शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

पुनर्जीवन शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 01:20 IST

शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून एकाच वेळी ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करून ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. येथील पुनर्जीवन फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय आहे. अवयवदात्यांची संख्या पाहता येथे अवयवदान शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करावे, .....

ठळक मुद्देशंकरबाबा पापळकर : जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह ५० जणांचा अवयवदानाचा संकल्प

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : शहरात महात्मा फुले जयंतीचे औचित्य साधून एकाच वेळी ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करून ऐतिहासिक घटनेची नोंद केली आहे. येथील पुनर्जीवन फाऊंडेशनचे कार्य स्पृहणीय आहे. अवयवदात्यांची संख्या पाहता येथे अवयवदान शस्त्रक्रिया केंद्र स्थापित करावे, अशी मागणी अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांनी केली. पुनर्जीवन फाऊंडेशनच्यावतीने आयोजित सामूहिक अवयवदान संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम होते. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जाकीर, सुरेश ठाकरे, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. राजेश उभाड, गांधारी पापळकर, संध्या वैद्य, शोभा मुघलसह डॉ. संदीप चौधरी, जितेंद्र रोडे, श्रीराम कुलकर्णी, राजा पिंजरकर, विनोद नागे, प्रमोद डेरे, सुदर्शन काळे आदी उपस्थित होते.माझ्या १२३ गतिमंद अंध अपंग मुलांच्या वेदना मला माहीत आहेत. आपण जिजाऊ बिग्रेडच्या महिलांनी अवयवदानाचा घेतलेला संकल्प देशाला प्रेरणादायी आणि मृत्यूनंतरही इतरांना जीवन देणारा आहे, असे शंकरबाबा पापळकर पुढे म्हणाले. अवयवदानाचे महत्त्व समजावून घेत आपण केलेला संकल्प खरोखरच महान आहे. परतवाडा येथे अवयवदान केंद्र व्हावे, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांना अवयवदानाचे महत्त्व मान्यवरांनी विशद केले.संभाजी ब्रिगेडच्या महिलांनी अवयवदानाचा संकल्प करीत समाजापुढे एक आदर्श ठेवला. यामध्ये उज्ज्वला प्रवीण बेलसरे, वृषाली प्रवीण भिंगारे, अलका राजेंद्र बोंडे, सुवर्णा सचिन चतुर, कल्पना प्रभाकर चौधरी, मीनाक्षी विनोद दळवी, नर्मदा जानराव दळवी, रेणुका शरद दसरे, सरिता महेश गाडगे, प्रिया सचिन गवई, हर्षदा राजेश इंगळे, कल्पना लक्ष्मण इंगळे, अंजली अशोक जवंजाळ, मंदा दादाराव जवंजाळ, मनीषा राहुल कडू, सुशीला अंबादास कडू, रूपाली दिनेश कळसकर, स्वाती शैलेश कांडलकर, स्वप्ना प्रवीण खेरडे, मोनाली नितीन मानकर, लक्ष्मी जगदीश पानसे, वैशाली राजेश पातोंड, लीनता अजय पवार, विजया राजेश फाटकर, भारती अमोल राऊत, अपर्णा जितेंद्र रोडे, किरण वडुरकर, संध्या बाबासाहेब वैद्य, दीपाली मनीष विधळे, सचिन चतुर, भगवंत गावंडे, अशोक जवंजाळ, दिनेश कळसकर, प्रवीण काळे, जगदीश पानसे, गौरव पारवे, अजय पवार, अमोल राऊत, नीलेश मनीष विधळे, गौरव राठी आदींचा समावेश आहे. या सोहळ्याला नागरिकांची भरगच्च उपस्थिती होती.परतवाड्यात पुनर्जीवन फाउंडेशनच्या मदतीने एकाच दिवशी जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांसह तब्बल ५० जणांनी अवयवदानाचा संकल्प करणे ऐतिहासिक आहे. फाऊंडेशनचे कार्य अविरत सुरू राहील.- डॉ राजेश उभाड,अध्यक्ष पुनर्जीवन फाउंडेशन