यस्तरीय समिती, राज्यस्तरीय स्थायी तांत्रिक समिती, जिल्हास्तरीय अभियान समिती, राज्यस्तरीय तांत्रिक सहायता चमू नियुक्त समिती आणि जिल्हास्तरावर विषय विशेषज्ञ नियुक्ती समिती स्थापन करणे प्रस्तावित होते. राज्य शासनाने यासंदर्भात एका निर्णयाद्वारे नुकतीच या समित्यांची घोषणा केली आहे. (प्रतिनिधी)