शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

पुनर्जीवन शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:20 IST

शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून एकाच वेळी ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करून ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. येथील पुनर्जीवन फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय आहे. अवयवदात्यांची संख्या पाहता येथे अवयवदान शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करावे, .....

ठळक मुद्देशंकरबाबा पापळकर : जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह ५० जणांचा अवयवदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून एकाच वेळी ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करून ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. येथील पुनर्जीवन फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय आहे. अवयवदात्यांची संख्या पाहता येथे अवयवदान शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करावे, अशी मागणी अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनी केली. पुनर्जीवन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सामूहिक अवयवदान संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जाकीर, सुरेश ठाकरे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश उभाड, गांधारी पापळकर, संध्या वैद्य, शोभा मुघलसह डॉ. संदीप चौधरी, जितेंद्र रोडे, श्रीराम कुलकर्णी, राजा पिंजरकर, विनोद नागे, प्रमोद डेरे, सुदर्शन काळे आदी उपस्थित होते.माझ्या १२३ गतिमंद अंध अपंग मुलांच्या वेदना मला माहीत आहेत. आपण जिजाऊ बिग्रेडच्या महिलांनी अवयवदानाचा घेतलेला संकल्प देशाला प्रेरणादायी आणि मृत्यूनंतरही इतरांना जीवन देणारा आहे, असे शंकरबाबा पापळकर पुढे म्हणाले. अवयवदानाचे महत्त्व समजावून घेत आपण केलेला संकल्प खरोखरच महान आहे. परतवाडा येथे अवयवदान केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व मान्यवरांनी विशद केले.संभाजी ब्रिगेडच्या महिलांनी अवयवदानाचा संकल्प करीत समाजापुढे एक आदर्श ठेवला. यामध्ये उज्ज्वला प्रवीण बेलसरे, वृषाली प्रवीण भिंगारे, अलका राजेंद्र बोंडे, सुवर्णा सचिन चतुर, कल्पना प्रभाकर चौधरी, मीनाक्षी विनोद दळवी, नर्मदा जानराव दळवी, रेणुका शरद दसरे, सरिता महेश गाडगे, प्रिया सचिन गवई, हर्षदा राजेश इंगळे, कल्पना लक्ष्मण इंगळे, अंजली अशोक जवंजाळ, मंदा दादाराव जवंजाळ, मनीषा राहुल कडू, सुशीला अंबादास कडू, रूपाली दिनेश कळसकर, स्वाती शैलेश कांडलकर, स्वप्ना प्रवीण खेरडे, मोनाली नितीन मानकर, लक्ष्मी जगदीश पानसे, वैशाली राजेश पातोंड, लीनता अजय पवार, विजया राजेश फाटकर, भारती अमोल राऊत, अपर्णा जितेंद्र रोडे, किरण वडुरकर, संध्या बाबासाहेब वैद्य, दीपाली मनीष विधळे, सचिन चतुर, भगवंत गावंडे, अशोक जवंजाळ, दिनेश कळसकर, प्रवीण काळे, जगदीश पानसे, गौरव पारवे, अजय पवार, अमोल राऊत, नीलेश मनीष विधळे, गौरव राठी आदींचा समावेश आहे. या सोहळ्याला नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.परतवाड्यात पुनर्जीवन फाउंडेशनच्या मदतीने एकाच दिवशी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह तब्बल ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करणे ऐतिहासिक आहे. फाऊंडेशनचे कार्य अविरत सुरू राहील.- डॉ राजेश उभाड,अध्यक्ष पुनर्जीवन फाउंडेशन