शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

गीतांजली व समता एक्स्प्रेसचे आरक्षण बंद

By admin | Updated: June 14, 2014 23:22 IST

१ जुलैपासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर गीतांजली व समता एक्स्प्रेस थांबणार नाही. लोकसभेच्या निकालानंतर रेल्वे प्रशासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत.

वरठी : १ जुलैपासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर गीतांजली व समता एक्स्प्रेस थांबणार नाही. लोकसभेच्या निकालानंतर रेल्वे प्रशासनाने अचानक घेतलेल्या निर्णयामुळे अनेक प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. सदर प्रवासी रेल्वे गाड्या पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी खासदार नाना पटोले यांनी रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहिले आहे. १ जुलैकरीता अजून १५ दिवस बाकी आहेत. पत्र लिहून मागणीला आठवडा झाला पण तुर्तास काही निर्णय झाला नाही. सध्या भंडारा रोड रेल्वे स्थानकाकरिता या गाड्याचे आरक्षण देणे बंद आहे. अनेक दिवसापासून मागणी असणाऱ्या गाड्या अचानक बंद होणार म्हणून जिल्हाधिकारी चिंतेत आहेत. गीतांजली व समता एक्स्प्रेसकरिता वातावरण तापणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत.सध्या मृग नक्षत्र सुरू आहे. बदलत्या ऋतूप्रमाणे देशातील राजकारणासह जिल्ह्यात मोठा फेरबदल झाला. फेरबदल होऊनही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. जे होते त्यांनी केले नाही म्हणून लोकांनी त्यांना रस्ता दाखवला. ज्यांच्याकडे काम अपेक्षेने दिले आहे त्यांनी केले नाही तर भविष्याती परिणाम भोगावे लागतील असा जनतेचा समज आहे. एकंदरीत उन्हाळ्यानंतर उष्णतेपासून उसंत मिळणाऱ्या ऋतूत गीतांजली व समता एक्स्प्रेसच्या थांबा पूर्ववत सुरू रहावा म्हणून घाम फुटण्याची शक्यता आहे.गीतांजली एक्स्प्रेस ही मुंबई-हावडा रेल्वे मार्गावरून धावणारी सर्वात जुनी रेल्वे गाडी. भंडारा जिल्ह्याच्या ठिकाण भंडारा रोड रेल्वे स्थानकावर सुरू झाल्यापासून थांबत नव्हती. याबाबत जिल्ह्यातील काही प्रवासी संघटना व वरठी येथील लोकप्रतिनिधींनी गाडी थांबावी म्हणून माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्याकडे रेटून धरली. पटेल यांनी भंडारा रोड रेल्वे स्थानकावर गाडीचा थांबा मिळवून दिला. गतवर्षी मे महिन्यापासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर या गाडीचा थांबा सुरू झाला. मुंबई-हावडा मार्गावर कार्यालयीन काम व या रस्त्यावर असलेल्या धार्मिक स्थळाना जाण्याकरीता अत्यंत उपयुक्त गाडी होती. ती अचानक बंद होत असल्यामुळे प्रवाशात अशांतता पसरली आहे. गीतांजलीपाठोपाठ समता एक्स्प्रेस बंद होणार आहे. ही गाडी आठवड्यातून पाच दिवस हजरत निजामउद्दीन ते विशाखापट्टम या मार्गावर धावायची. समता एक्स्प्रेस एक दशकापासून भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबायची. गीतांजली व समता एक्स्प्रेस बंद करण्याचे कुठलेही ठोस कारणे रेल्वे प्रशासनाने दिलेले नाही. भंडारा रोड रेल्वे स्थानकावरून धावणाऱ्या अतिजलद रेल्वे गाड्या थांबा मिळवण्यासाठी प्रफुल पटेल यांचा सिंहाचा वाटा आहे. गितांजली एक्स्प्रेसचा थांबा मिळवण्याकरीता त्यांचेच वजन कामात आले होते. माजी केंद्रीय मंत्री प्रफुल पटेल यांच्या काळात मिळालेली हिरवा कंदील खासदार नाना पटोले यांच्या काळात अचानक लाल मध्ये रूपांतर होणार असल्यामुळे त्यांना थांबा पुर्वरत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. (वार्ताहर)